Skip to main content

मित्रा पांडुरंग, तुझी आठवण कायम येत राहिल: पत्रकार शरद जाधव

पांडुरंग सोडून गेला यावर अजूनही विश्वास बसत नाही. चांगला सहकारी आणि मूळात उत्तम माणूस...कायम हसणारा, संयमी, कधी कुणाला न दुखावणारा पांडुरंग.. मित्रा मनाला चटका लावून गेलास तू.. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं महानगर असलेल्या पुण्यात पांडुरंगला वाचवण्यासाठी प्रशासन कमी पडलं यापेक्षा दुर्देव काय म्हणता येईल..? पेशंटसाठी ऑक्सिजन बेड न मिळणं, दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी वेळेवर कार्डियाक ॲम्ब्युलन्सही न मिळणं हे धक्कादायक आहे.. 
Friend-Pandurang-I-will-always-remember-you-Journalist-Sharad-Jadhav
ई.टी.व्ही.मराठी, एबीपी (स्टार)माझा, tv9 मराठी दोन्ही ठिकाणी आम्ही सोबतच काम केले..कायम माती आणि शेतीशी नाळ जोडलेला पत्रकार.. बोलण्यातही गावरानपणा..त्यामुळे एबीपीच्या डेस्कवर आमची चांगलीच गट्टी जमायची.. सातबाराचं बातमीपत्र करत असल्यामुळे पांडुरंग लवकर ऑफिसला यायचा.. त्यामुळे दुपारच्या जेवणासाठी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही सोबतच जायचो..

पांडुरंग नगरला रिपोर्टिंगसाठी गेल्यानंतरही मी असाईन्मेंट असल्यामुळे आमचे दररोज बोलणे व्हायचं.. इकडे आता tv9 ला काम करतानाही आम्ही नेहमी बोलायचो.... सुरुवातीलाच पांडुरंगची 'नेते..शरदराव' म्हणून हाक असायची.. आधी घरी काय याची विचारणा करणार.. मग हळूच एखाद्या राहिलेल्या बातमीचा विषय काढायची पांडुरंगची सवय..

शेवटपर्यंत पांडुरंग अत्यंत साधा राहिला.. त्याच्या बोलण्या-वागण्यात कधीच चालूपणा आला नाही.. कुणी कितीही चीडलं, तरी त्याच्या बोलण्यातील संयम सुटला नाही..त्यामुळे भेटताच क्षणी समोरच्या मनात घर करून घ्यायचा..अत्यंत चांगला, मनमिळावू मित्र असा अचानक जाण्यानं खूप वाईट वाटतं आहे.

गेल्या दीड महिन्यातील माझा हा तिसरा पत्रकार मित्र कोरोनानं गिळंकृत केलाय.. नंदुरबारचा जयप्रकाश डिगराळे, नाशिकचा अजय पाटील या दोघा मित्रांचे अगदी कमी वयात कोरोनामुळे निधन झाले.. त्यानंतर आता पांडुरंगच्या अकाली निधनानं तर मन सुन्न झालंय.. 

पांडुरंगच्या घटनेनं महाराष्ट्रातील मुर्दाड स्थिती उघड झालीय..  त्यामुळे मित्रांनो स्वत:ची काळजी स्वत: घ्या.. आपल्या जीवापेक्षा काहीच महत्वाचं नाही, हे मनावर बिंबवून घ्या.. काम महत्वाचं आहेच, पण त्याहून जास्त मोल तुमच्या आयुष्याला आहे.. त्यामुळे जराही तब्येत खराब वाटत असेल तर तात्काळ डॉक्टरकडे जा.. ताण घेवू नका.. नकारात्मक विचार करू नका..मित्रांशी, घरच्यांशी बोलत राहा.. 

मित्रा पांडुरंग, वेळोवेळी तुझी आठवण येत राहिल.. तुझे ते हळूवार बोलणे.. लाईव्हमध्येही आरामात विस्तृत माहिती देणे आठवत राहिल.

शरद जाधव 
वरिष्ठ पत्रकार, टीव्ही-९ 

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...