Skip to main content

ही तर पक्षासाठी आमदारकीच्या बदल्यातील बेताल निष्ठा:मा.खा. समीर भुजबळ यांची पडळकरांवर टीका

नाशिक|महाराष्ट्राच्या जडणघडणीत ५० वर्षे योगदान असलेल्या पवार साहेबांबद्दल गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य हा प्रसिद्धीच्या हव्यासापोटी निव्वळ बालिशपणा असून पक्षाने दिलेल्या आमदारकीच्या बदल्यात बेताल निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न आणि समाजासाठी आपण काहीतरी करतो आहे हे दाखवण्याची धडपड म्हणजे पडळकरांचे आजचे बालिश वक्तव्य असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली.
Ex-mp-sameer-bhujbal
फोटो: मा.खा. समीर भुजबळ
खासदार शरदचंद्रजी पवार यांनी आजवर कुठल्याही जाती धर्मात तेढ निर्माण न करता बहुजन समाजाच्या बाजूने उभं राहतं न्याय मिळवून देण्यासाठी आपलं उभं आयुष्य वेचलं आहे. आपल्या आयुष्यातील ५० वर्ष देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जडणघडनीत दिलेले आहे. अशा महान व्यक्तीबद्दल स्वतःला कथित समाजाचे नेते म्हणून घेणाऱ्या पडळकर यांचे बेताल वक्तव्य अत्यंत निषेधार्थ आहे.

निवडणूक लाढवतांना भाजपने धनगर आरक्षणाचे खोटे आश्वासन दिले.केंद्रात आणि राज्यात सत्ता असतांना देखील भाजपने धनगर आरक्षणासाठी पाच वर्षे खेळवत केवळ वेळकाढुपणा केला. सरकारचा कालावधी पूर्ण होण्याच्या वेळी धनगर समाजाला गाजर दाखवण्यासाठी पॅकेजची घोषणा केली. हे भाजप सरकारचे धनगर समाजाबाबत असलेलं दुटप्पी धोरण असल्याचे समीर भुजबळ यांनी म्हटले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात पवार साहेबांनी बहुजन हिताय अशी अनेक कामे केली.पहिल्यांदा मंडल आयोग लागू करण्याची भूमिका शरदचंद्र पवार साहेबांनी घेतली. त्यामुळे ओबीसी समाजाला न्याय मिळाला. तसेच महिलांना राजकारणात ५० टक्के आरक्षण,डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर असे बहुजन हिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले.त्यामुळे पवार साहेब हे राज्याचेच नव्हे तर देशाचे नेते बनले आहे. ते जनतेचे कैवारी आहे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे म्हणून त्यांना देशाचे जाणते राजे म्हटले जाते.याबाबत पडळकर यांनी माहिती घ्यावी केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आपला बालिशपणा जनतेसमोर दाखवू नये,अशी बोचरी टीका समीर भुजबळ यांनी केली आहे.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...