Skip to main content

पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना निळे प्रतीक संस्थेचा राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार प्रदान

औरंगाबाद|प्रतिनिधी| निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील गुणी जनांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. निळे प्रतीकच्या वर्धापन दिनानिमित्त सिडको पोलीस ठाण्याचे कर्तबगार पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार जाहीर झाला होता. परंतु ऐन वेळी काही कारणास्तव अशोक गिरी यांना कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. म्हणून त्यांना सिटी चौक पोलिस स्टेशन औरंगाबाद येथे जाऊन संस्थेचे अध्यक्ष रतन कुमार साळवे, प्रा.बाळासाहेब वानखेडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
Awarding-State-Level-Samaj-Bhushan-Award-to-Nile-Pratik-Sanstha-to-Inspector-of-Police-Ashok-Giri
यावेळी विविध विषयावर चर्चा करताना पोलिस निरीक्षक अशोक गिरी म्हणाले की, आशिया खंडात औरंगाबाद शहर हे अगदी झपाट्याने वाढणारे शहर म्हणून त्याची नोंद झालेली आहे . उद्योगाची या शहरामध्ये भरभराट आहे.मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण संस्था आहेत उद्योगधंदे वाढत असतानाच गुन्हेगारी सुद्धा वाढत चाललेली आहे. सध्याच्या काळामध्ये गुन्हेगारी  वाढत असली तरी ही बाब निश्चितच चिंतेची नसून त्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहे. 

प्रत्येकानी आपल्या मुलांवर आई-वडिलांनी लक्ष ठेवायला हवं. योग्य संस्कार करायला हवे .आपला मुलगा काय करतो? कुठे जातो?कोणाशी त्याची मैत्री आहे? रात्री वेळेवर घरी येतो का? अशा बारीक सारीक गोष्टीवर आईवडिलांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मुलां मुलींना फ्रीडम मिळायला हवा,परंतु तो किती मिळावा याच्या काही परीसीमा असल्या पाहिजे. प्रचंड वाढती बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव, व्यसनधिंनते मुळे तरुण गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहे. आम्ही आमच्या पद्धतीने गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करतच असतो. परंतु आई-वडिलांनीही आपल्या मुलाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे. असेही ते म्हणाले.

पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांची कामगिरी दमदार असल्यालामुळेच त्यांनी सिडको पोलीस स्टेशनला अडीच वर्ष आपली सेवा बजावली. अनेक गुन्हे उघडकीस आणले. शिवाय अनेकांना गुन्हे करण्यापासून रोखले. कोरोना काळात देखील त्यांची भूमिका महत्वाची अशीच राहिली आहे. सर्व जाती धर्मातील सलोखा, भाईचारा राखण्यास ते यशस्वी राहिले. म्हणून त्यांना निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारामुळे त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...