Skip to main content

कोविड-१९: मुलांच्या मानसिक स्वास्थ्याविषयी जागरुक रहा: बाल मानसशास्त्रज्ञ तरुणा समनोत्रा

डब्ल्यूएचओच्या युरोपीय विभागातर्फे १९ मे २०२० रोजी एक अहवाल प्रसिद्ध झाला होता. २०१४ ते २०१८ कालावधीतील हा अहवाल  ११ ते १५ वर्षीय मुलांच्या मानसिक आरोग्यावर आधारीत होता. साहजिकच तो महामारीच्या आधीच्या कार्यकाळातील अहवाल आहे. मात्र या अहवालातील अभ्यास ध्यानात ठेवून आपल्याला भारतातील मुलांसाठी कोविड-19 च्या काळात काम करावे लागणार आहे. या महामारीचा परिणाम हा शाळांमधील मुले आणि किशोर-किशोरींच्या मानसिक स्वास्थ्यावर होण्याची शक्यता आहे. 
Covid-19-corona-virus
आपल्यातील बहुतेक लोकांना माहित आहे की मोठ्या शहरांमध्ये शाळा ऑनलाईन झाल्या आहेत. विद्यार्थी गॅजेट्सच्या सहाय्याने शाळांशी कनेक्ट होत आहे, त्यांचा जास्त वेळ हा 'गॅजेट्स हाताळण्यात जात आहे. या आभासी जगाने 'वास्तविक जग' बदलले आहे. विद्यार्थ्यांची दिनचर्या अचानक बदलली आहे. त्यांच्यात बदल घडवून आले आहे. त्यांच्यात विचार, चिंता आणि अवसाद दिसून येत आहे. काही गोष्टी मला चिंतित करतात, आम्ही पहिल्यांदा चर्चा केलेल्या लोकांपेक्षा ही परिस्थिती भिन्न आहे.  

माझ्यामते कोविड-१९ या कालावधीनंतरच्या शालेय जीवनात काही नवीन अडचणींना मुलांना सामोरे जावे लागेल म्हणजेच त्यांना  'वास्तविकतेशी समायोजन करणे किंवा जुळून घेण्यात अडचणी येतील. त्यासाठी आपल्याला तयार राहावे लागेल, 'आभासी जगातून' त्यांना 'वास्तविक जगात आणण्याच्या प्रक्रिये दरम्यान त्यांच्यात चिंता वाढू शकते. त्यासाठी आपल्या सर्वांना त्याच्याशी कनेक्ट राहावे लागेल. सध्याचे ऑनलाईन शिक्षण सर्वांसाठी एका चहाच्या कपा सारखे नाही, त्यामुळे सर्वांना आपण एक सारखे गृहीत धरू शकत नाही, त्याची आवश्यकता ही नाही. एकदा शाळा सुरू झाली की पुन्हा त्यांच्यावर शिक्षणात चांगले प्रदर्शन दाखवण्याचा दबाव असेल, सुरुवातीला त्यांच्यात चिंता निर्माण होईल परंतु जीवनांत पुढे जाण्यास आणि जास्त प्रगती आणि ज्ञान प्राप्त करण्यास मदत होईल हे ही तितकेच खरे!

सुरुवातीच्या दिवसांत विद्यार्थ्यामध्ये आपल्या गॅझेट्स मित्राशी दुरावल्याची भावना निर्माण होऊन तो चिंतीत होईल, त्यावेळेस त्याला घरातील जवळच्यांनी मित्रत्वाच्या नात्याने स्वतंत्रपणे त्याच्याशी संवाद स्थापित करायचा आहे.  माझा विश्वास आहे की पालकांसोबत शाळेतील शिक्षकांची भूमिका खूप महत्वाची आहे.  त्यासाठी आपल्याला शिक्षकांना प्रथम विश्वासात घेऊन परिस्थिती साधारण बनवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी  मी शिक्षकांना अशा उपाययोजना बनविण्यास सुचवते ज्यामुळे युवांना त्यांच्या मनाची कवाडे उघडून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देता येईल.  सुरुवातीच्या दिवसांत शाळेत हलके फुलके आणि मौज-मस्ती सारखे वातावरण निर्माण करावे. आपल्याला सिलेबस पूर्ण करण्याची चिंता राहील परंतु त्याऐवजी आपण विद्यार्थ्यांची चिंता करायला हवी, आपण हे विसरायल नको की ते देशाचे भविष्य आहे. त्यांचे मानसिक स्वास्थ्य हे देशाच्या स्वास्थ्याशी निगडीत आहे, आपण सर्वजण मिळून त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी झटूया आणि उज्ज्वल भारत घडवूया !

तरुणा समनोत्रा
बाल मानसशास्त्रज्ञ,
उपचारात्मक प्रशिक्षक
मो-98501 86863

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...