Skip to main content

राजर्षी शाहू महाराज आणि नाशिक

सन १९२० मध्ये उदोजी मराठा वस्तीगृह बांधण्यात येत होते.त्या वसतिगृहाचा कोनशिला समारंभ छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या हस्ते होणार होता म्हणून  म्हणून १५ एप्रिल १९२० मध्ये शाहू महाराज नाशिकमध्ये आले.त्यांचे नाशिक मध्ये जंगी स्वागत करण्यात आले होते तो हा क्षण.
Rajarshi-Shahu-Maharaj-and-Nashik-Special-article-on-the-occasion-of-Chhatrapati-Shahu-Maharajs-birth-anniversary
महात्मा जोतीराव फुले यांचा सत्यशोधक विचारांचा वारसा नंतर राजर्षी शाहू महाराज यांनी पुढे चालविला. त्यांचा नेतृत्वाखाली  अनके सत्यशोधक चळवळीत योगदान देणारे कार्यकर्ते जिल्ह्या-जिल्ह्यात तयार झाले. नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात सत्यशोधक समाजाच्या विचाराने तत्कालीन काळात अनेक तरुण भारावून गेले होते. यापैकी पिंपळगाव बसवंतचे कर्मवीर गणपत दादा मोरे हे सत्यशोधक जलसाकार म्हणून त्यांची पूर्ण महाराष्ट्रभर ओळख झाली होती. जलसाच्या माध्यमातून सत्यशोधकी विचार त्यांनी समाजात पेरले तसेच, मराठा शिक्षण परिषद मधील त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे होते. नाशिकमध्ये कर्मवीर रावसाहेब थोरात,  कर्मवीर गणपत दादा मोरे आणि अन्य  सत्यशोधक कार्यकर्ते आणि मराठा पुढाऱ्यांच्या वतीने १९१४ पासून उदोजी मराठा बोर्डिंग सुरू करण्यात आली होती. 

या वसतिगृहाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तसेच बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीचे क्रांतिकारी पाऊल या कर्मवीरांनी टाकले होते. यासाठीच्या अनंत खस्ता ते घेत होत होते. विद्यार्थी जमा करणे, आर्थिक मदत निर्माण करणे. या वसतीगृहाला कोल्हापूर, बडोदा, धार, ग्व्हालेर संस्थानाचा राजाश्रय तसेच गावागावात ‘तेरावे बलुत’ गोळा करून ते आर्थिकभार सांभाळीत होते. गणपत दादा जलसा सादर करून वसतिगृहासाठी मदत मिळवीत होते.  सत्यशोधकीय जलसा च्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांचा “सर्वव्यापी जगत्पती त्याला नको मध्यस्थी” तसेच “शिक्षणाने येते मनुष्यत्व ,पशुत्व हटते पहा’ हा  विचार पेरण्याचे काम केले जात असे. याचा त्रास सत्यशोधक कार्यकर्त्यांना झाला. याला कर्मवीर गणपत दादा मोरे हे सुद्धा अपवाद ठरले नाहीत. त्यामुळे त्यांना सुद्धा त्याचा मोठा त्रास झाला. पिंपळगाव बसवंत मधील असाच एक वाद पुढे आणून तत्कालीन परिस्थितीमध्ये गणपत दादा यांच्यावर कारवाई करण्यात आली त्यांना अटक करण्यात आले होती. 

सन 1920 मध्ये उदाजी मराठा वस्तीगृह स्वतःच्या जागेत जेव्हा बांधण्यात येत होते. त्याच्या कोनशिला समारंभ छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या हस्ते होणार होता म्हणून म्हणून 15 एप्रिल 1920 मध्ये शाहू महाराज नाशिकमध्ये आले. त्यांचे नाशिक मध्ये जंगी स्वागत करण्यात आले. अनेक समारंभ ठेवण्यात आले. परंतु त्यांच्या कानी सत्यशोधक कर्मवीर गणपतदादा यांच्या कार्याची महती पोहचली होती. म्हणून त्यांना गणपत दादा मोरे यांचा पिंपळगाव ला येऊन सत्कार ,सन्मान करायचा होता म्हणून ते पिंपळगाव बसवंत ला येऊन कर्मवीर गणपत दादा मोरे आणि त्यांच्या पत्नी शारजाबाई मोरे हे बहुजन समाजासाठी घेत असलेल्या कष्टाचे कौतुक करून गणपत दादा मोरे यांची आपल्याबरोबर गाडीत बसून मिरवणूक काढली.त्यांना पाचशे रुपये बक्षीसही दिले. 

लेखक :लक्ष्मण घाटोळ-पाटील,
पत्रकार नाशिक

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...