Skip to main content

भारत हाच एकमेव आधार

संपूर्ण जगात भारत देशालाच गौरवशाली, शौर्यशाली परंपरा लाभलेली आहे. भारतालाच इतिहासाचे अमूल्य कोंदण लाभलेले आहे. पुरातन काळातील ऋषी-मुनी, संत, महंत, सद्गुरू, परात्पर गुरू यांनीच भारताला घडवले आहे. जिथे प्रभू श्रीरामचे अस्तित्व आहे, तिथेच रावण सारखी प्रवृत्ती असते. कालांतराने या प्रवृत्तीचा नाश होतोच. तीच रावणाची प्रतिकृती (प्रवृत्ती) आज तालिबानने जगाला दाखवून दिली आहे. त्यांचे रोज नवनवीन (एका रात्रीतून) निघणारे 'फतवे' पाहिल्यानंतर जगात 'लोकशाही' हा शब्द तरी अस्तित्वात आहे का ?? असा प्रश्न कोणालाही पडल्यावाचून राहणार नाही. तालिबान म्हणजे 'कट्टर' एका पंथ (धर्म) यांना मानणारा विद्यार्थी, असा साधा सरळ सोपा अर्थ आहे. परंतु तालिबानने 'विद्यार्थी' या शब्दाचा नायनाट करून टाकला आहे. तालिबानचे जे म्होरके आहेत, त्यांनी सरळ महिलांना कुठलेच अधिकार नसून त्यांचे काम केवळ मुले जन्माला घालणे एवढेच आहे, असा अजब फतवा काढून महिलांचेच 'तुष्टीकरण' केले. पण या तालिबानी म्होरक्याना हे देखील कळले नाही, की त्यांनी ही एका महिलेच्या पोटीच जन्म घेतला आहे. अत्यंत क्रूर मानसिकतेचे दर्शन तालिबानी प्रवृत्तीने संपूर्ण जगाला घडवले, असे म्हटले तरी वावगं नाही. ज्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण अफगाणिस्तान बंदुकीच्या जोरावर कह्यात घेतला, ते पाहून जागतिक महासत्ता म्हणून 'टेंभा' मिरवणाऱ्या देशांना हे पचनी कसे पडले ??  वास्तविक या देशांना कुठलाच इतिहास नाही. मोठमोठ्या परिषदा भरवायच्या, आणि त्यात केवळ 'पोकळ' भाषणबाजी करायची, असा यांचा ठरलेला कार्यक्रम असतो. ९/११ नंतर जागतिक महासत्तेने आतंकवाद यांचा नायनाट केला. असे आपण सर्वांनी पाहिले (की केवळ दाखवले) आता ते कुठे गेले ? त्यांनी इतक्या सहजासहजी अफगाणिस्तानातून सैन्य माघारी का नेले ? बरं नेले तर नेलं, पण जातांना करोडो रुपयांची शस्त्र-सामुग्री तिथेच का ठेवली ? वीस वर्षे ज्या ठिकाणी सैन्य ठेवून त्यावर अफाट खर्च केला, त्याची आत्ताच का उपरती झाली. वास्तविक या टेम्भा मिरवणाऱ्या देशाचे वागणे म्हणजे 'डबल स्टॅंडर्ड' दोहरा मापदंड किंवा डबल ढोलकी स्वरूपाची आहे. त्यांनी आतंकवादाचे समूळ उच्चाटन केलेच नाही, उलट त्याला खतपाणी घातले, असे म्हणण्यास वाव आहे. जागतिक महासत्तेने  आतंकवादी यांना जेरबंद करण्यासाठी  लाखो रुपयांचे बक्षिसे जाहीर केली, आता तेच आतंकवादी त्यांच्या समोर बसून वाटाघाटी करतील. असे 'अलौकिक' दृश्य लवकरच पाहायला मिळू शकते. जागतिक महासत्तेने 'आतंकवाद' नष्ट करण्याचा केवळ आव आणून त्यापाठीमागून केवळ आपला बदला घेतला.  त्यांना जगाशी काहीही देणेघेणे नाही. संपूर्ण आशिया खंडात केवळ भारतच आतंकवाद समूळ उच्चाटन करू शकतो, याची जाणीव आता या जागतिक महासत्तांना झाली आहे. आतंकवाद विरुद्ध युद्ध सुरू तर केले, पण लगेच पराभूत मानसिकतेत का गेले ? 


केवळ भारतावर आशा

भारत हा अनेक वर्षांपासून परकीय आक्रमणे झेलत आला आहे. त्यातून तो पूर्णपणे निखरला आहे. उभारणी घेतली आहे, असे इतिहासात नोंद आहे. हे केवळ आणि केवळ भारताच्या नशिबी आले आहे. इतर देशांची लायकी नाही. राष्ट्रघातकी विचार पेरणारे या भारतातही भरपूर प्रमाणात सापडतील. अफगाणिस्तान वर तालिबानने कब्जा मिळवला, हे पाहून किंवा एकूण अनेकांच्या मनात उकळ्या फुटल्या असतील. पण सकारात्मक वेळच त्यांना उत्तर देऊन गप्प बसवतो. जेव्हा संपूर्ण भारतावर गुलामगिरीचे कवच निर्माण झाले होते, तेव्हा अशा नैराश्य वातावरणात 'हिंदवी स्वराज्याचे' रणशिंग फुंकले गेले होते. याच हिंदवी स्वराज्यात 'अटकेपार झेंडे' लागले होते. या 'जरी पटक्याची' दहशत संपूर्ण जगाने अनुभवली होती. हाच 'जरी पटका' एके काळी अफगाणिस्तानच्या मुळावर उठला होता. त्याच्या चिवट झुंजीचे दुष्परिणाम अफगाण्यांनी भोगले आहे. 'जरी पटक्याचे' नाव उच्चारले तरी एके काळी त्यांना कापरे भरत होते. आता ही तीच वेळ येऊन ठेपली आहे. विजयाचा वारसा केवळ भारताकडे आहे. त्या विजयाचे तंत्र भारतच्या मातीत उपजतच आहे. सर्व जगाला हतबलतेने ग्रासले आहे. अशा नैराश्यपूर्ण वातावरणात केवळ भारत (हिंदुस्थान)च आशेचा किरण आहे. परिणामी संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या भूमिकेकडे लागले आहे.

साभार: युगांतर युग/लेख


Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...