नाशिक| नाशिक जिल्ह्यातील पेठ, कनाशी, वणी, सटाणा, पिंपळगाव बसवंत, ननाशी या भागांत गेल्या काही दिवसांपासून ही सेवा बंद आहे. ही सेवा सुरळीत करण्यासोबत रुग्णवाहिकेची संख्या वाढवावी अशी मागणी खा. डॉ. भारती पवार यांनी संसदेत केली आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत गंभीररित्या पिडीत रुग्णांना तातडीने उपचार मिळण्याच्या हेतूने १०८ अम्बुलन्सच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये सेवा दिली जात आहे. विशेष म्हणजे अतिदुर्गम आणि आदिवासी भागात या सेवेचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. परंतु नाशिक जिल्ह्यातील पेठ, कनाशी, वणी, सटाना, पिंपळगाव बसवंत, ननाशी या भागांत गेल्या काही दिवसांपासून हि सेवा बंद आहे. कारणास्तव तेथील रुग्णांना १०८ अम्बुलन्सची अति आवश्यकता असताना देखील ती वेळेवर उपलब्ध न झाल्याने पिडीत रुग्ण रुग्णालयात वेळेवर पोहचू शकत नाही, आणि अशा कारणास्तव रुग्णांचा मृत्यू देखील होतो.
दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.भारती पवार यांनी संसदेच्या सभापती महोदयांच्या माध्यमातून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला विनंती केली कि, या विषयाचे पुनरावलोकन करून १०८ ची सेवा लवकरात लवकर सुरळीत सुरु करण्यात यावी आणि नाशिक जिल्यातील १०८ अम्बुलन्सची संख्या देखील वाढविण्यात यावी ही देखील मागणी यावेळी करण्यात आली.