Skip to main content

गांधीनगर येथे रामलीला रंगीत तालमीला उत्साहात प्रारंभ

नाशिकरोड| नाशिककरांसाठी भूषणावह रामलीला हिंदी नाटिका रंगीत तालमीला गांधीनगर मध्ये उत्साहात प्रारंभ झाला. रामायणातील विविध मुख्य प्रसंग, संवाद यावर गांधीनगर प्रेस कर्मचाऱ्यांतर्फे नियमित सराव केला जातोय.
Gandhinagar-ramlila-samiti-rangit-talim-home-guardoffice-ralilautasv
६७ वर्षांची प्रदीर्घ गौरवशाली परंपरा लाभलेल्या गांधीनगर रामलीला  समस्त रामभक्तांसाठी पर्वणीच ठरते. यातील बहुसंख्य कलावंत  प्रेस मधील कर्मचारी आहेत, हे विशेष. रामायणातील विविध मुख्य प्रसंगाची रंगीत तालीम झाली. रत्नाकर डाकू - नारद मुनी भेट, रावण अत्याचार, श्रावण वध, राम लक्ष्मण सीता जन्म, सीता स्वयंवर, मंथरा कैकयी संवाद, वनप्रस्थान व ईतरही मुख्य प्रसंग यांची रंगीत तालीम घेण्यात आली. रामाची भूमिका महेश खैरनार, लक्ष्मण - प्रदीप भुजबळ, सीता - प्रिया सुरते, दशरथ - संजय महाले, परशुराम - हरीश परदेशी, कैकयी - रचना चिंतावर, भरत - गोपाल लोखंडे, रावण - ज्ञानेश्वर कुंडारिया, विभिषण - सतीश वाणी, अंगद - शुभम परदेशी, वाली - चेतन धराडे, सुग्रीव - निशांत हुंमणे, हनुमान - संजू रासकर, नारद मुनी - मुकुंद वैद्य, शत्रुघ्न - अनिल गायकवाड, वाल्मिकी - सुनील मोदियानी, जनक - रवि वरखेडे, वशिष्ठ - सचिन दलाल, नानाजी - सुधीर मिसाळ, विश्वामित्र - विनोद राठोड, श्रावणबाळ - ओम् जाधव, श्रावण पिता - रमाकांत वाघमारे, कुंभकर्ण - रवि साळवे, मंथारा - निशा काथवटे, वैद्यराज - विजय साळवे आदी कलावंत विनामानधन तत्वावर भूमिका साकारत आहेत. 

प्रकाश योजना व ध्वनी - रोहित परदेशी, संगीत - रवि बराथे, सिद्धार्थ गवारे, नैपथ्य -सुनील मोदीयानी, दिग्दर्शक- हरीश परदेशी, सहदिग्दर्शक - संजय लोळगे जबाबदारी सांभाळत आहेत. आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, नगरसेवक अनिल ताजनपुरे, रामलीला समिती अध्यक्ष कपिल शर्मा, कैलाश वैशंपायन, सचिन देशमुख व ईतर नगरसेवक यांचे सहकार्य लाभत आहेत. गांधीनगर येथील गृहरक्षक दलाच्या कार्यालयात रंगीत तालीम नियमित सुरू आहे.



गांधीनगर मधील रामलीला हिंदी नाटिकेला ६७ वर्षांची प्रदीर्घ गौरवशाली परंपरा लाभली आहे. रामभक्तांचे पुण्य दानकर्म यावरच परंपरा टिकून आहे. प्रभू श्रीरामाची कृपा संपादन करण्यासाठी शहरातील दानशुरांनी सढळ हाताने मदत करावी.

हरीश परदेशी, दिग्दर्शक, रामलीला सेवा समिती.

---------------------------

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...