Skip to main content

नासिक जिल्ह्यासाठी एक हजार रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध: खा. डॉ. भारती पवार

नाशिक| कोरोना संकटाचे थैमान सुरू असतांना कोव्हीड रुग्णांची वाढलेली अमर्याद संख्या यामुळे नाशिक जिल्हयात परिस्थिती गंभीर आहे. आहे. रुग्णांच्या नातेवाईकांंकडून रोज  खा. डॉ भारती पवार यांच्याकडं मदतीची  मागणी केेली जात आहेे. त्यात रेमडीसिवर औषध उपलब्ध होत नसल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हतबल झाल्याचे दृश्य होते. अखेर खा. पवार यांनी तत्काळ हालचाली करून रेमडीसीवरची एक हजार औषधे उपलब्ध करून दिले.
Injections-available-for-one-thousand-remediciver-for-Nashik-district-Mp-Dr-Bharti-Pawar
अतिशय मन हेलवणारे संभाषण 'रुग्णांची गंभीर अवस्था त्यातच त्यांना वेळेवर न मिळणारा बेड ,त्यांना लागणारा ऑक्सीजनचा तुटवडा तसेच रेमडीसीवर हे लागणारे इंजेक्शन आणि अशी परिस्थिती असतांना ही रेमडीसीवर इंजेक्शन कशी उपलब्ध होतील विवंचनेत असतांना रेमडीसीवर उत्पादित करणाऱ्या अनेक कंपन्यांशी खा .डॉ भारती पवारांनी संभाषण करत हे  इंजेक्शन नाशिक जिल्ह्यातील रुग्णांसाठी कसे उपलब्ध करता येईल

याकडे लक्ष केंद्रित केले .त्याच बरोबर केंद्राच्या आरोग्य विभागाकडे ही सातत्याने याचा पाठपुरावा करत होत्या. गुजरात, कर्नाटक येथील उत्पादकांशी चर्चा करून शेवटी बंगलोर येथील मायलान कंपनीचे श्री नरेशजी हसीजा यांनी खा. डॉ भारती पवार यांच्या विनंतीला मान देऊन एक हजार इंजेक्शन हे नाशिक जिल्ह्यातील कोव्हीड रूग्णालयांसाठी उपलब्ध करून दिले आहे व त्याची प्रक्रिया पूर्ण करत बंगलोर येथून हे इंजेक्शन नाशिक येथे दाखल झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्ह्यात मागणी केलेल्या कोविड रुग्णालयांना त्यांच्या पेशंटच्या संख्येनुसार हे रेमडीसीवर दिले जाणार असल्याचे खा. डॉ भारती पवार यांनी सांगितले आहे अश्या कठीण परिस्थितीत  केंद्र सरकारची  मदत व जिल्हाधिकारी तथा त्यांच्या टीमने योग्य  नियोजन केले. 

तसेच रेमडीसीवर लवकरात लवकर नाशिकला उपलब्ध होण्यासाठीअन्न औषध प्रशासनाचे सह संचालक भामरे साहेब यांच्याशी हा गंभीर विषय अवगत करून रेमडीसीवर  इंजेक्शन कोरोना बाधित रुग्णांना उपलब्ध व्हावे म्हणून केलेली चर्चा  आणि याचाच परिणाम म्हणून हे एक हजार रेमडीसीवर इंजेक्शन  खा डॉ भारती पवार यांनी नाशिक जिल्ह्यासाठी उपलब्ध करून जिल्हाधिकारी श्री मांढरे साहेब यांचेकडे सुपूर्द केले व मायलॉन कंपनीचे नरेशजी हसिजा यांचे विशेष आभार मानले.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...