Skip to main content

मयत सभासदांच्या कुटुंबांना दिवाळीपूर्वी आर्थिक सहाय्य मिळावे: रेशनिंग संघटनेची शासनाकडे मागणी

नाशिक| नाशिक जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेतर्फे शासनाकडे कोरोनाने निधन झालेल्या सभासदांच्या कुटुंबाला आर्थिक मदत व विमा कवच  देण्याची मागणी केली होती. दिवाळी सणापूर्वी ही मदत मिळावी अशी मागणी पुन्हा संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष गणपत डोळसे पाटील आणि नाशिक जिल्हाध्यक्ष ह. भ. प. निवृत्ती महाराज कापसे यांनी शासनाकडे स्मरणपत्राद्वारे केली आहे.
Families-of-deceased-members-should-get-financial-assistance-before-Diwali-Ration-association-demands-govt-through-reminder
शासनाला देण्यात आलेल्या स्मरणपत्रात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्रातील स्वस्त धान्य दुकानदरांनी धान्याचे वितरण केले, या दरम्यान शेकडो दुकानदार या आजाराच्या कचाट्यात सापडून त्यांना आपला जीव गमवावा लागला. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. अशा कुटुंबांना दिवाळी या महत्वाच्या सणाला आर्थिक सहाय्य देण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी विनंती करण्यात आली आहे. जेणे करून त्यांची ही दिवाळी सुखाची आणि समाधानाने जाईल. 

शासनाने इतर विभागांना घोषित केलेल्या विम्याप्रमाणेच स्वस्त धान्य दुकानदारांना विमा द्यावा आणि आर्थिक सहाय्य करावे अशी विनंती मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ, राज्यमंत्री ना. विश्वजित कदम यांना स्मरणपत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे. मयत सभासदांच्या  कुटुंबांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन दिवाळीपूर्वी आर्थिक सहाय्य द्यावे अशी विनंती संघटनेचे विभागीय अध्यक्ष गणपत डोळसे पाटील, संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. निवृत्ती महाराज कापसे यांनी केली आहे. यापूर्वी ही संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले आहे असे ही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...