Skip to main content

देव द्या, देवपण घ्या ! या स्तुत्य उपक्रमात नाशिककरांनी सहभागी व्हावे: विनायकदादा पाटील

नाशिक|प्रतिनिधी| विद्यार्थी कृती समितीच्या वतीने गोदावरीचे प्रदूषण रोकण्यासाठी राबविण्यात येत असलेला देव द्या, देवपण घ्या ! हा स्तुत्य उपक्रम असून नाशिककरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन माजी मंत्री विनायकदादा पाटील यांनी केले आहे. 
Vinayk-dada-patil
गेल्या दहा वर्षे हा कार्यक्रम नाशिककरांचे प्रबोधन करून प्रदूषण मुक्तीकडे झुकत आहे हे या उपक्रमाचे यश असल्याचेही ते म्हणाले. यंदाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देव द्या, देवपण घ्या ! या उपक्रमांतर्गत गणेश मूर्ती संकलित करण्यासाठी सहभाग नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांना सुरक्षिततेसाठी विद्याथी कृती समितीच्या वतीने फेस शिल्ड, फेस मास्क, हातमोजे, सॅनिटायझर देण्यात येत आहे. या ‘फेस शिल्ड’चे प्रकाशन माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.  

देव द्या, देवपण घ्या हा फक्त उपक्रम राहिला नसून गोदावरीच्या रक्षणासाठी ती एक प्रशंसनीय चळवळ* झाल्याचे देखील विनायकदादा पाटील यावेळी म्हणाले.या  फेस शिल्डवर देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमाचे नाव व महिती ठळकपणे दिसून येते. यावेळी नाशिक जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड.नितीन ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनीही मार्गदर्शन केले. विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातून युवकांची शक्ती विधायक कार्यात सहभागी होत आहे हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार अॅड.नितीन ठाकरे यांनी यावेळी बोलतांना काढले.

प्रास्ताविकात विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची महिती दिली. गोदावरी नदीचे प्रदूषण रोकण्यासाठी जनजागृती करणाऱ्या माहितीपत्रकांचे देखील विद्यार्थी कृती समितीच्या वतीने घराघरात वाटप करण्यात आले आहे. देव द्या, देवपण घ्या ! ह्या उपक्रमाची युवकांकडून मोठया प्रमाणावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. दिड दिवस, पाच दिवस व सात दिवसांच्या गणेशोत्सवातील मूर्तीं देखील विद्यार्थी कृती समितीकडे  सुपूर्द करण्यात आल्या असल्याची माहिती आकाश पगार यांनी यावेळी दिली.
यावेळी आकाश पगार, विशाल गांगुर्डे,  सागर बाविस्कर, तुषार गायकवाड, राहुल मकवाना, योगेश निमसे, संदीप अहिरे, संकेत निमसे, अविनाश बरबडे, शुभम पगार, भावेश पवार, निशिकांत मोगल यांच्यासह कार्यकर्ते  उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमात स्वयंसेवक सोशल डिस्टक्शनचे सर्व नियम पाळून दि.१ सप्टेंबर २०२० रोजी चोपडा लॉन्स जवळील गोदापार्क येथे सकाळी ८ वाजेपासून मूर्ती स्विकारण्यासाठी विद्यार्थी कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार असून गणेश भक्तांना आरती करण्याची व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती आकाश पगार यांनी दिली आहे. यंदाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देव द्या, देवपण घ्या ! या उपक्रमांतर्गत गणेश मूर्ती संकलित करण्यासाठी सहभाग नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांना सुरक्षिततेसाठी विद्याथी कृती समितीच्या वतीने मोफत फेस शिल्ड, फेस मास्क, हातमोजे, सॅनिटायझर देण्यात येत आहे.


देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमाच्या फेस शिल्डचे प्रकाशन करतांना माजी मंत्री विनायकदादा पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार, नाशिक जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड.नितीन ठाकरे, विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार, विशाल गांगुर्डे, सागर बाविस्कर, तुषार गायकवाड, राहुल मकवाना, योगेश निमसे, संकेत निमसे, अविनाश बरबडे, संदीप अहिरे, संकेत निमसे, शुभम पगार, भावेश पवार आदि दिसत आहेत.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...