Skip to main content

उपनगरमध्ये नागरिकांना रेशनकार्ड वाटप;४५० ते ५०० नागरिकांना झाला लाभ

नाशिकरोड |प्रतिनिधी| उपनगर येथील युगांतर सोशल फाउंडेशन संपर्क कार्यालयात प्रभागातील नागरिकांना रेशनकार्ड वाटप करण्यात आले. जवळपास ४५० ते ५०० नागरिकांना टप्प्याटप्प्याने रेशनकार्ड वाटप करण्यात आले. कोविड-१९ चे सर्व नियम पाळून कार्यक्रम संपन्न झाला.
Distribution-of-ration-cards-to-the-citizens-in-the-suburbs-450-to-500-citizens-benefited
व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष अनिल जोंधळे, प्रभाग १६च्या नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे, युगांतर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रवि पगारे (सर), विनोद चौधरी, पंढरीनाथ काळूनगे हे मान्यवर उपस्थित होते. जवळपास ४५० ते ५०० नागरिकांना रेशनकार्ड टप्प्याटप्प्याने वाटप करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी बोलताना श्री रवि पगारे (सर) म्हणाले की, रेशनकार्ड हे अत्यंत उपयुक्त सरकारी दस्तऐवज असून भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी ते महत्वाचे राहणार आहे. 

शासनाच्या नियमानुसार २०१९ पूर्वीचे रेशनकार्ड धारकांना रेशनदुकानातून सवलतीच्या दरात धान्य मिळेल. नवीन रेशनकार्ड धारकांना सहा महिन्यानंतर धान्य मिळू शकेल. प्रभागातील उत्तर भारतीय जनतेला याचा लाभ निश्चितच मिळेल. कारण उत्तर भारतीय अनेक रहिवासी यांचे वास्तव्य येथे असल्याने त्यांना नवीन रेशनकार्ड तयार करण्यासाठी येणाऱ्या अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे शासनाच्या विविध योजनेपासून ते वंचित राहत होते, पण आता नवीन रेशनकार्ड त्यांना लाभल्याने हक्काचे अन्न-धान्य त्यांच्या पदरात पडू शकेल.

नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे यांनी मनोगतात सांगितले की, सर्व मान्यवर लोकप्रतिनिधी, जनता यांच्या सहकार्याने हे शक्य होऊ झाले. महाराष्ट्र राज्याचे अन्न-धान्य नागरी पुरवठा मंत्री श्री छगनराव भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे व ईतर मान्यवर नेत्यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार रेशनकार्ड शिबीर घेण्यात आले होते. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांनी काळजी घेतल्याने ह्या शिबिराला यश मिळून हे महत्वाचे सरकारी दस्तऐवज नागरिकांच्या हाती पडू शकले. नागरिकांना काही अडचण आल्यास त्यांनी युगांतर  कार्यालयात संपर्क साधावा, असे आव्हान त्यांनी केले. शरद कोकणे, बाळासाहेब दिवे, चंद्रकांत नेवे, सविता भारती, अमित दुबे, रिता तिवारी, सायली ताठे, पोपटलाल लुंकड, उर्वशी चौहान, सलमा शेख, एम सी दिव्याकरण आदीसह ईतर नागरिकांना रेशनकार्ड टप्प्याटप्प्याने वाटप करण्यात आले. कोविड-१९ चे सर्व नियम, सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून कार्यक्रम संपन्न झाला. 


एजंट पासून सुटका

वेळ वाचावा यासाठी अनेक नागरिक एजंटाच्या  भूल-थापाला बळी पडतात. एजंटाकडून वेगवेगळी कारणे देऊन एका रेशनकार्ड साठी ५००० ते १०,००० रुपये उकळले जातात. एवढी रक्कम देऊनही रेशनकार्ड हाती पडेल याची शाश्वती नसते. तथापि, युगांतर संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या रेशनकार्ड शिबीर मुळे अनेक नागरिकांना रेशनकार्डचा लाभ घेता आला. एजंटगिरी पासून सुटका मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...