Skip to main content

प्रतिबंध आणि उपचार यांत योगशास्त्र उपयुक्त:पद्मश्री डॉ. एच. आर. नागेंद्र

नाशिक| प्रतिबंध आणि उपचार यांत योगशास्त्र उपयुक्त असल्याचे प्रतिपादन पद्मश्री डॉ. एच. आर. नागेंद्र यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे कोविड-19 संदर्भात ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात होते. या व्याख्यानमालेत बंगळूर येथील स्वामी विवेकानंद अनुसंधान संस्थानचे संस्थापक पद्मश्री डॉ. एच. आर. नागेंद्र यांनी मार्गदर्शन केले. विद्यापीठाचे मा. प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली  व्याख्यानमालेस नवी दिल्ली येथील भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. जयंत देवपुजारी, महाराष्ट्र चिकित्सा परिषदेचे अध्यक्ष तथा विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ. आषुतोष गुप्ता, विद्यापीठाचे आयुर्वेद विद्याशाखेचे मा. अधिष्ठाता डॉ. श्रीकांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
Yoga-is-useful-in-prevention-and-treatment-Dr-Padma-Shri-H-R-Nagendra


’प्रिव्हेंटिव्ह ट्रिटमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ पोस्ट कोविड सिंड्रोम’ या विषयावर स्वामी विवेकानंद अनुसंधान संस्थानचे संस्थापक पद्मश्री डॉ. एच. आर. नागेंद्र यांनी सांगितले की, कोविड-19 आजाराचा सामना करत असतांना आयुर्वेद शास्त्रातील योग, प्राणायम आणि ध्यान साधनेचे महत्व अधिक वाढले. रोगावर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध महत्वाचा असतो. कोविडच्या संकटातून बाहेर पडलेल्या रुग्णांना योग व प्राणायमाने जगण्याची नवी दिशा मिळाली. समाजात योग-साक्षरता वाढवून उत्तम आरोग्यासाठी योगाभ्यास करणे गरजेचे आहे. आयुर्वेद आणि योगशास्त्रातील नियमांचे पालन केल्यास उत्तम आरोग्य व रोगप्रतिकारशक्ती वाढते. योग हे शास्त्र नसून ते समृध्द जीवन जगण्याचा कला आहे ती सर्वांनी आत्मसात करावी. कोविड-19 आराजानंतर होणारे इतर विविध व्याधी व आजार टाळण्यासाठी योगसाधनेला महत्व द्यावे. पारंपारिक जीवनशैलीचा वापर केल्यास मानसिक स्वास्थ्य लाभते. कोविड-19 संदर्भात आरोग्य विद्यापीठातर्फे ऑनलाईन व्याख्यानमालेच्या माध्यमातून जनगागृती करण्याचे कार्य महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.



भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. जयंत देवपुजारी यांनी सांगितले की, जगभरात कोविड-19 करीता औषधाचे संशोधन सुरु असतांना योग व प्राणायमाने रुग्णांना संजीवनी दिली. कोविड काळात रुग्णांना योगाचे सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळाले. शारीरिक व्याधीसाठी असो वा मानसिक कारणासाठी योग साधना उत्तम आहे. या परिस्थितीत सर्वांनी योगाचा अंगीकार करावा आणि आरोग्य, आनंद आणि समृद्धीचा अनुभव घ्यावा असे त्यांनी सांगितले.



महाराष्ट्र चिकित्सा परिषदेचे अध्यक्ष डॉ. आषुतोष गुप्ता यांनी सांगितले की, कोविड-19 नंतर होणाऱ्या आजाराबाबत काळजी घेणे महत्वाचे आहे. यासाठी योग साधना महत्वाची आहे. योग व प्राणायमची शास्त्रोक्त पध्दती व माहिती या व्याख्यानमालेच्या माध्यमातून घ्यावी. योगा केल्यामुळे आपलं शरीर नेहमी निरोगी आणि चांगलं राहातं. योगाने आपलं शरीर तंदुरूस्त राखण्यास मदत होते. कोविड-19 आजाराचा सामना करण्यासाठी पारंपारिक जीवनशैलीचा अवलंब करावा असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठ आयुर्वेद विद्याशाखेचे मा. अधिष्ठाता डॉ. श्रीकांत देशमुख यांनी सांगितले की, योगशास्त्र आणि आयुर्वेदशास्त्र ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. योग आणि आयुर्वेद एकमेकांस पूरक आहेत. योगशास्त्राचा अवलंब केल्यास मोठया प्रमाणात मानसिक समाधान मिळते. कोविडचा लवकरच नायनाट होईल. याकरीता शासनाने दिलेल्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा असे त्यांनी सांगितले.


विद्यापीठातर्फे आयोजित व्याख्यानमालेत दि. 25 जून 2021 रोजी सकाळी 11ः00 वाजता जोधपूर येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण राजस्थान आयुर्वेद विद्यापीठाचे मा. कुलगुरु प्रा. अभिमन्यू कुमार हे  ’केअर ऑफ चिल्ड्रेन इन कोविड-19 पॅनडेमिक ’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सदर मार्गदर्शन https://youtu.be/tst2JNJJvPE   या यु-टयुब लिंकवर तसेच दि. 26 जून 2021 रोजी सकाळी 11ः00 वाजता केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन विभागाचे सदस्य मा. वैद्य विनोद कुमार टी.जी. नायर हे ’आयुर्वेदा इन पोस्ट कोविड सिंड्रोम ’ या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. सदर मार्गदर्शन https://youtu.be/eDrg_0HMWVY   या यु-टयुब लिंकवरुन प्रसारित करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालयाचे अधिष्ठाता व प्राचार्य यांनी ऑनलाईन चर्चासत्राबाबत विद्यार्थ्यांना अवगत करावे.


 सदर ऑनलाईन व्याख्यानमालेत जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सूत्रसंचालन केले तसेच विद्यापीठ आयुष विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यापीठाकडून आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेस मोठया संख्येने शिक्षक, पालक, विद्यार्थी, अभ्यागत व मान्यवर उपस्थित होते.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...