Skip to main content

दिवंगतांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षरोपण: युगांतर सोशल फाउंडेशनचा उपक्रम

नाशिकरोड|प्रतिनिधी| समस्त पृथ्वी तळावरील  मानवी जीवनावर आलेला महाभिषण काळ म्हणजे 'कोरोना' महामारी या काळाचा उल्लेख होऊ शकेल. या काळात मानवी जीवनावर संकट येऊन अनेक निष्पापांच्या जीवावर बेतले. अनेक जण कुटुंब सोडून गेले. मनुष्य हे जग सोडून गेला, तरी त्यांच्या आठवणी मात्र चिरंतन राहतात. याच आठवणींना उजाळा देण्याचे महत्त्वाचे कार्य उपनगर मधील 'युगांतर सोशल फाउंडेशन'  या सेवाभावी संस्थेने सुरू करून समाजात नवा पायंडा पाडला, असेच म्हणावे लागेल. 
Tree-planting-in-memory-of-the-deceased-An-initiative-of-Yugantar-Social-Foundation
     
*वाटले नव्हते कोणालाही असे अघटीत घडून जाईल*...........

*चालता बोलता देव तुम्हास नेईन*........

*माणुसकी, स्नेह याची ज्यावेळी चर्चा होईल*.....

*त्यावेळी सर्वात पहिली आठवण तुमची येईल*.....!!

असा संदेश देऊन कोरोना काळात प्रभाग १६ मधील दिवंगत झालेले कै. किसन पुरकर, चंद्रकला पुरकर यांच्या आठवणींना त्यांच्या नावे वृक्षारोपण करून उजाळा देण्यात आला. *प्रभाग १६च्या नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे, युगांतर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रवि पगारे (सर)*  या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत  उपनगर मधील श्रमनगर मध्ये पुरकर कुटुंबियांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कै. किसन पुरकर, चंद्रकला पुरकर यांच्या आठवणींनी पुरकर कुटुंबियांचे डोळे पाणावले होते. 
युगांतर सोशल फाउंडेशनने हा जो उपक्रम प्रभागात  सुरू केला, तो निश्चितच वाखण्याजोगा आहे. येणाऱ्या नवपिढीला संस्कारक्षम होऊन प्रेरणादायी राहील.  कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींचा मानसन्मान यातून उजागर होऊन नवी दिशा येणाऱ्या पिढीला त्यातून मिळू शकेल, असा आशावाद समस्त पुरकर कुटुंबियांनी व्यक्त करून सर्वांचे आभार मानले. यावेळी संजय पुरकर, उज्ज्वला पुरकर, अभिषेक पुरकर, वैष्णवी पुरकर, शिवानी कापसे, सुमनताई संधान, पूनम संधान, आदित्य संधान यासह कुटुंबीय उपस्थित होते. सर्वांचे आभार संजय पुरकर यांनी मानले.

        शांतीपार्क सोसायटी

शांतीपार्क सोसायटी येथील दिवंगत कै. बाबुराव गुरव, दत्तात्रय भावसार, शैलेश भावसार, रामचंद्र मुरलीधर वाणी, राजन दिवेकर, शैला दिवेकर, मल्लिकर, शिवरामकृष्ण अय्यर, पुष्पा कडलग यांचे कोरोना काळात निधन झाले. यासर्वांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी वंदना सुभाष ठाकूर, सुभाष गिरीधर ठाकूर, अनंत मधुकर मुळे, मालती शाम पाटील, रुपाली गुरव, मालती बाबुराव गुरव, सोमनाथ गुरव, वैभव सुभाष ठाकूर, सचिन सुभाष ठाकूर, व्यंकटेश अय्यर, रमेश अय्यर आदी शांतीपार्क सोसायटी मधील रहिवासी उपस्थित होते.



अक्षरधारा सोसायटी, आनंद नगर

अक्षरधारा सोसायटी, आनंद नगर मधील कै. अशोक संभाजी सातपुते, प्रमिला मधुकर बारी, छाया सुभाष भावसार यांचे कोरोना काळात दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आनंद नगर उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी रमेश भट, राजेंद्र राणे, सुदाम जोशी, पारू अशोक सातपुते, प्राची इनामदार, वीरेंद्र भावसार, हेमंत बारी आदी आनंद नगर मधील रहिवासी उपस्थित होते.


Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...