Skip to main content

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पाळला राज्यभर चेतना दिन

मुंबई| ११ ऑगस्ट १९६६ रोजी एका दिवसाची सामूहिक किरकोळ रजा घेऊन, महाराष्ट्रातील  राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी, राज्यस्तरीय एकजुटतेचे प्रदर्शन दाखवले  स्व. र.ग.कर्णिक यांच्या झंझावाती कार्यप्रणालीच्या माध्यमातून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना बलशाली झाली. त्यांच्या कार्याला स्मरून आज चेतना दिन पाळण्यात आला.
State-Government-Employees-observed-Statewide-Awareness-Day
आज ११ ऑगस्ट २०२१. गतकाळातील संघटनेच्या अभूतपूर्व यशामुळेच राज्यातील कर्मचाऱ्यांना आर्थिक व सेवा विषयक स्थैर्य लाभले. या संदर्भातील गेल्या ५८ वर्षातील संघटना कार्याच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी आजचा चेतना दिन महाराष्ट्रातील सर्व जिल्हानिहाय सरकारी कार्यालयात मोठ्या जोशात साजरा केला गेला. दुपारच्या भोजनाच्या सुट्टीत कार्यालय- कार्यालयात कर्मचारी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून एकत्र आले व राज्य शासनाकडे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्या मंजूर व्हाव्यात यासाठी सामूहिक घोषणा देऊन, या प्रातिनिधीक सांघिक कृतीद्वारे शासनाचा लक्षवेध करण्यात आला. 
आज राज्यभर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी या चेतन दिनाद्वारे  दर्शविलेली एकजूट ही सांप्रत राज्य शासनाला नजीकच्या काळात कर्मचाऱ्यांच्या तीव्र  असंतोषास  सामोरे जावे लागू शकते यासंदर्भातील सूचक कृती आहे. सरकारने  कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाचा योग्य तो बोध घेऊन मागण्यांबाबत सकारात्मक चर्चेची द्वारे उघडी करावीत, असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात येत आहे.  सरकार अस्तित्वात आल्यापासून मागण्यांविषयक कोणत्याही स्तरावरील चर्चा एकदाही होऊ नये ही बाब निश्चितच नकारात्मक वाटते.
करोना कालावधीतील आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे योगदान, चक्रीवादळ, महापूरासारख्या आपत्ती तील केलेले कर्तव्यकठोर कामकाज यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनातील  अगत्याचे स्थान अधोरेखित होते. त्यामुळे त्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रलंबित प्रश्नात लक्ष घालून, सत्वर मार्ग काढणे आवश्यक ठरते. अन्यथा नजीकच्या काळात राज्यातील कर्मचारी नाईलाजाने संप आंदोलन छेडतील असा आम्ही पुनरुच्चार करीत आहोत. असे अध्यक्ष अशोक दगडे, सरचिटणीस  विश्वास काटकर यांनी सांगितले.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...