Skip to main content

पूरस्थिती अहवाल: पूरदुर्घटनेत आतापर्यंत १९२ लोकांनी जीव गमवला, 'रायगड'मध्ये सर्वाधिक ९५ मृत्यू

नाशिक| कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांना अतिवृष्टीमुळे मोठा तडाखा बसला आहे. पूरदुर्घटनेत आतापर्यंत १९२ लोकांनी जीव गमावला आहे. त्यात सर्वाधिक जीवितहानी ही रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यात झाली असून, रायगडमध्ये ९५ तर साताऱ्यात ४५ जणांनी जीव गमावला आहे. अद्यापही २५ जण बेपत्ता आहे. आतापर्यंत ३ लाख ७५ हजार लोकांना बचाव पथकाने सुरक्षितस्थळी हलविले आहे. 
Preliminary-report-192-people-have-lost-their-lives-so-far-in-the-flood-disaster-with-Raigad-having-the-highest-number-of-95-deaths

राज्याच्या पूरस्थिती अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार, पूरप्रभावित रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई उपनगर या ९ जिल्ह्यात आता पूरपरिस्थिती नियंत्रणात आहे.पूरग्रस्त जिल्ह्यात एनडीआरएफ ३४ आणि लष्कराच्या ३ तुकड्या बचाव कार्यात कार्यरत आहे. दि. २२ ते २६ तारखेपर्यंत या चार दिवसात एनडीआरएफ, लष्कर आणि सरकारी बचाव पथकाने पूरग्रस्त भागातील ३ लाख ७५ हजार १७८ लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. महत्वाचं म्हणजे २४ तासात कोल्हापूर येथून १,०९,४८३ लोकांना सुरक्षित हलविण्यात बचाव पथकाला यश आले.

अद्यापही २५ जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. पुरामुळे १०२८ गावे बाधित झाली आहे, आतापर्यंत पूरदुर्घटनेत १९२ लोकांनी जीव गमावले आहे. त्यात सर्वधिक जीवितहानी रायगड जिल्ह्यात झाली असून येथे ९५ तर साताऱ्यात ४५ लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे, तर २८,८०७ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.  मालमत्ता आणि पिकांचे ही मोठे नुकसान झाले आहे. चिपळूण येथे ५ तात्पुरते निवारा केंद्र स्थापन करण्यात आले. जसा जसा पूर ओसरत आहे तस तसे नुकसानीचे विदारक चित्र दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली असून रोगराई पसरू नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...