Skip to main content

मदतीचे हात; मायेची फुंकर !

पूरग्रस्तांपर्यंत खरी मदत पोहचली पाहिजे, झेप फाउंडेशनच्या प्रेरणा बलकवडे या ताइने ते केले. कोल्हापूर जिल्ह्यातील पारगाव,अर्जुनवाड गावांना स्वत: जाऊन शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहचवलीय, तसेच पूरग्रस्त बाधितांच्या जखमेवर मायेने ,आपुलकीने फुंकर घातली आहे. काही पूरग्रस्तांनी स्वतः वरील आपबिती सांगता सांगता अश्रृंना वाट मोकळी करुन दिली.



समता परिषद आणि भुजबळ नॉलेज सिटीतर्फे मदतीचा हात

भारतीय महात्मा फुले समता परिषद व मेट भुजबळ नॉलेज सिटी मुंबई व नाशिकच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी संकलित करण्यात आलेली जीवनावश्यक वस्तूंची मदत नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस पंकज भुजबळ यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर व वाळवा तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी रवाना करण्यात आली.
 राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्त नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे संकलन करून मदत करण्याचे आवाहन राज्यभरातील समता परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलेले होते. त्यामध्ये पूरग्रस्त नागरिकांसाठी मिनरल वॉटर, बिस्किट, अन्न पदार्थ, नवीन कपडे, चादरी, ब्लँकेट, तांदुळ, ज्वारी, गहू, ज्वारी असे धान्य, औषधे व इतर जीवनावश्यक वस्तू तसेच विद्यार्थ्यासाठी वह्या आणि शालोपयोगी वस्तू इत्यादींचे तातडीने संकलन करून वाटप करण्याच्या सूचना भुजबळ यांनी दिल्या होत्या.
त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून तसेच मेट भुजबळ नॉलेज सिटी मुंबई व नाशिकच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत जमा करण्यात आली. तसेच धुळे, पालघर, मुंबई, नवी मुंबई या जिल्ह्यातूनही मदत जमा करण्यात आली आहे. या जमा केलेल्या सर्व सामग्रीचे पॅकेजिंग करून आज मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमातून आमदार पंकज भुजबळ, समता परिषदेचे पदाधिकारी व मेट भुजबळ नॉलेज सिटीचे विश्वस्त, व्यवस्थापक, शिक्षक आदींच्या उपस्थितीत नाशिक येथून मदतीचे ट्रक रवाना करण्यात आले 


   मदतीचे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर व वाळवा तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी समता परिषदेच्या वतीने पाच टन कांदे, पाच टन बटाटे, पाच टन गहू, पाच टन तांदूळ यासह एक ट्रक पॅकिंग मिनिरल वॉटर, ५ हजार बिस्कीटची पाकिटे तर विद्यार्थ्यासाठी १० हजार वह्या इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. तर मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळेची बॅग, वह्या, चित्रकला वही, कम्पास बॉक्स, कलर बॉक्स, पेन्सिल बॉक्स, पेन, वॉटर बॉटल आदीसह उपयोगी शैक्षणिक साहित्याचे १५०० कीट तयार करून  पाठविण्यात आले आहे.
 याप्रसंगी संस्थेचे विश्वस्थ दिलीप खैरे, समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. कैलास कमोद, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, समता परिषद शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, समता परिषदेचे कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर, धनंजय भावसार यांच्यासह संस्थेचे सर्व इंन्स्टिट्यूटचे प्राचार्य, प्राध्यापक, ट्रस्ट ऑफिस पदाधिकारी व स्टाफ याप्रसंगी उपस्थित होते.



रेडक्रॉस पूरग्रस्त उपक्रमास मदत

नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटनेच्या सभासदांनी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी सढळ हाताने  मदत गोळा केली . इंडियन रेडक्रॉस सोसायटी, नाशिक जिल्हा शाखेच्या माध्यमातून ही मदत सांगली कोल्हापूर येथे पाठण्यात येणार आहे. यावेळी  गोळा करण्यात आलेल्या  संसारोपयोगी वस्तू ,  स्टेशनरी, नवीन कपडे, अंथरूण-पांघरूण आदी साहित्य आणि  ३१ हजार रुपयांचा धनादेश नाशिक रेडक्रॉसचे सचिव मेजर  पी. एम. भगत यांना संघटनेचे अध्यक्ष शेखर दशपुते यांच्या हस्ते देण्यात आला. या प्रसंगी नाशिक रेडक्रॉस चे डॉ. प्रतिभा औंधकर , डॉ.सुनिल औंधकर ,शशिकांत शर्मा, चंद्रकांत गोसावी, दिलीप जाधव आदी उपस्थित होते. याहीपुढे रेडक्रॉस च्या विविध सामाजिक उपक्रमात आमच्या संघटनेचे सक्रीय योगदान राहील असे  आश्वासन दशपुते आणि पदाधिकाऱ्यांनी दिले.  उपक्रम यशस्वितेसाठी संघटनेचे अध्यक्ष शेखर दशपुते यांच्यासह उपाध्यक्ष  महेंद्रभाई पटेल, सहसचिव सुरेशशेठ मंत्री,  एकनाथ अमृतकर, संचालक  अरविंद दशपुते,  अरुण जातेगावकर, भिकालाल कोठावदे,  प्रभाकर गाडे,  महेंद्रभाई पटेल (एमडी), संतोष राय, अशोक सोनजे, विजय काकड , हेमचंद्र पांडे प्रयत्नशील होते .

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...