Skip to main content

सरकारला शेतकरी आंदोलकांचे पत्र; काय आहे चर्चेसाठीचा अजेंडा..वाचा

टीम अँकर
नवी दिल्ली| सरकारतर्फे शेतकरी आंदोलकांना पत्र पाठवण्यात आले होते, त्याला उत्तर देत शेतकरी आंदोलकांनी चर्चेसाठी चार मुद्यांचा अजेंडा सरकारला दिला आहे. त्यावर २९ डिसेंबर रोजी बैठक घेऊन सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार असल्याचे आज सांगण्यात आले. त्यामुळे सर्व देशाचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.
Now-the-letter-of-the-farmer-to-the-government-What-is-the-agenda-for-discussion-read
फोटो:फाईल
किसान संघटनांच्या नेत्यांची आज बैठक झाली. त्यात आंदोलकांनी घेतलेल्या निर्णयाबाबत पत्रकारांना माहिती देण्यात आली. याप्रसंगी संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य डॉ. दर्शनपाल, योगेंद्र यादव, बलबीरसिंग ककाजी, बिपिन पटेल, प्रतिभा शिंदे, रणजीतसिंह राजू, जगनमोहन उत्पल, चौधरी हरपालसिंग आदि नेते बैठकीला उपस्थित होते. 

सरकारने शेतकरी संघटनांना पत्र पाठवून सर्व मुद्यांवर आदरपूर्वक चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले.  शेतकरी संघटनांनी त्यावर एकमताने विचार करत सरकारला प्रतिसाद देत सरकारशी चर्चा तयारी दर्शवली असून संयुक्त किसान मोर्चाने चार कलमी अजेंडा दिला असून त्यावर २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता बैठक घेण्याचे कळवले आहे. अशी माहिती आज संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.

सरकारने पत्रात सांगितलेल्या बाबींवर  बैठकीत चर्चा करून सरकारला अजेंडा दिला असून त्यात पुढील मुद्यांचा समावेश आहे. १) तीनही कृषी कायदे रद्द करण्यासाठी एक पद्धत असावी २) एमएसपीबाबत कायदेशीर हमी प्रक्रिया हवी ३) पराली दंडापासून शेतकऱ्यांची मुक्ती ४) वीज कायद्यातील मसुद्यात बदल हवा अशा प्रकारची मुद्दे शेतकरी आंदोलकांनी सरकारला पाठवलेल्या पत्रात नमूद असल्याचे सांगितले आहे. 

गेल्या ३१ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा तिढा सुटतो की नाही हे आता दि. २९ डिसेंबरच्या बैठकीनंतरच स्पष्ट होईल. तसेच आंदोलनावर कोणताही तोडगा निघाला नाही तर ३० रोजी शेतकरी सिंघू मार्गे टिकरी, शहाजहांपूर बोर्डरवर ट्रॅक्टर मोर्चा काढतील. त्यानंतर १ जानेवारी नवीन वर्ष शेतकऱ्यांसोबत साजरे करा असे आवाहन शेतकरी नेत्यांनी जनतेला केले आहे. 

 

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...