Skip to main content

कोरोना काळात वित्तीय संस्थांकडून केल्या जाणाऱ्या सक्तीच्या वसुलीला चाप लावा: राजेंद्र फड

नाशिक| देशात आणि राज्यात अद्यापही कोरोना महामारीच्या संकटामुळे उद्योग व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरु झालेले नाही. त्यामुळे वाहतूक व्यवसाय देखिला अडचणीत आला असून वाहतूकदारांना वाहनांचे हफ्ते भरण्यात कठीण झाले आहे. मात्र वित्तीय संस्थाकडून कुठलीही मुदत न देता सक्तीची वसुली करून गाड्यांचे लिलाव केले जात आहे. वित्तीय संस्थांच्या या मुजोरीला चाप लावून वाहन कर्जाचे हफ्ते भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन कडून करण्यात आली आहे. 

याबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड आणि कार्याध्यक्ष पी.एम.सैनी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार तसेच नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना निवेदन दिले आहे. 


याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मल सितारामन, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार तसेच जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात आणि राज्यात कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्व उद्योग व्यवसाय अडचणीत सापडले आहे. त्याचा मोठा फटका वाहतूक क्षेत्रालाही बसला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसारण्यास सुरवात झाली असून काही अंशी उद्योग व्यवसाय सुरू झाले आहे. मात्र अद्यापही पूर्ण क्षमतेने उद्योग व्यवसाय सुरू न झाल्याने वाहतुकदारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी गाड्यांचे हफ्ते नियमित भरण्यास अडचण निर्माण झाली असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, वाहनांसाठी वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज यात वित्तीय कंपन्यांनी कर्जदाराचे सर्व अधिकार घेतलेले असतात. जो पर्यंत वाहनावर कर्ज आहे तोपर्यंत हे आधिकार त्यांनी घेणं हे स्वाभाविक आहे. परंतु कोरोना सारख्या महामारी ने पूर्ण जग त्रासलेल असताना वित्तीय कंपन्या मात्र कर्जदारांना धमकावून सावकारी वसुली केल्याच्या अनेक घटना समोर येत आहे.  वित्तीय संस्था कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता थकलेल्या हप्त्याची रक्कम  वसूल करण्यास कुठलीही मुदतवाढ न देता गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून दादागिरी करत खंडणीच्या स्वरूपात हप्त्याची वसुली केली जात आहे. तसेच एक दोन हाफ्ते बाकी राहिले तरी परस्पर कुठलीही सूचना न देता गाड्यांचे लिलाव करून विकल्या जात आहे. त्यामुळे वाहतूकदार देशोधडीला लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या महामारीच्या काळातही आम्हाला हफ्ते माफ करा अशी आमची मागणी नाही. परंतु माणुसकीच्या भावनेतून खंडणीस्वरूपात हफ्ता वसुली न करता. त्यासाठी वाहतूक दाराला मुदत देण्याची आवश्यकता आहे. परंतु वित्तीय संस्थांची वाढलेली मनमानी बघता वाहतूकदार संकटात सापडला आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने या वित्तीय संस्थाना आदेशीत करून त्यांच्या मुजोरीला चाप लावावा. तसेच कोरोना महामारीच्या काळात परस्पर गाड्यांची विक्री न करता हफ्ते भरण्यास मुदतवाढ देण्याच्या सूचना देण्यात याव्यात अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेली आहे.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...