Skip to main content

केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते उद्या गांधीनगर 'सीजीएचएस' केंद्राचे उद्घाटन; 'नाशिक' महाराष्ट्रातील चौथे शहर

मुंबई| नाशिक| केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांच्या हस्ते उद्या सोमवार 3 जानेवारी रोजी सकाळी 11:00 वाजता नाशिक येथील केंद्र सरकार आरोग्य योजनाअंतर्गत नवीन अॅलोपॅथिक निरामय स्वास्थ्य केंद्राचे (CGHS) उद्घाटन होणार आहे. यानिमित्त आयोजित बैठकीलाही त्या संबोधित करणार आहेत. याप्रसंगी  नाशिकचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ, नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी, खासदार डॉ सुभाष भामरे, खासदार हेमंत गोडसे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
केंद्र सरकार आरोग्य योजनेत अधिक शहरांचा समावेश करण्याच्या आणि सीजीएचएस सेवांची सुलभता सुधारण्याच्या प्रयत्न म्हणून, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 10 जून 2021 रोजी नाशिकमध्ये नवीन अॅलोपॅथिक निरामय स्वास्थ्य केंद्र सुरु करायला मंजुरी दिली आहे. सीजीएचएस निरामय स्वास्थ्य केंद्र उघडणारे नाशिक हे मुंबई, पुणे आणि नागपूरनंतर महाराष्ट्रातील चौथे शहर असेल. नाशिकमधील हे सीजीएचएस निरामय स्वास्थ्य केंद्र हे गांधीनगर भागात असून सरकारी कार्यालये आणि निवासस्थाने या दोन्हीपासून सोयीच्या अंतरावर  आहे.

केंद्र सरकारी कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांना सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारची आरोग्य योजना 1954 मध्ये सुरू करण्यात आली. सीजीएचएस अर्थात केंद्र सरकारची आरोग्य योजना ही भारतातील विधिमंडळ, न्यायपालिका, कार्यकारी मंडळ आणि प्रसार माध्यम या लोकशाहीच्या चारही स्तंभांचा समावेश असलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या आरोग्यसेवाविषयक  गरजा पूर्ण करते. सीजीएचएस हे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्तिवेतन धारकांसाठी आदर्श आरोग्य सेवा सुविधा प्रदाता असून त्यांना मोठ्या प्रमाणात लाभार्थी आधार आहे. सध्या संपूर्ण देशातील 74 शहरांमधील अंदाजे 38.5 लाख लाभार्थी केंद्र सरकारी आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत.

सरकारी आणि सीजीएचएस योजनेअंतर्गत समाविष्ट केलेल्या निवृत्तीवेतनधारक आणि इतर निवडक लाभार्थ्यांसाठी या योजनेत समाविष्ट केलेल्या केंद्रांमध्ये उपचारांसाठी उपलब्ध रोखरहित सुविधा, आपत्कालीन परिस्थितीत शासकीय/खासगी रुग्णालयांमध्ये घेतलेल्या उपचारांच्या खर्चाची परतफेड, श्रवणयंत्र, कृत्रिम अवयव, उपकरणे इत्यादी खरेदीसाठी झालेल्या खर्चाचा परतावा  आणि कुटुंब कल्याण, माता आणि बाल आरोग्य सेवा यासह नाशिकमधील सीजीएचएस निरामय स्वास्थ्य केंद्र ओपीडी अर्थात बाह्य रुग्ण विभागाद्वारे  उपचार प्रदान करेल. 

सीजीएचएस निरामय स्वास्थ्य केंद्राचा शहरातील सुमारे 71,000 सेवारत आणि निवृत्तीवेतनधारक केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह सुमारे 1.6 लाख लाभार्थ्यांना फायदा होईल. यापूर्वी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सीजीएचएस निरामय स्वास्थ्य केंद्राचे उपचार घेण्यासाठी मुंबई किंवा पुण्याला जावे लागत होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...