Skip to main content

फेब्रुवारीतील सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; लवकरच नवीन तारखा जाहीर करू: पोखरियाल

नवी दिल्ली|बोर्डाच्या परीक्षेच्या तारखांशी संबंधित प्रश्नावर उत्तर देताना पोखरियाल म्हणाले की हे सरकार विद्यार्थीभिमुख असल्याने आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम केले आहे. सीबीएसई 2021 च्या परीक्षा घेण्यासाठी आवश्यक तयारी करीत आहे.  फेब्रुवारी महिन्यात बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत आणि सीबीएसई लवकरच संबंधितांशी चर्चा करून परीक्षेच्या तारखा जाहीर करेल असे पोखरियाल यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

CBSE-board-exams-postponed-in-read-what-the-education-minister-said
फोटो:फाईल

केंद्रीय शिक्षणमंत्री  रमेश पोखरियाल निशंक’ यांनी आज आगामी स्पर्धात्मक व बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात देशभरातील शिक्षकांशी आभासी माध्यमातून संवाद साधला. यावेळी पोखरियाल म्हणाले की,  गुरूचे महत्त्व हे नेहमीच देवापेक्षाही अधिक आहे आणि म्हणूनच आचार्य देवो भव: ही भावना निरंतर मनात ठेवून आपण सर्व शिक्षकांचा आदर केला पाहिजे.  शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच देशाची ऑनलाईन शिक्षण व्यवस्था यशस्वी झाली आहे असे ते म्हणाले.  विद्यार्थी आणि समाजात मोठ्या प्रमाणात  कोविड -19 संबंधित जनजागृती केल्याबद्दल त्यांनी सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कोविड 19  विरोधातील या युद्धामध्ये प्रामाणिकपणे सहभागी झाल्याबद्दल त्यांनी शिक्षकांचे आभार मानले.

इयत्ता नववीमध्ये व्यावसायिक शिक्षण देण्याच्या सूचनेबाबत पोखरीयाल म्हणाले की जवळपास 8,583 सीबीएसई शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षण दिले जात आहे.   एनईपी 2020 लागू झाल्यानंतर 2,80,000 पेक्षा जास्त माध्यमिक शाळा , जवळपास 40,000 महाविद्यालये आणि 1,000 हून अधिक विद्यापीठांतून विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसह व्यावसायिक शिक्षण मिळेल अशी अपेक्षा आहे.

शिक्षकांना शाळांमध्ये कार्यक्षमता आधारीत शिक्षणाच्या अंमलबजावणीसंदर्भात पुरेसे प्रशिक्षण दिले जावे या सूचनेला उत्तर देताना पोखरीयाल यांनी सांगितले की शिक्षण मंत्रालयाने देशातील 42,00,000 प्राथमिक शाळेतील शिक्षक व शाळेतील मुख्याध्यापकांसाठी ऑनलाईन क्षमता निर्माण करणारा निष्ठा कार्यक्रम राबविला आहे. देशात साथीच्या आजाराचा उद्रेक होण्याआधी हा कार्यक्रम समोरासमोर राबविण्यात येत होता. त्यानंतर देशभरात साथीच्या आजाराचा उद्रेक झाल्यानंतर महामारीच्या काळात अध्यापन आणि शिक्षणाच्या आवश्यकता लक्षात घेत यात बदल करून हा 100% ऑनलाईन करण्यात आला.

लॉकडाउन सुरू होताच सीबीएसईकेव्हीएस आणि जेएनव्ही यांनी त्यांच्या शिक्षकांची ऑनलाईन शिकवण्याची क्षमता वाढविण्यासाठीशक्य असेल तेथे ऑनलाइन पद्धतीने शिकवण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपक्रम राबविले. या प्रक्रियेत सीबीएसईने संपूर्ण भारतात 4,80,000 शिक्षकांनाकेव्हीएसने 15855 आणि जेएनव्हीने 9085 शिक्षकांना प्रशिक्षण दिले. एनव्हीएसने शिक्षकांना ऑनलाईन मूल्यांकन संबंधी देखील प्रशिक्षण दिले. पोखरियाल पुढे म्हणाले की शिक्षकांना शोध आधारित आणि अनुभवात्मक शिक्षणासाठी सतत प्रशिक्षण दिले जाते. शालेय शिक्षणासाठी नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (एनसीएफ) देखील सुरू केला आहे आणि एनसीईआरटीकडून नवीन एनसीएफच्या अनुषंगाने पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्याची अपेक्षा आहे. सर्जनशील विचारजीवन कौशल्यभारतीय नीतिकला आणि समाकलन इत्यादी क्षेत्रे एकत्रित करणे आवश्यक आहे.

 

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...