Skip to main content

नवरात्रोत्सवाचे वेध: महिला वर्गाकडून गरबारासचा सराव

नाशिक|नवरात्रोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांची  जय्यत तयारी सुरू आहे. त्यामुळे आता उत्सवाचे वेध शहरवासीयांना लागले आहे. या काळात दांडिया रासचा उत्साह काही वेगळाच असतो, त्याअनुषंगाने दांडीया प्रेमींनी ही कंबर कसली आहे, ठिकठिकाणी गरबा रासचा आयोजन होत असल्याने दांडीयाप्रेमी प्रशिक्षण व सराव करतांना दिसत आहे. दि. 26 सप्टेंबर रोजी देवीची घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होईल.
Navratrostav-Practice-of-Garbaras-by-Women

कोविड काळानंतर प्रथमच मोकळेपणाने हा उत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळं नवरात्रोत्सवाचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे.  नवरात्र म्हणजे ९ दिवस चालणाऱ्या उत्सवाला जोड असते ती दांडियाची यात अबाल वृद्धांपासून सर्वच आनंदाने सहभागी होतात. त्यात महिला वर्गाचा हिरहिरीने सहभाग असतो, गरबा रासला त्यांची विशेष पसंती असते. दांडीया गरबा रास याचे विशेष प्रशिक्षण या काळात घेतले जाते.

शहरातील नृत्यवंदना डॅान्स ॲकॅडमीतर्फे महिला स्पेशल गरबा नृत्य वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. कृषीनगर येथील समाज हॅाल येथे यावेळी ७५ वर्षीय आजीबाईपासून ते ७ वर्षाच्या चिमुकलीचा प्रशिक्षण व सरावात सहभाग दिसून आला. शिक्षिका पल्लवी रविद्र जन्नावार या दरवर्षी गरबाचे क्लास घेतात. पल्लवी या भरतनाट्यम विशारद असून त्यांच्यातर्फे गेल्या १० वर्षापासुन भरतनाट्यमचे वर्ग सिडको व कृषी नगर येथे अविरत सुरू आहे. त्यांच्या वर्गात महिलांचा मोठा सहभाग असतो  त्याअनुषंगाने नवरात्रोत्सवाच्या पर्वासाठी सर्वच वर्गातील महिला उत्साहाने गरबा नृत्याचा आनंद घेतांना या ठिकाणी दिसून आले.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...