Skip to main content

कोरोना काळात वित्तीय संस्थांकडून केल्या जाणाऱ्या सक्तीच्या वसुलीला चाप लावा: राजेंद्र फड

नाशिक| देशात आणि राज्यात अद्यापही कोरोना महामारीच्या संकटामुळे उद्योग व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरु झालेले नाही. त्यामुळे वाहतूक व्यवसाय देखिला अडचणीत आला असून वाहतूकदारांना वाहनांचे हफ्ते भरण्यात कठीण झाले आहे. मात्र वित्तीय संस्थाकडून कुठलीही मुदत न देता सक्तीची वसुली करून गाड्यांचे लिलाव केले जात आहे. वित्तीय संस्थांच्या या मुजोरीला चाप लावून वाहन कर्जाचे हफ्ते भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन कडून करण्यात आली आहे. 

याबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड आणि कार्याध्यक्ष पी.एम.सैनी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार तसेच नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना निवेदन दिले आहे. 


याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मल सितारामन, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार तसेच जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात आणि राज्यात कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्व उद्योग व्यवसाय अडचणीत सापडले आहे. त्याचा मोठा फटका वाहतूक क्षेत्रालाही बसला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसारण्यास सुरवात झाली असून काही अंशी उद्योग व्यवसाय सुरू झाले आहे. मात्र अद्यापही पूर्ण क्षमतेने उद्योग व्यवसाय सुरू न झाल्याने वाहतुकदारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी गाड्यांचे हफ्ते नियमित भरण्यास अडचण निर्माण झाली असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, वाहनांसाठी वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज यात वित्तीय कंपन्यांनी कर्जदाराचे सर्व अधिकार घेतलेले असतात. जो पर्यंत वाहनावर कर्ज आहे तोपर्यंत हे आधिकार त्यांनी घेणं हे स्वाभाविक आहे. परंतु कोरोना सारख्या महामारी ने पूर्ण जग त्रासलेल असताना वित्तीय कंपन्या मात्र कर्जदारांना धमकावून सावकारी वसुली केल्याच्या अनेक घटना समोर येत आहे.  वित्तीय संस्था कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता थकलेल्या हप्त्याची रक्कम  वसूल करण्यास कुठलीही मुदतवाढ न देता गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून दादागिरी करत खंडणीच्या स्वरूपात हप्त्याची वसुली केली जात आहे. तसेच एक दोन हाफ्ते बाकी राहिले तरी परस्पर कुठलीही सूचना न देता गाड्यांचे लिलाव करून विकल्या जात आहे. त्यामुळे वाहतूकदार देशोधडीला लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या महामारीच्या काळातही आम्हाला हफ्ते माफ करा अशी आमची मागणी नाही. परंतु माणुसकीच्या भावनेतून खंडणीस्वरूपात हफ्ता वसुली न करता. त्यासाठी वाहतूक दाराला मुदत देण्याची आवश्यकता आहे. परंतु वित्तीय संस्थांची वाढलेली मनमानी बघता वाहतूकदार संकटात सापडला आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने या वित्तीय संस्थाना आदेशीत करून त्यांच्या मुजोरीला चाप लावावा. तसेच कोरोना महामारीच्या काळात परस्पर गाड्यांची विक्री न करता हफ्ते भरण्यास मुदतवाढ देण्याच्या सूचना देण्यात याव्यात अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेली आहे.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...