Skip to main content

नाशिकला आंतरराष्ट्रीय कुरिअर हबसाठी प्रयत्नशील: जीएसटी आयुक्त अविनाश थेटे  

नाशिक| केंद्र सरकारच्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन अँण्ड कस्टम विभागातर्फे नाशिकला राज्यातील दुसरे आंतरराष्ट्रीय कुरिअर हब बनविण्यास मान्यता दिली आहे. आंतरराष्ट्रीय कुरिअर हब लवकरात लवकर सुरु होण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन जीएसटी (कस्टम) आयुक्त अविनाश थेटे यांनी चेंबरच्या शिष्टंडळाला दिले.
Gst-commissionar
फोटो क्रेडिट:अविनाश पाठक
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रीकल्चरच्या नेत्तृत्वाखाली सर्व औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींनी नाशिकचे जीएसटी (कस्टम) आयुक्त श्री. अविनाश थेटे यांची भेट घेऊन आंतरराष्ट्रीय कुरिअर हब संदर्भात चर्चा केली व महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांच्या हस्ते नाशिकचे जीएसटी (कस्टम) आयुक्त श्री. अविनाश थेटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना जीएसटी (कस्टम) आयुक्त श्री. अविनाश थेटे यांनी आंतरराष्ट्रीय कुरिअर हब होण्यासाठी नाशिकला पोषक वातावरण आहे उद्योगाबरोबरच अग्रीकल्चर मालालाही जागतिक बाजारपेठेत स्थान मिळविणे आणि वेळेत माल पोचविणे शक्य होणार असल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय कुरिअर हब लवकरात लवकर सुरु होण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन प्रतिनिधींना दिले. 
याप्रसंगी कस्टम सहआयुक्त श्री. महिपालसिंग,  सहाय्यक आयुक्त  श्री. आर के जैन आणि हॅल्कॉनचे  सीईओ  श्री. सुधाकर सेन यांचा सत्कार श्री. ललित बुब, श्री. सी एस.  सिंग , श्री.  यतीन पटेल यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. सुरवातीला महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांनी नाशिकला श्री. थेटे यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय कुरिअर हब जाहीर झाल्याबद्दल  श्री. थेटे यांचा सत्कार व अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्र चेंबरच्या कार्याची माहिती दिली. जागतिक बाजारपेठेत राज्यातील व नाशिकच्या व्यापारी उद्योजकांना संधी मिळावी व्यापार उद्योग  वाढावा यासाठी चेंबरने केलेल्या विविध देशांचे दौरे तेथील चेंबरबरोबर केले करार व बिझनेस उपक्रमांची माहिती दिली.  त्यामुळे नाशिकला होत असलेल्या आंतरराष्ट्रीय कुरिअर हबचा मोठ्या प्रमाणात नाशिक व जवळपासच्या शेतकरी, व्यापारी उद्योजकांना होईल व त्यांचा पैसा व वेळ वाचून फायदा होऊन व्यापार-उद्योगाला चालना मिळेल, रोजगार निर्मिती होईल व जगाच्या हवाई नकाशावर नाशिकचे नाव येईल त्याचा निश्चितच नाशिकला मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले.  

नाशिक कस्टम ब्रोकर असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. सी.  एस.  सिंग  नाशिकच्या व्यापारी, उद्योजक शेतकऱ्यांना माल पाठवायचा असेल तर मुंबई शिवाय पर्याय नाही त्यासाठी नाशिक कार्गो व्हावे, विमानसेवा सुरु व्हावी म्हणून सर्वजण प्रयत्नशील होते. नाशिकला विमानसेवा सुरु झाली मात्र पूर्णपणे सुरु नसल्याने अडचणी आहेत तरी सुद्धा नाशिकहून प्रदेशात माल मोठ्या प्रमाणात पाठविला जात आहे. नाशिकला आंतरराष्ट्रीय कुरिअर हब सुरु होत असल्याने त्याचा परिणाम नाशिकच्या व्यापार उद्योगाला जागतिक बाजारपेठेत आपले स्थान बळकट करण्यास मदत होणार असल्याचे श्री. सिंग म्हणाले.आयमाचे सरचिटणीस श्री ललित बूब, श्री सुरेश माळी, नाशिक कस्टम ब्रोकर असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. सी. एस.  सिंग, श्री यतीन पटेल,श्री. वेदांशु पाटील, सचिव चंद्रकांत दीक्षित, अविनाश पाठक उपस्थित होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...