Skip to main content

कोविड-19: अर्थचक्र बळकटीचा ध्यास

20 मार्चचा दिवस सराफ बाजार बंद! व्यवसाय पूर्णपणे ठप्प, ऐन लग्नसराईचा काळ आणि 100 कोटी उलाढाल असणारी बाजारपेठ पूर्ण पणे बंद, पण सोने भाववाढ सुरूच होती. दि. 22 मे रोजी अचानक बातमी आली, ग्रीन झोनमधील दुकानं उघडणार नाही, कारागिरांनी ही घरी जाणाचा निश्चय केलेला, एक एक दिवस सरत होता, परिस्थिती बिकट होती तरी काही दिवस ते थांबले अपेक्षा हीच की नाही आता सर्व सुरळीत होईल

Saraf-asociation-mehul thorat
जून महिन्यात काही लग्नतिथी आहे. त्यामुळे काम सुरू होणार अशी खात्री सर्वानाच होती, आणि झालं ही तसेच, जसं लॉकडाऊन उघडलं तसे काम सुरू झाले, या लॉकडाऊनमुळे झालेलं नुकसान आता  अतिरिक्त काम करुन भरुन काढू असा विचार होता. त्यासाठी सर्व विश्वासाने जोमानं कामाला लागले, पण बाजारपेठेत बिनकामाची गर्दीच अधिक होती, ही गर्दी काही कमी होत नव्हती, छोट्या छोट्या गोष्टीसाठी बाजारपेठेत येणाऱ्यांचे प्रमाण चिंता वाढवणारे आहे.

जागतिक स्तरावरील अस्थिर परिस्थितीमुळे आधीच बाजाराची स्थिती नाजूक आहे. असे असले तरी यावर्षी पर्यटनासाठी आणि लग्नासाठी खर्च न केलेला पैसा  यात निश्चितच फायदेशीर गुंतवणूक होईल असा विश्वास होता, त्यात हळूहळू सुधारणा होत असल्याचे दिसले, आजही खात्रीशीर गुंतवणूक म्हणून सोन्याला पहिली पसंती आहे, हे लक्षात आल्याने खरेदीसाठी हळूहळू नागरीकांचे पाय बाजाराकडे वळू लागले.

जशी बाजारपेठ खुली झाली गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली काळ संकटाचा आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण वाढली, या पार्श्वभूमीवर परत 20 जूनला बाजारबंद होते, शहरात रुग्ण संख्या कमी होण्याचे चिन्ह दिसेना, मात्र कोरोनाच्या भीतीपोटी ग्राहक बाजाराकडे फिरकला नाही, बंदला प्रतिसाद दिसला, वातावरण बघून कारागीर आणि परराज्यातील कामगार ही पुन्हा काम सोडून घरी जाण्याच्या तयारीला लागले होते, यासर्व परिस्थितीचा कुठेतरी उत्पादन निर्मितीवर थेट परिणाम होईल अशी चिंता व्यापारी वर्गात होतीच. यामुळे मागणी आणि पुरवठा याचे गणित कोलमडण्याची भीती व्यापाऱ्यांनाही सतावत आहे.  

27 जूनला पुन्हा बाजार उघडले, आता सोन्याने नवा उच्चांक गाठला असून सोने प्रति 10 ग्रॅमला भाव 50 हजारापर्यंत पोहचला आहे, असे असले तरी सर्वांमध्ये काम करण्याची दृढ इच्छा दिसत आहे, नियम पाळून परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न केले जात आहे, पण दुसरीकडे कोरोनाचे संकट ही वाढत आहे. महामारी सध्या तरी आटोक्यात येतांना दिसत नसली तरी अशा ही परिस्थितीत सावधपणे मार्गक्रमण करत राहणे हाच पर्याय आहे, जगण्याचा तो आता अविज्य भाग बनला आहे. या महामारीवर अद्याप औषध नाही, सरकारकडे साधन सामग्रीची हवी तितकी व्यवस्था नाही, दवाखाने फुल्ल झाली, त्यामुळे आपण आपली काळजी घेणे आणि सांगितलेल्या सूचना पाळणे तेच आता महत्वाचे आहे.

कोरोना संक्रमण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या वार्ता ऐकल्या की चिंता वाटते, सध्या बाजार उघडलाय पण भीतीची छाया आहेच, पण अर्थचक्र सुरू राहायला हवे, त्यामुळे सराफी व्यवसायाचा एक घटक म्हणून अर्थचक्राला गती मिळावी यासाठी बाजारपेठ सुरू ठेवणे सध्याची गरज बनली आहे. आजच्या संकटाच्या काळात एक सुजाण नागरिक म्हणून आपल्यासह परिवाराला सुरक्षित ठेवणे तितकेच महत्वाचे आहे, बाजारात अनावश्यक गर्दी करू नये, घरीच थांबावे, हा प्रश्न लवकर सुटेल असे तूर्तास तरी वाटत नसून काळजी घेणे हेच सध्या आपल्या हाती आहे.

Mehul-thorat

मेहुल थोरात
संस्थापक सदस्य
कॅट-ऑल इंडिया ज्वेलरी अँड गोल्डस्मित फेडरेशन 

उपाध्यक्ष,
दि नासिक सराफ असोसिएशन

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...