Skip to main content

समाज कल्याण कर्मचाऱ्यांकडून माणूसकीचे दर्शन; कोरोनामुळे निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटूंबास १ लाखांची मदत

नाशिक| कोरोनामुळे आकस्मिक निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटूंबाच्या पाठीमागे उभे राहून माणूसकी कुठेतरी जिवंत असल्याचं उदाहरण समाज कल्याण कर्मचाऱ्यांनी समाजापुढे ठेवले आहे. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नंदुरबार कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक जितेंद्र साळुंखे (वय 47) यांचे 5 एप्रिल रोजी कोरोनामुळे निधन झाले. घरातील कर्ता पुरूष अचानक सोडून गेल्यामुळे त्यांच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. तेव्हा या कुटूंबाच्या पाठीमागे उभे राहत समाज कल्याण कर्मचाऱ्यांनी त्यांना मानसिक आधार तर दिला ; परंतु 1 लाखांचा निधी तात्काळ जमा करून कुटूंबाच्या स्वाधीन केला. 
A-vision-of-humanity-from-social-welfare-workers-1-lakh-assistance-to-the-family-of-an-employee-who-died-due-to-corona
जितेंद्र साळुंखे यांचं संपूर्ण कुटूंब कोरोना पॉझिटिव्ह होते. आई, पत्नी , मुलगा व स्वत:जितेंद्र साळुंखे यांच्यावर धुळे येथे उपचार सुरू होते. या उपचारात त्यांची आई बरी होऊन घरीच विलीगीकरणात राहत  होती.  उपचार सुरू असतांना जितेंद्र यांचा मृत्यु झाला. मुलाच्या मृत्युचा धक्का सहन न झाल्यामुळे त्यांच्या आईचा मृत्यु झाला. मुलगा व पत्नीं यांचे उपचार चालू असल्यामुळै त्यांना जितेंद्र यांच्या मृत्युची कल्पना देण्यात आली नाही.  मुलगा व पत्नी उपचारातून बरे झाल्यावर त्यांना घडलेली हकीकत सांगण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.  यावेळी समाज कल्याण कर्मचारी या कुटूंबाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहीले. त्यांना मानसिक आधार दिला. 

समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शांताराम शिंदे, कोषाध्यक्ष राजेंद्र कांबळे, नाशिक विभाग अध्यक्ष राजेंद्र देवरे, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष के.डी.चव्हाण यांनी पुढाकार घेत राज्यातील सर्व समाजकल्याण कर्मचाऱ्यांना निधी जमा करण्याचं आवाहन केलं. या आवाहनाला समाज कल्याण कर्मचाऱ्यांबरोबर काही अधिकाऱ्यांनी ही चांगला प्रतिसाद देऊन आर्थिक मदत केली. यात राकेश महाजन, राकेश पाटील, श्रीमती अमिना शेख, डॉ.माधव कुसेकर या अधिकाऱ्यांनी भरीव आर्थिक मदत केली. 

महाराष्ट्र शासनाकडून फ्रंट लाईन वर राहून काम करणाऱ्या विभागातील कर्मचाऱ्याच्या  मृत्युनंतर कुटूंबाला 50 लाखांची मदत केली जाते. या यादीत समाज कल्याण विभाग येत नसल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना ही शासकीय मदत मिळत नाही. मात्र समाज कल्याण विभागाच्या अनेक शासकीय वसतिगृहात कोवीड सेंटर कार्यान्वीत करण्यात आले आहेत.  याठिकाणी समाज कल्याण विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून मान्यता देण्यात यावी. यासाठी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. असे समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शांताराम शिंदे यांनी सांगितले. 

जितेंद्र साळुंखे यांच्या कुटूंबाला 1 लाख रूपयांची रक्कम सुपूर्द करण्यात आली आहे. त्यांच्या मुलाच्या अनुकंपा नोकरीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. समाज कल्याण कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या माणुसकीच्या कृतीमुळे समाजातील सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. समाजापुढे एक आदर्श ऊभा केला आहे.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...