Skip to main content

मित्रा पांडुरंग, तुझी आठवण कायम येत राहिल: पत्रकार शरद जाधव

पांडुरंग सोडून गेला यावर अजूनही विश्वास बसत नाही. चांगला सहकारी आणि मूळात उत्तम माणूस...कायम हसणारा, संयमी, कधी कुणाला न दुखावणारा पांडुरंग.. मित्रा मनाला चटका लावून गेलास तू.. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं महानगर असलेल्या पुण्यात पांडुरंगला वाचवण्यासाठी प्रशासन कमी पडलं यापेक्षा दुर्देव काय म्हणता येईल..? पेशंटसाठी ऑक्सिजन बेड न मिळणं, दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी वेळेवर कार्डियाक ॲम्ब्युलन्सही न मिळणं हे धक्कादायक आहे.. 
Friend-Pandurang-I-will-always-remember-you-Journalist-Sharad-Jadhav
ई.टी.व्ही.मराठी, एबीपी (स्टार)माझा, tv9 मराठी दोन्ही ठिकाणी आम्ही सोबतच काम केले..कायम माती आणि शेतीशी नाळ जोडलेला पत्रकार.. बोलण्यातही गावरानपणा..त्यामुळे एबीपीच्या डेस्कवर आमची चांगलीच गट्टी जमायची.. सातबाराचं बातमीपत्र करत असल्यामुळे पांडुरंग लवकर ऑफिसला यायचा.. त्यामुळे दुपारच्या जेवणासाठी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही सोबतच जायचो..

पांडुरंग नगरला रिपोर्टिंगसाठी गेल्यानंतरही मी असाईन्मेंट असल्यामुळे आमचे दररोज बोलणे व्हायचं.. इकडे आता tv9 ला काम करतानाही आम्ही नेहमी बोलायचो.... सुरुवातीलाच पांडुरंगची 'नेते..शरदराव' म्हणून हाक असायची.. आधी घरी काय याची विचारणा करणार.. मग हळूच एखाद्या राहिलेल्या बातमीचा विषय काढायची पांडुरंगची सवय..

शेवटपर्यंत पांडुरंग अत्यंत साधा राहिला.. त्याच्या बोलण्या-वागण्यात कधीच चालूपणा आला नाही.. कुणी कितीही चीडलं, तरी त्याच्या बोलण्यातील संयम सुटला नाही..त्यामुळे भेटताच क्षणी समोरच्या मनात घर करून घ्यायचा..अत्यंत चांगला, मनमिळावू मित्र असा अचानक जाण्यानं खूप वाईट वाटतं आहे.

गेल्या दीड महिन्यातील माझा हा तिसरा पत्रकार मित्र कोरोनानं गिळंकृत केलाय.. नंदुरबारचा जयप्रकाश डिगराळे, नाशिकचा अजय पाटील या दोघा मित्रांचे अगदी कमी वयात कोरोनामुळे निधन झाले.. त्यानंतर आता पांडुरंगच्या अकाली निधनानं तर मन सुन्न झालंय.. 

पांडुरंगच्या घटनेनं महाराष्ट्रातील मुर्दाड स्थिती उघड झालीय..  त्यामुळे मित्रांनो स्वत:ची काळजी स्वत: घ्या.. आपल्या जीवापेक्षा काहीच महत्वाचं नाही, हे मनावर बिंबवून घ्या.. काम महत्वाचं आहेच, पण त्याहून जास्त मोल तुमच्या आयुष्याला आहे.. त्यामुळे जराही तब्येत खराब वाटत असेल तर तात्काळ डॉक्टरकडे जा.. ताण घेवू नका.. नकारात्मक विचार करू नका..मित्रांशी, घरच्यांशी बोलत राहा.. 

मित्रा पांडुरंग, वेळोवेळी तुझी आठवण येत राहिल.. तुझे ते हळूवार बोलणे.. लाईव्हमध्येही आरामात विस्तृत माहिती देणे आठवत राहिल.

शरद जाधव 
वरिष्ठ पत्रकार, टीव्ही-९ 

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...