Skip to main content

कोरोना, म्युकरमायकोसिस आणि उपचार

म्युकरमायकोसिस हा आजार म्युकरमायसेट्स या फंगसामुळे होतो, हा आजार खूप दुर्मिळ आहे, परंतु तेवढाच गंभीर स्वरूपाचा आहे याला जर वेळीच ओळखलं नाही आणि औषध उपचार केला नाही तर जीवघेणा ठरू शकतो.
Corona-mucormycosis-and-treatment-Covid-19-dr-sanjay-sanade
फोटो: DGIPR

हा आजार होण्याचे कोणते कारणे आहेत. याचे मुख्य कारण म्युकरमायसेट्स या फंगी किंवा बुरशीमुळे होतो, हा आजार कोणाला होऊ शकतो, जे कोणी डायबिटीज , एच. आय.व्ही.किंवा कॅन्सरने बरेच दिवस आजारी असतात किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतात तेंव्हा त्यांची रोग प्रतिकारशक्ती खूप जास्त प्रमाणात कमी होऊ शकतो तेंव्हा हा फंगस नाकाद्वारे किंवा तोंडाद्वारे किंवा त्वचा वरील जखमा द्वारे शरीरात प्रवेश करून हा आजार होऊ शकतो.

आधी हा फार कमी लोकांना आजार होत होता. आपण कधी याचे नाव हि ऐकले नव्हतो. फार दुर्मिळ असा हा आजार होता. परंतु आता कोरोनामुळे आणि त्याच्यावरील वापरण्यात येण्या-या अनेक प्रकारच्या औषधांमुळे मुख्यतः स्टेरॉईडमुळे काहींची रोगप्रतिकारशक्ती फारच कमी आहे. त्यांना हा आजार होऊ शकतो परंतु कोरोना झालेल्या सर्वांनाच हा आजार होत नाही. ज्यांचे रोग प्रतिकार शक्ती फार म्हणजे फारच कमी झाला असेल तरच हा आजार होऊ शकतो. जर आपण काही काळजी घेतल्यास हा आजार होण्याचे प्रमाण अजून कमी होऊ शकतो . हा फंगी सर्वांच्याच संपर्कात येत असतो, कारण हा फंगी वातावरणात जमिनी वर दमट वातावरणात आढळतो , परंतु आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे आपल्याला हा आजार होत नाही याचे प्रमाण फार कमी आहे परंतु ज्यांचे रोगप्रतिकार शक्ती खूप कमी झाले असेल किंवा मधुमेह चा त्रास खूप जुना असेल आणि कोरोना मध्ये बरेच दिवस ऍडमिट झाला असाल तर थोडीसी काळजी घ्यायला पाहिजे खाली दिलेल्या मधील लक्षणे जर आढळ्यास लगेच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा . 

कोणती लक्षणे आढळतात 

म्युकरमायकोसिस चे काही प्रकार आहेत सध्या ‘ऱ्हायनोसेरेब्रल’ [ Rhinocerebral ] हा सर्वात जास्त लोकांमध्ये आढळत आहे .याच्यात हा फंगी नाकाद्वारे प्रवेश करून मेंदू पर्यंत पोचतो तेंव्हा हा रोग गंभीर होतो. सुरुवातीला काही लक्षणे दिसायला लागतात ते बघून लगेच डोक्टरांना भेटावे. ताप येणे, डोके दुखणे, चेह-याच्या एका बाजूला सूज येणे एक डोळा सुजणे, नाकाच्य त्वचेवरील रंग बदलणे काळे ठिपके पडणे. 

दुसया प्रकारे मध्ये हा फंगी तोंडाद्वारे आतड्यांमध्ये पोचतो आणि छोट्या आतड्यामध्ये प्रहार करतो त्यामुळे उलटी मध्ये रक्त येणे किंवा मल् मध्ये रक्त येणे
पोट भरल्या भरल्या सारखे वाटणे हे लक्षणे आहेत 


तिसऱ्या प्रकार मध्ये हा फंगी नाका द्वारे प्रवेश करून फुफ्फुसा मध्ये प्रवेश करतो आणि त्यामुळे ताप येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, दुसऱ्या प्रकारा मध्ये त्वचामधून हा फ़ंगी शरीरात प्रवेश करतो. अजून एका प्रकारे मध्ये हा रक्ताभिसरणातून सर्व शरीरभर पसरतो.

निदान करण्याचे प्रकार कोणते आहेत 

यांच्यात रक्ताच्या तपासण्या केले जातात, आजार असलेल्या भागाचे जसे फुफ्फुसाचे,  डोक्याचे, पोटाचे  सिटीस्कॅन/ एमआरआय केले जातात. ‘म्युकॉरमायकोसिस’मुळे नाकात निर्माण होणाऱ्या द्रवाची तपासणी केली जाते आणि निदान पक्कं केलं जातं.

उपचार 

ऍलोपॅथिक मध्ये इंजेकशन दिले जातात , अँटीफंगल गोळ्या वापरले जातात . हे सर्व औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानें घेतले पाहिजे. होमिओपॅथिक मध्ये प्रत्येकाचे लक्षणे बघून औषधे घेतले पाहिजे याच्यात phoshorus , Thuja , Arsenicum Album ,आणि इतर बरेच औषधे येतात ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतले पाहिजे .या आजाराबाबत काही माहिती लागल्यास 7208200618 या व्हॉट्सॲप क्रमांकावर ही संपर्क साधता येईल.


डॉ. संजय सनादे

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...