Skip to main content

श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी खा.भारती पवार यांच्या उपस्थितीत घंटानाद आंदोलन

नाशिक| भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाविकास आघाडी  सरकारला जागे करून भाविकांसाठी देवस्थाने खुली करण्यासाठी  श्री क्षेत्र सप्तशृंगी निवासीनी भगवती गडाच्या पायथ्याशी घंटानाद आंदोलन  करण्यात आले.
A-bell-ringing-agitation-at-the-foot-of-Shrikshetra-Saptashrungi-fort
देशभरातील प्रमुख धार्मिक स्थळे, देवालये सुरू करण्याबाबत केंद्र सरकारने परीपत्रक काढले असताना देखील, सरकारच्या अजब  निर्णयाने राज्यातील देवालये सर्वांसाठी खुले झाले मात्र मंदिरे बंद ठेवून भाविकांची कुचंबणा केली तसेच तिर्थक्षेत्र परिसरातील बहुसंख्य लोकांची उपजीविका देवस्थानावर अवलंबून आहे. त्याअनुषंगाने सर्व नियम,मान्य करून देवस्थाने, भजन, किर्तन सुरू करावे हि सर्वांची एकमुखाने मागणी होती. म्हणून भाजपच्या प्रदेशच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.श्री क्षेत्र सप्तशृंगी गड येथे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खा.डॉ.भारती पवार, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खैरनार, मा.जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, तालुकाध्यक्ष दिपक खैरनार यांच्या नेतृत्वाखाली गडाच्या पायथ्याशी घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलन प्रसंगी सप्तशृंगी गड व परिसरातील मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी जेष्ठ नेते गोविंद कोठावदे, सरचिटणीस विश्वास पाटील, जि.का.सदस्य सचिन सोनवणे, महिला मोर्चा अध्यक्ष  सोनाली जाधव,  सरचिटणीस कृष्ण कुमार कामळस्कर, किसान आघाडी अध्यक्ष  काशिनाथ गुंजाळ, उपाध्यक्ष मोती.वाघ, हेमंत रावले, गोरख पवार,  वाघ सर,यतिन पवार, युवा मोर्चा अध्यक्ष हितेंद्र पगार ,प्रविण रौंदळ, दिनेश आहेर, चिटणीस  रामकृष्ण पगार, ऊमेश पगार, रुपेश शिरोडे, अमित देवरे, चंद्रकांत पवार, संतोष आहेर, पंकज पवार, सुनिल पवार, रविंद्र पवार, शहराध्यक्ष  प्रकाश कडवे, विनायक दुबे, पुरोहित संघ समाज बांधव, गोरख  पवार, समाधान वाघ, संतोष आहेर, मिलिंद दिक्षीत, प्रकाश जोशी आदी कार्यकर्ते व भाविक भक्त मोठ्या संख्येने आंदोलनास उपस्थित होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...