Skip to main content

देव द्या, देवपण घ्या ! या स्तुत्य उपक्रमात नाशिककरांनी सहभागी व्हावे: विनायकदादा पाटील

नाशिक|प्रतिनिधी| विद्यार्थी कृती समितीच्या वतीने गोदावरीचे प्रदूषण रोकण्यासाठी राबविण्यात येत असलेला देव द्या, देवपण घ्या ! हा स्तुत्य उपक्रम असून नाशिककरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन माजी मंत्री विनायकदादा पाटील यांनी केले आहे. 
Vinayk-dada-patil
गेल्या दहा वर्षे हा कार्यक्रम नाशिककरांचे प्रबोधन करून प्रदूषण मुक्तीकडे झुकत आहे हे या उपक्रमाचे यश असल्याचेही ते म्हणाले. यंदाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देव द्या, देवपण घ्या ! या उपक्रमांतर्गत गणेश मूर्ती संकलित करण्यासाठी सहभाग नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांना सुरक्षिततेसाठी विद्याथी कृती समितीच्या वतीने फेस शिल्ड, फेस मास्क, हातमोजे, सॅनिटायझर देण्यात येत आहे. या ‘फेस शिल्ड’चे प्रकाशन माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.  

देव द्या, देवपण घ्या हा फक्त उपक्रम राहिला नसून गोदावरीच्या रक्षणासाठी ती एक प्रशंसनीय चळवळ* झाल्याचे देखील विनायकदादा पाटील यावेळी म्हणाले.या  फेस शिल्डवर देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमाचे नाव व महिती ठळकपणे दिसून येते. यावेळी नाशिक जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड.नितीन ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनीही मार्गदर्शन केले. विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातून युवकांची शक्ती विधायक कार्यात सहभागी होत आहे हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार अॅड.नितीन ठाकरे यांनी यावेळी बोलतांना काढले.

प्रास्ताविकात विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची महिती दिली. गोदावरी नदीचे प्रदूषण रोकण्यासाठी जनजागृती करणाऱ्या माहितीपत्रकांचे देखील विद्यार्थी कृती समितीच्या वतीने घराघरात वाटप करण्यात आले आहे. देव द्या, देवपण घ्या ! ह्या उपक्रमाची युवकांकडून मोठया प्रमाणावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. दिड दिवस, पाच दिवस व सात दिवसांच्या गणेशोत्सवातील मूर्तीं देखील विद्यार्थी कृती समितीकडे  सुपूर्द करण्यात आल्या असल्याची माहिती आकाश पगार यांनी यावेळी दिली.
यावेळी आकाश पगार, विशाल गांगुर्डे,  सागर बाविस्कर, तुषार गायकवाड, राहुल मकवाना, योगेश निमसे, संदीप अहिरे, संकेत निमसे, अविनाश बरबडे, शुभम पगार, भावेश पवार, निशिकांत मोगल यांच्यासह कार्यकर्ते  उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमात स्वयंसेवक सोशल डिस्टक्शनचे सर्व नियम पाळून दि.१ सप्टेंबर २०२० रोजी चोपडा लॉन्स जवळील गोदापार्क येथे सकाळी ८ वाजेपासून मूर्ती स्विकारण्यासाठी विद्यार्थी कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार असून गणेश भक्तांना आरती करण्याची व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती आकाश पगार यांनी दिली आहे. यंदाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देव द्या, देवपण घ्या ! या उपक्रमांतर्गत गणेश मूर्ती संकलित करण्यासाठी सहभाग नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांना सुरक्षिततेसाठी विद्याथी कृती समितीच्या वतीने मोफत फेस शिल्ड, फेस मास्क, हातमोजे, सॅनिटायझर देण्यात येत आहे.


देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमाच्या फेस शिल्डचे प्रकाशन करतांना माजी मंत्री विनायकदादा पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार, नाशिक जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड.नितीन ठाकरे, विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार, विशाल गांगुर्डे, सागर बाविस्कर, तुषार गायकवाड, राहुल मकवाना, योगेश निमसे, संकेत निमसे, अविनाश बरबडे, संदीप अहिरे, संकेत निमसे, शुभम पगार, भावेश पवार आदि दिसत आहेत.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...