Skip to main content

किसान क्रांती आंदोलन: स्थानिक लोकप्रतिनिधींची आंदोलनाकडे पाठ

नाशिक|पुणतांबा येथे किसान क्रांतीच्या वतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे. स्थानिक आजी माजी लोकप्रतिनिधी आंदोलनबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसते. राज्याचे महसूल मंत्री, कृषी मंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आंदोलकांना भेट देत असतांना मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी आंदोलन स्थळी फिरकले नसल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. 
Kisan-Kranti-Andolan-Back-to-the-agitation-of-local-peoples-representatives
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी कांदे व फळ वाटप केले तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी उसाची होळी करत लक्ष वेधले तसेच दूध वाटप करत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने ही आपला प्रतिनिधी पाठवून शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. तसेच राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही शिष्टाईचा प्रयत्न केला पण अयशस्वी ठरला.

 आंदोलकांच्या मागण्या पुढीप्रमाणे:

 1)कृषी पंपाचे वीजबिल माफी व शेतीला दिवसा पुर्ण दाबाने वीज पुरवठा करावा.
2) राज्यात मोठ्या प्रमाणात ऊस गाळपविना शेतात उभा आहे, त्याला हेक्टरी २ लाख रु. अनुदान व ऊसाच्या घटलेल्या वजनास शेतक-यांना रु. १००० प्रति टन अनुदान मिळावे. 
3) उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात विकलेल्या कांदास उत्पादन खर्चावर आधारित अनुदान द्यावे व कायमस्वरूपी ३००० रु. रास्त दरासाठी ठोस निर्णय घ्यावा. 
4) दुधाला ७०:३० या सुत्राप्रमाणे एफआरपी चे कचव द्यावे. फळे व भाजीपाला पिकांचा दरवर्षी सरासरी उत्पादन खर्च काढून त्याच्या किमान
दीडपट बाजारभाव मिळण्यासाठी राज्य कृषीमूल्य आयोगाची स्थापना करून एमएसपी कायदा अमलबजावणी करावी. महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील २ लाखापुढील पात्र शेतक-यांची कर्जमाफी 
5) नियमित कर्जधारकांना ५० हजार अनुदान खरीप हंगामापूर्वी द्यावे.
6) केंद्र सरकारच्या शेतमाल आयात-निर्यात धोरणातील शेतकरीविरोधी निर्णयामध्ये बदल करून शेतकरीहिताच्या कायमस्वरूपी धोरणात्मक निर्णय घ्यावा. कांदा साखर, तांदुळ, गहू या शेतमालावरील निर्यातबंदी कायमची उठवावी
7) राज्य कृषी आयोगाची तातडीने स्थापना करावी सोलर कृषीपंपासाठी अटी शर्ती न लावता मागेल त्या शेतक-याता अनुदान मिळावे
8) सॅटेलाइट द्वारे पीक पाहणी यंत्रणा सुरू करावी
9) विद्राव्य खताना रासायनिक खताप्रमाणे अनुदान द्यावे रासायनिक खते, औषधे यावर असलेला अनुक्रमे ५१ व १८५ जी. एस. टी. कर रद्द करण्यात यावा 10) पेरणी ते कापणी पर्यंतची शेती कामे ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत करावी तसेच या योजनेसाठी जाचक अटी रद्द करण्यात याव्यात
11)  स्व. गोपीनाथ मुळे शेतकरी अपघात विमा योजनेतील पात्र शेतक-यांना सहज लाभ मिळविण्याकामी सुलभ प्रक्रिया राबवावी व इतर मागण्या

आंदोलन घडामोडी दिवस तिसऱ्या 

आंदोलकांनी एक पाऊल पुढे टाकत सकारात्मक भूमिका घ्यावी 

पुणतांबा: रहाता तालुक्यतील पुणतांबा येथे किसान क्रांती आयोजित धरणे आंदोलनला सुरवात होऊन तिसरा दिवस उजाडला आज कृषी मंत्री दादा भुसे यांचे दुत बनून आलेल्या रावसाहेब खेवरे यांनी आंदोलकांनी सकारात्मक भूमिका घेऊन एक पाऊल पुढे टाकण्याचे  आवाहन केलं,आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची शिष्टाई यशस्वी न झाल्याने आंदोलन तिसऱ्या दिवशी सुरू असून मोल मजुरी करणाऱ्या गावातील कुटुंबाला दुधाचे मोफत वाटप करून धरणे आंदोलनास सुरवात झाली. या चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विजय काकडे प्रहार जनशक्ती पक्ष राहाता तालुका युवक अध्यक्ष, आकाश खंडागळे युवक कार्याअध्यक्ष, नाशिक जिल्ह्यातील मांडवड, बागलाण, या गावच्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायतचे ठराव करून पाठिंबा दिला असून,ज्या दिवशी पुणतांबा कोअर कमिटी जे निर्णय घेतील त्याचा पाठपुरावा कसा करता येईल यासाठी आम्ही करू असे  शेतकरी संघर्ष संघटनेचे हंसराज वडगुले यांनी आंदोलकांना सांगितले. तर उपस्थित शेतकऱ्यांसमोर बोलताना रावसाहेब खेवरे अहमदनगर जिल्ह्याचे उत्तर जिल्हा प्रमुख म्हणाले राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे याचे दूत म्हणून तुम्हाला भेटण्यास आलो असून कृषी मंत्र्यांशी आपण फोन वर चर्चा करून चार तारीख दहा वाजताची वेळ निश्चित करण्यात आली असल्याने आंदोलक व सरकार यांच्यातील तिढा सुटण्याची चिन्हे दिसत आहे. तसेच याबाबत सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक असून लवकरच उर्वरित मागण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलून बैठक आयोजित करू असे आश्वासन दिले. कृषी मंत्री दादा भुसे हे तोडगा करण्यासाठी येणार. असून त्याच्या खात्याशी संबंधित मागण्या व इतर मागण्याचा संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा करूनच निर्णय घेणार.असल्याचेही खेवरे यांनी स्पष्ट केले. 
 
पुणतांबा येथे आंदोलनात उसाची होळी

पुणतांबा : किसान क्रांती मोर्चातर्फे सुरू असलेल्या आंदोलनात शेतक-यांनी उसाची होळी केली.

पुणतांबा ग्रामपंचायत सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांच्या हस्ते होळी पेटविण्यात आली. किसान क्रांती, शेतकरी संघर्ष समिती, हंसराज वढगुले, योगेश रायते, विठ्लराव जाधव, बाळासाहेब चव्हाण, मुरलीधर थोरात सुहास वहाडने, सुभाष वहाडने आदीसह शेतकरी उपस्थित होते.


Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...