Skip to main content

रामदास स्वामीनगर येथे मोफत कोविड-१९ लसीकरण केंद्राचा शुभारंभ; १५० नागरिकांचे लसीकरण

नाशिकरोड| प्रतिनिधी| प्रभाग १६ येथील रामदास स्वामी नगर, लेन क्र. २, राजमाता जिजाऊ वाचनालय येथे मोफत कोविड-१९ लसीकरण केंद्राचे उदघाटन झाले. पहिल्याच दिवशी जवळपास १५० नागरिकांनी लस घेतल्याची नोंद करण्यात आली. 
लसीकरण केंद्राचे उदघाटन दगडू सोनवणे, रामदास बोरसे, उदय भोगले (सर) या ज्येष्ठांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभाग १६च्या नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे, नगरसेविका सौ आशा रफिक तडवी, नगरसेवक अनिल ताजनपुरे, नगरसेवक राहुल दिवे, महापालिका पूर्व विभागीय अधिकारी स्वप्नील मूदहलवाडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारत सरकार मुद्रणालय, गांधीनगरच्या मागील रहिवासी क्षेत्र असलेले रामदास स्वामी नगर लेन क्र १, २, ३, वैभव सोसायटी, काठे नगर, इंद्रायणी कॉलोनी, प्रेरणा सोसायटी, खोडदे नगर व आसपासच्या परिसरात कोविड-१९ लसीकरण केंद्र असावे यासाठी येथील नागरिकांनी मागणी केली होती. 
त्यानुसार परिसरातील सर्व लोकप्रतिनिधी यांच्या तर्फे पाठपुरावा करण्यात आला होता. आज कोविड-१९ लसीकरण केंद्र सुरू झाल्यानंतर येथील नागरिकांनी सर्व लोकप्रतिनिधी यांचे आभार मानले. या केंद्रात तातडीने नोंदणी(ऑन स्पॉट रजिस्ट्रेशन), लसीकरण झाल्यानंतर ताबडतोब सर्टिफिकेट यांची सोय करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी लस घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती, तथापी येथे कोविड-१९चे सर्व नियम पाळून लसीकरण केले जात होते. यावेळी  युगांतर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रवि पगारे (सर), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष अनिल जोंधळे, डॉ भाऊसाहेब बच्छाव, डॉ ऋषभ दायमा, डॉ किशोर भालेराव, डॉ राजेंद्र बागुल, राहुल देवरे, सुनील कदम, अजय केला, जीवन शिंदे, विजय पगारे, नंदकिशोर पगारे, कमलेश जाधव, दिपक सोनवणे, देवेंद्र उफाडे, कैलाश देवरे, दत्तात्रय कोकाटे, संजय गांगुर्डे, प्रकाश राजपूत, जितेंद्र बोरसे, प्रवीण पवार, सुरज दुसाने, पंकज गांगुर्डे, अनिल शिंदे, संजय जोंधळे, निलेश पाटील, विजय अहिरे, कुणाल पगारे, कीर्ती सुर्यवंशी, सुनीता मोकळ, परिचारिका वासंती गावित, जयश्री भोंडवे, सुनीता गायकवाड आदी उपस्थित होते. लसीकरण झालेल्या नागरिकांना अल्पोपहार, चहा देण्यात आला.

ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग व्याधीग्रस्तांना दिलासा

लसीकरण केंद्र सुरू व्हावे यासाठी नागरिकांनी सतत मागणी केल्याने पाठपुरावा केला. याकामी सर्व नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले. याभागात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, व्याधिग्रतांना दिलासा मिळेल. लसीकरण केल्यानंतर ताबडतोब सर्टिफिकेटची सोय करण्यात आली आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.

सौ.सुषमा रवि पगारे, 
नगरसेविका प्रभाग १६

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...