Skip to main content

Posts

Showing posts with the label राजकिय

राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय: मंत्री किंवा नेत्यांनी गर्दी होईल असे कार्यक्रम घेऊ नये- नवाब मलिक

मुंबई| या महिन्यात पक्षाचे होणारे नियोजित शिबीर व इतर सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पक्षाच्या मंत्र्यांची व नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी माहिती दिली.  या बैठकीमध्ये आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्या निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण अबाधित राहिले पाहिजे ही पक्षाची भूमिका असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.  ओबीसी आरक्षण न्यायालयीन लढाई जबाबदारी मंत्री भुजबळांवर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत न्यायालयीन लढा लढण्याची जबाबदारी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देण्यात आल्याचेही बैठकीत ठरल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले* ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणूका नकोत ही पक्षाची सुरुवातीपासून भूमिका आहे आणि तीच कायम राहील असेही बैठकीत चर्चा झाल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.  राज्यात कोरोनाचे ...

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्जाची मुदत १ ऑगस्टपर्यंत

नाशिक| शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या धर्तीवर इतर मागास बहुजन कल्याण विभागाने सन 2019-20 पासून विमुक्त जाती- भटक्या जमाती (व्हीजेएनटी), इतर मागासप्रवर्ग (ओबीसी) व विशेष मागासप्रवर्ग (एसबीसी) यांच्यासाठी परदेश शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत 2021-22 शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 1 ऑगस्ट 2021 पर्यंत आहे. या योजनेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभाग (पुणे) चे संचालक दे.आ.गावडे यांनी केले आहे.  या शिष्यवृत्तीत परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाच्या (पीएच.डी.) अध्ययन करण्यासाठी राज्यातून दरवर्षी 10 विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी.साठी जागतिक स्तरावर 200 च्या आतील रँकमधील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या  विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांने जाहिरात व विहित नमुन्यातील अर्ज www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील नवीन संदेश या लिंकवरुन डाऊनलोड करून घ्यावा.  वि...

खा. डॉ. अमोल कोल्हे यांना नगरसेविका सुषमा रवी पगारे यांच्याकडून संविधान उद्देशिका भेट

नाशिकरोड| प्रतिनिधी| अभिनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा. डॉ. अमोल कोल्हे हे नाशिक येथे कार्यक्रमा निमित्त आले असता राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या शहर कार्याध्यक्षा तथा नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे  यांनी त्यांची भेट घेऊन भारताची संविधान उद्देशिका भेट म्हणून दिली. या  भेटीचा त्यांनी सहर्ष स्वीकार करून सौ. पगारे यांच्या कामाचे विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या. यावेळी खा. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर महिला कार्याध्यक्षा तथा नगरसेविका म्हणून पार पाड़त असलेल्या कामांची माहिती सौ सुषमा रवी पगारे  यांच्या कडून जाणून घेतली. पक्षाच्यावतीने नागरिकांच्या भल्यासाठी शहरात राबविन्यात येत असलेल्या विविध आंदोलनात तथा कार्यक्रमात सक्रिय सहभाग आणि नगरसेविका या नात्याने प्रभाग १६ मध्ये घेत असलेल्या विविध समाजपयोगी उपक्रमांची माहिती जाणून घेतली. प्रभाग १६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने घेण्यात आलेले रेशनकार्ड शिबिर व इतर जनजागृतीपर कार्याची विशेष प्रशंसा केली.  त्यात मुख्य म्हणजे  कोरोना काळात प्रभागातील जे वयोवृद्ध नागरिक, महिला, तरुण या ...

पश्चिम बंगाल निवडणुकीविषयी खा. संजय राऊत यांचे भाकीत

नाशिक| पश्चिम बंगालमध्ये  महाभारत घडत आहेत. काही झाले तरी ममता बनर्जी याचे सरकार येईल त्यांना बहुत मिळेल. तसेच शिवसेनेची ताकद ममताच्या पाठीशी आहे, अशी भूमिका शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी आज येथे मांडली. नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकारांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. यावेळी वाझे प्रकरणी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले,  मुंबई पोलीस अशा प्रकारचा तपास करण्यास सक्षम आहे. कोणी ही आले तपास केला तरी ही सरकारला फरक पडत नाहीत. भाजपची सर्व सूत्र दिल्लीतून हालतात अनिल देशमुख सुद्धा पवार साहेबाची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. त्यामुळे काही फरक पडत नाहीत, मुबई पोलीस सक्षम आहे. त्यांना नवीन आयुक्त मिळाले आहे. त्यातून बदल घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नविन महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नेतूत्वखाली शहरात प्रभाग निहायशाखा, महिला, विद्यार्थी आघाडी अश्या विविध शाखांचे उद्घाटन होत असून पक्ष प्रमुखांनी दखल घेतली असून राज्यभरात असा उपक्रम राबवणार आहे. माजी आ. वसंत गीते व  सुनील बागुल यांना अद्याप कुठलीही जबाबदारी दिली नस...

इंधन दरवाढी विरोधात युवक राष्ट्रवादीचे दुचाकी ढकलो आंदोलन

प्रतिनिधी| वारे सरकार तेरा खेल, सोने के दाम में मिलता तेल, हिटलर शाही नही चलेगी या घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे व जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली इंधन दरवाढी विरोधात दुचाकी ढकलत आंदोलन केले. यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारच्या निष्काळजीपणामुळे भारतामध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत असून कोरोनाचे फक्त निमित्त झाले आहे. केंद्र सरकारच्या शून्य नियोजनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ढासळत असून गेल्या देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्नाने (GDP) निच्चांक पातळी गाठली आहे. केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे व वायफळ खर्चामुळे कोरोनाचा शिरकाव होण्याअगोदरच ही परिस्थिती उद्भवली असून कोरोना महामारीचे निमित्त झाले आहे. इंधन दराची घौडदौड सुरूच असून घरगुती गॅसचे दर सर्वसामान्य जनतेला परवडणारे नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दराने सर्वोत्तम पातळी गाठली आहे. दिवसागणित इंधन दरवाढ होत असून त्याचबरोबर महागाईत वाढ होत आहे.  लॉकडाउनच्या काळात जून महिन्यात वीसहून अधिकवेळा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली होती, त्याचीच...