Skip to main content

सर्व पात्र लाभार्थ्यांना रेशनचे धान्य मिळेल, याची काळजी घ्या: ना. भुजबळ

Covid-19-food-ministry
फोटो:फाईल
नाशिक। राज्यातील रेशन दुकानदार आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. जी सेवा ते देत आहेत ती निश्चितच प्रशंसनीय आहे, सर्व पात्र लाभार्थ्यांना रेशनचे धान्य मिळेल, याची  काटेकोर काळजी रेशन दुकानदारांनी घ्यावी. त्यांना सर्वांनी  सहकार्य करा, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा मंत्री  छगन भुजबळ यांनी केले आहे.

रेशन दुकानांमध्ये ब्लॅक मार्केटिंग होणार नाही, याचीही काळजी घ्यावी. तसेच नियमित नियतनातील धान्य नियमाप्रमाणे 2 रु किलो गहू व 3 रु. किलो तांदूळ या दरानेच विकले जाईल याची दक्षता घ्यावी. कारण सध्या सर्वसामान्य लोक अडचणीत आहेत या काळात आपण माणुसकीने वागून त्यांची प्रामाणिकपणे सेवा करणे अपेक्षित आहे असेही मंत्री श्री.भुजबळ यांनी म्हटले आहे.

एका स्वस्त धान्य दुकानदाराने  याबाबत चूक केल्यास सर्व यंत्रणा बदनाम होते. अर्थात जे लोकं चुकीचे वागतात त्यांच्यावर नाईलाजाने कायदेशीर  कठोर कारवाई करणे भाग पडते. काल रावेर तालुक्यातील वाघोदा येथील स्वस्त धान्य दुकानदाराने जास्त पैसे घेतल्याबाबतचा व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. याबाबत स्वस्त धान्य दुकान रद्द करण्यात आलेले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. अशी वेळ येवू न देता प्रामाणिकपणे काम करणे अपेक्षित आहे. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे काही जिल्ह्यांमध्ये मोफत तांदुळ वाटपाचे काम सुरु झालेले आहे. उरलेल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच फ्री राईस वाटप सुरु होणार आहे. राज्यात कुठेही स्वस्त धान्य दुकानाबाबत तक्रार येणार नाही व सामान्य नागरिकांना चांगली सेवा मिळेल याबाबत दक्षता घ्यावी, काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्या दुकानांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही मंत्री श्री.भुजबळ यांनी  म्हटले आहे.
 (जिमाका वृत्त) :

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...