Skip to main content

आ. पडळकर माफी मांगा अन्यथा नाशिक जिल्ह्यात फिरू देणार नाही: पुरुषोत्तम कडलग

नाशिक|प्रतिनिधी| राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या पडळकरांविरूद्ध राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष वाढत असून जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी तीव्र शब्दात पडळकर यांचा निषेध करुन आदरणीय पवार साहेबांची माफी मागावी अन्यथा जिल्ह्यात फिरकू दिले जाणार नाही असा इशारा दिला आहे.
Purushottam-kadlag-ncp-youth
पुरुषोत्तम कडलग, जिल्हाध्यक्ष रा.यु. कॉ.
पवार साहेब महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, असं वक्तव्य करून आमदार पडळकर यांनी नवा वाद उपस्थित केला आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा रोष व्यक्त होत आहे.

कडलग म्हणाले की, एकीकडे देशाचे पंतप्रधान यांच्यासह सर्वच राजकिय पक्ष एकत्र येऊन या महामारी विरुद्ध लढा देत आहे. अशा परिस्थितीत असे वक्तव्य करणे बालिशपणाचे लक्षण आहे. आम्ही पालकमंत्री ना. छगन भुजबळ, ना अजितदादा पवार, ना. जयंत पाटील साहेब यांच्या तालमीत तयार झालेलो कार्यकर्ते आहोत. आम्ही आमची संस्कृती जपतो मात्र वेळ पडली तर ठोशास ठोसा देणेही जाणतो, त्यामुळे आपली पातळी ओळखा आणि आम्हाला ज्ञान पाजळू नका, तसेच शरद पवार यांची माफी मागा अन्यथा नाशिक जिल्ह्यात फिरकू देणार नाही असा इशारा ही कडलग यांनी दिला आहे.


देवळा राष्ट्रवादीतर्फे पडळकरांचा निषेध

खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा देवळा तालुका आणि शहरातर्फे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

खा. शरदचंद्र पवार साहेब हे देशातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. देशावर राज्यावर आलेल्या संकटाच्या काळात त्यांनी नेहमीच सक्षमपणे भूमिका मांडून संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजप पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने ही पवार साहेबांनी  केलेल्या विविध कामाबद्दल देशातील जनतेसमोर स्तुती केलेली आहे , अखंड ५० वर्षे त्यांनी देशाच्या व राज्याच्या विकासामध्ये मोठे योगदान दिले आहे.
आ. गोपीचंद पडळकर यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी बेताल वक्तव्य करून आपला बालिशपणा जनतेसमोर उघड केला आहे.

पवार साहेबांनी कधीच जातीपातीचे राजकारण न करता सर्व जाती धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन काम केलं आहे.भाजप पक्षाने आशा लोकांना समज द्यावी तसेच पवार हे आजच्या पिढीला एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी देशाचे जाणतेराजे शरदचंद्रजी पवार साहेब यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी देवळा राष्ट्रवादी तर्फे करण्यात आलीय.


Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...