Skip to main content

कोरोना, म्युकरमायकोसिस आणि उपचार

म्युकरमायकोसिस हा आजार म्युकरमायसेट्स या फंगसामुळे होतो, हा आजार खूप दुर्मिळ आहे, परंतु तेवढाच गंभीर स्वरूपाचा आहे याला जर वेळीच ओळखलं नाही आणि औषध उपचार केला नाही तर जीवघेणा ठरू शकतो.
Corona-mucormycosis-and-treatment-Covid-19-dr-sanjay-sanade
फोटो: DGIPR

हा आजार होण्याचे कोणते कारणे आहेत. याचे मुख्य कारण म्युकरमायसेट्स या फंगी किंवा बुरशीमुळे होतो, हा आजार कोणाला होऊ शकतो, जे कोणी डायबिटीज , एच. आय.व्ही.किंवा कॅन्सरने बरेच दिवस आजारी असतात किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतात तेंव्हा त्यांची रोग प्रतिकारशक्ती खूप जास्त प्रमाणात कमी होऊ शकतो तेंव्हा हा फंगस नाकाद्वारे किंवा तोंडाद्वारे किंवा त्वचा वरील जखमा द्वारे शरीरात प्रवेश करून हा आजार होऊ शकतो.

आधी हा फार कमी लोकांना आजार होत होता. आपण कधी याचे नाव हि ऐकले नव्हतो. फार दुर्मिळ असा हा आजार होता. परंतु आता कोरोनामुळे आणि त्याच्यावरील वापरण्यात येण्या-या अनेक प्रकारच्या औषधांमुळे मुख्यतः स्टेरॉईडमुळे काहींची रोगप्रतिकारशक्ती फारच कमी आहे. त्यांना हा आजार होऊ शकतो परंतु कोरोना झालेल्या सर्वांनाच हा आजार होत नाही. ज्यांचे रोग प्रतिकार शक्ती फार म्हणजे फारच कमी झाला असेल तरच हा आजार होऊ शकतो. जर आपण काही काळजी घेतल्यास हा आजार होण्याचे प्रमाण अजून कमी होऊ शकतो . हा फंगी सर्वांच्याच संपर्कात येत असतो, कारण हा फंगी वातावरणात जमिनी वर दमट वातावरणात आढळतो , परंतु आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे आपल्याला हा आजार होत नाही याचे प्रमाण फार कमी आहे परंतु ज्यांचे रोगप्रतिकार शक्ती खूप कमी झाले असेल किंवा मधुमेह चा त्रास खूप जुना असेल आणि कोरोना मध्ये बरेच दिवस ऍडमिट झाला असाल तर थोडीसी काळजी घ्यायला पाहिजे खाली दिलेल्या मधील लक्षणे जर आढळ्यास लगेच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा . 

कोणती लक्षणे आढळतात 

म्युकरमायकोसिस चे काही प्रकार आहेत सध्या ‘ऱ्हायनोसेरेब्रल’ [ Rhinocerebral ] हा सर्वात जास्त लोकांमध्ये आढळत आहे .याच्यात हा फंगी नाकाद्वारे प्रवेश करून मेंदू पर्यंत पोचतो तेंव्हा हा रोग गंभीर होतो. सुरुवातीला काही लक्षणे दिसायला लागतात ते बघून लगेच डोक्टरांना भेटावे. ताप येणे, डोके दुखणे, चेह-याच्या एका बाजूला सूज येणे एक डोळा सुजणे, नाकाच्य त्वचेवरील रंग बदलणे काळे ठिपके पडणे. 

दुसया प्रकारे मध्ये हा फंगी तोंडाद्वारे आतड्यांमध्ये पोचतो आणि छोट्या आतड्यामध्ये प्रहार करतो त्यामुळे उलटी मध्ये रक्त येणे किंवा मल् मध्ये रक्त येणे
पोट भरल्या भरल्या सारखे वाटणे हे लक्षणे आहेत 


तिसऱ्या प्रकार मध्ये हा फंगी नाका द्वारे प्रवेश करून फुफ्फुसा मध्ये प्रवेश करतो आणि त्यामुळे ताप येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, दुसऱ्या प्रकारा मध्ये त्वचामधून हा फ़ंगी शरीरात प्रवेश करतो. अजून एका प्रकारे मध्ये हा रक्ताभिसरणातून सर्व शरीरभर पसरतो.

निदान करण्याचे प्रकार कोणते आहेत 

यांच्यात रक्ताच्या तपासण्या केले जातात, आजार असलेल्या भागाचे जसे फुफ्फुसाचे,  डोक्याचे, पोटाचे  सिटीस्कॅन/ एमआरआय केले जातात. ‘म्युकॉरमायकोसिस’मुळे नाकात निर्माण होणाऱ्या द्रवाची तपासणी केली जाते आणि निदान पक्कं केलं जातं.

उपचार 

ऍलोपॅथिक मध्ये इंजेकशन दिले जातात , अँटीफंगल गोळ्या वापरले जातात . हे सर्व औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानें घेतले पाहिजे. होमिओपॅथिक मध्ये प्रत्येकाचे लक्षणे बघून औषधे घेतले पाहिजे याच्यात phoshorus , Thuja , Arsenicum Album ,आणि इतर बरेच औषधे येतात ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतले पाहिजे .या आजाराबाबत काही माहिती लागल्यास 7208200618 या व्हॉट्सॲप क्रमांकावर ही संपर्क साधता येईल.


डॉ. संजय सनादे

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...