Skip to main content

विभागीय केंद्रामध्ये संशोधन आणि प्रशिक्षण व्हावे: ना.अमित देशमुख

औरंगाबाद| नव्या जगाची गरज ओळखुन आरोग्य विद्यापीठाच्या विभागीय केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यात यावे असे प्रतिपादन विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री मा.ना.श्री.अमित देशमुख यांनी केले. 
Research-and-training-should-be-done-in-the-divisional-center-minister-Amit-Deshmukh
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयात प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास, ध्येय: शुन्य टक्के रॅगिंग अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन आणि विद्यापीठातर्फे जीवन गौरव पुरस्काराचे वितरण या समारंभात करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी  मा.ना. श्री. अमित देशमुख यांच्या समवेत व्यासपीठावर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ नितीन करमळकर,  माजी कुलगुरू    डॉ दिलीप म्हैसेकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, डॉ. अजित पाठक, श्री. एन.व्ही.कळसकर, डॉ. सचिन मुंबरे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल आदी मान्यवर उपस्थित होते.
या समारंभात अध्यक्ष स्थानावरुन बोलतांना विद्यापीठाचे मा. प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले की, विद्यापीठातर्फे विविध ठिकाणच्या विभागीय केंद्रामध्ये समुपदेशन केंद्र उभारण्यात यावेत जेणेकरुन त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होउ शकेल. विद्यापीठाकडून माजी विद्यार्थ्यांचा क्लब स्थापन करण्यात यावा यामध्ये माजी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना उपयोग होउ शकेल. वैद्यकीय महाविद्यालयांचे व रुग्णालयांचे ऑडिट करण्यात यावे यामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचायांचे, महाविद्यालयातील सुविधांचे ऑडिट व्हावे यामुळे त्यांच्या दर्जामध्ये अधिक सुधारणा होउ शकेल असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे वैद्यकीय महाविद्यालयामधील रॅंगिंग कृतीबंधात्मक दिशादर्शक पुस्तिका प्रकाशित करयात आली.  राज्यातील केवळ वैद्यकीय महाविद्यालयांनाच नव्हे तर सर्व महाविद्यालयांना उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाने गेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत विद्यापीठाचे नाशिक येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी मान्यता दिलेली आहे, लवकरच आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजीओथेरेपी अभ्यासक्रमाची विद्यापीठाची महाविद्यालये सुरु होती असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यापीठातर्फे जीवन गौरव पुरस्कारार्थींचे आजवरचे कार्य हे दिशादर्शक आणि प्रेरणा देणारे आहे असे त्यांनी अभिनंदन करतांना सांगितले.
विद्यापीठाचे मा. प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळर यांनी आरोग्य विद्यापीठाचे उपक्रम हे आरोग्य शाखांच्या विद्यार्थ्यांना निश्चितच उपयुक्त ठरणारे आहेत असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले की, विद्यार्थी केंद्रबिंदु मानुन विद्यापीठाने नेहमीच वाटचाल केली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांमध्ये रॅंगिंगमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्याने विविध संलग्नित महाविद्यालयांना भेटी घेउन ध्येय: शुन्य टक्के रॅगिंग हा उपक्रम राबविला असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी प्रास्ताविकात सांगितले की, विद्यापीठाच्या विभागीय केद्राव्दारे केल्या जाण्याया कार्याची व्याप्ती व  भूमिका स्पष्ट करुन सांगितली. याच बरोबर विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची उपस्थितांना माहिती दिली. या समारंभात मान्यवरांच्या हस्ते ध्येयः शून्य टक्के रॅगिंग या पुस्तिकेचे प्रकाशन विद्यापीठाचे    मा. प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले. याच बरोबर आरोग्य शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ताींना विद्यापीठातर्फे जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात येतो. यावर्शी वैद्यकीय विद्याशाखेतील जीवनगौरव पुरस्कार डॉ. अरुण महाले, डॉ. इंदुप्रकाश गजभिये,  डॉ. शरद कोकाटे यांना तर दंत विद्याशाखेतील पुरस्कार डॉ. रमेश गांगल यांना तसेच होमिओपॅथी विद्याशाखेतील पुरस्कार डॉ. अरुण भस्मे यांना प्रदान करण्यात आले.

या समारंभाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले तर मा. उपकुलसचिव डॉ. सुनिल फुगारे यांनी आभार प्रदर्शन केले. या समारंभास विविध क्षेत्रातील व्यक्ती, मा. प्राधिकरण सदस्य, मान्यवर व अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. या समारंभात कोविड-19 करीता शासनाने निर्देशित केलेल्या सूचनांचे पालन करण्यात आले.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...