Skip to main content

रेमडीसीवर इंजेक्शन आणि ऑक्सिजन तातडीने उपलब्धता करा: खा.डॉ.भारती पवार

नाशिक| जिल्हयात कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णांना लवकरात लवकर रेमडीसीवर इंजेक्शन आणि ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन्न, औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे तसेच नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
Immediate-availability-of-injections-and-oxygen-at-Remedic-Dr-Bharti-Pawar

महाराष्ट्रामध्ये सर्वत्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने हाहाकार माजवला असताना नाशिकमध्ये कोविड-19 या आजाराने बाधित सर्वाधिक रूग्ण आहे. नाशिक जिल्ह्यातील गावागावात कोविड-19 या आजाराने बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असुन बाधित रूग्णांची प्रकृती अपुऱ्या उपाययोजनांच्या अभावामुळे चिंताजनक होत आहे. अशा परिस्थितीत रूग्णांना अतिशय गरजेच्या असणाऱ्या रेमडीसिवर इंजेक्शन व ऑक्सिजनच्या(O2) कमतरतेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. या गंभिर परिस्थितीत बाधित रूग्णांना उचित उपचार मिळावा याकरिता दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.भारती पवार यांनी तातडीने रेमडीसिवर इंजेक्शन व ओक्सिजांचा(O2) मुबलकसाठा उपलब्ध व्हावा याकरिता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांचेकडे पत्राद्वारे विनंती केली आहे.





राज्य आपत्ती प्रतिसाद निधी(SDRF) मधून जिल्ह्यातील तालुका ग्रामीण रुग्णालयांसाठी कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करा खा.डॉ.भारती पवार

जिल्हाभरात दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोविड-19 या आजाराने बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना ग्रामीण भागातील रूग्णांच्या संख्येत देखील लाक्षणिय वाढत होत आहे. या गंभिर परिस्थीत जिल्ह्यातील तालुका ग्रामिण रूग्णालयात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत असल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे. या गंभिर परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेवुन दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.भारती पवार यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची भेट घेऊन तातडीने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी(SDRF) मधून कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करून जिल्ह्यातील तालुका ग्रामिण रुग्णालयांना सुरळीत ऑक्सिजन पुरवठा करणेकामी योग्य ते नियोजन करण्याच्या खा.डॉ.भारती पवार यांनी सूचना केल्या.


जिल्हा ग्रामिण रूग्णालय नाशिक येथे ग्रामिण भागातील रूग्णांसाठी अतिरिक्त ऑक्सिजन बेडची व्यवस्था करा – खा.डॉ.भारती पवार

नाशिक जिल्ह्यातील ग्रामिण भागात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोविड-19 या आजाराने बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना जिल्हा ग्रामिण रूग्णालयातील रूग्णांसाठी असलेले बेड अपुरे पडत आहेत. ग्रामिण भागातुन शहरात येणाऱ्या रूग्णांचा आकडा वाढत असल्याने त्यांना बेड उपलब्ध होत नसल्याकारणाने मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या गंभिर परिस्थीत जिल्हा ग्रामिण रूग्णालयात ऑक्सिजन बेडची अधिक वाढ करून तातडीने व्यवस्था करावी व त्याचे योग्य ते नियोजन करण्यात यावे जेणेकरून ग्रामिण भागातुन येणाऱ्या रूग्णांची गैरसोय टाळण्यास मदत होईल व त्यांना वेळेवर योग्य तो उपचार देखील मिळण्यास मदत होईल याकरिता दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.भारती पवार यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे व जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची भेट घेऊन सूचना केल्या आहेत.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...