Skip to main content

सरकारला शेतकरी आंदोलकांचे पत्र; काय आहे चर्चेसाठीचा अजेंडा..वाचा

टीम अँकर
नवी दिल्ली| सरकारतर्फे शेतकरी आंदोलकांना पत्र पाठवण्यात आले होते, त्याला उत्तर देत शेतकरी आंदोलकांनी चर्चेसाठी चार मुद्यांचा अजेंडा सरकारला दिला आहे. त्यावर २९ डिसेंबर रोजी बैठक घेऊन सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार असल्याचे आज सांगण्यात आले. त्यामुळे सर्व देशाचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.
Now-the-letter-of-the-farmer-to-the-government-What-is-the-agenda-for-discussion-read
फोटो:फाईल
किसान संघटनांच्या नेत्यांची आज बैठक झाली. त्यात आंदोलकांनी घेतलेल्या निर्णयाबाबत पत्रकारांना माहिती देण्यात आली. याप्रसंगी संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य डॉ. दर्शनपाल, योगेंद्र यादव, बलबीरसिंग ककाजी, बिपिन पटेल, प्रतिभा शिंदे, रणजीतसिंह राजू, जगनमोहन उत्पल, चौधरी हरपालसिंग आदि नेते बैठकीला उपस्थित होते. 

सरकारने शेतकरी संघटनांना पत्र पाठवून सर्व मुद्यांवर आदरपूर्वक चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले.  शेतकरी संघटनांनी त्यावर एकमताने विचार करत सरकारला प्रतिसाद देत सरकारशी चर्चा तयारी दर्शवली असून संयुक्त किसान मोर्चाने चार कलमी अजेंडा दिला असून त्यावर २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता बैठक घेण्याचे कळवले आहे. अशी माहिती आज संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.

सरकारने पत्रात सांगितलेल्या बाबींवर  बैठकीत चर्चा करून सरकारला अजेंडा दिला असून त्यात पुढील मुद्यांचा समावेश आहे. १) तीनही कृषी कायदे रद्द करण्यासाठी एक पद्धत असावी २) एमएसपीबाबत कायदेशीर हमी प्रक्रिया हवी ३) पराली दंडापासून शेतकऱ्यांची मुक्ती ४) वीज कायद्यातील मसुद्यात बदल हवा अशा प्रकारची मुद्दे शेतकरी आंदोलकांनी सरकारला पाठवलेल्या पत्रात नमूद असल्याचे सांगितले आहे. 

गेल्या ३१ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा तिढा सुटतो की नाही हे आता दि. २९ डिसेंबरच्या बैठकीनंतरच स्पष्ट होईल. तसेच आंदोलनावर कोणताही तोडगा निघाला नाही तर ३० रोजी शेतकरी सिंघू मार्गे टिकरी, शहाजहांपूर बोर्डरवर ट्रॅक्टर मोर्चा काढतील. त्यानंतर १ जानेवारी नवीन वर्ष शेतकऱ्यांसोबत साजरे करा असे आवाहन शेतकरी नेत्यांनी जनतेला केले आहे. 

 

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...