Skip to main content

समता परिषदेतर्फे मुंबईत दि. 26 सप्टेंबर रोजी खा.शरद पवार यांच्या हस्ते सत्यशोधक चळवळीतील समाजसेवकांचा सन्मान

नाशिक| क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला दि.२४ सप्टेंबर २०२२ रोजी दिडशे वर्ष पूर्ण होत आहे. या शतकोत्सवी सुवर्ण महोत्सवा निमित्त या दिवशी नाशिक शहर व जिल्ह्यात सत्यशोधक समाजाला अभिप्रेत उपक्रम राबविण्यात यावे. तसेच वर्षभर विविध उपक्रम राबवीत हे वर्ष साजरे करण्यात यावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे यांनी केले आहे. 
On-the-occasion-of-the-centenary-golden-jubilee-year-of-the-Satya-Shodhak-Samaj

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दि.२६ सप्टेंबर रोजी मुंबईत खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या समाज सेवकांचा सन्मान करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक भुजबळ फार्म येथील कार्यालयात पार पाडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर, जिल्हाध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर दराडे, डॉ.योगेश गोसावी, उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष संतोष डोमे, शहराध्यक्ष कविताताई कर्डक, मालेगाव शहराध्यक्ष नरेंद्र सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष पूजा आहेर, महिला शहराध्यक्ष आशाताई भंदूरे, मोहन शेलार, संतोष खैरनार, विनोद शेलार, योगेश कमोद, नाना पवार, शिवा काळे, गोकुळ बत्तासे, शंकर मोकळ, राजेंद्र जगझाप, रघुनाथ आहेर, साहेबराव शेवाळे, योगेश निसाळ, श्रीराम मंडळ, भालचंद्र भुजबळ, हर्षल खैरनार, अनिल नळे  यांच्यासह जिल्ह्यातील समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे म्हणाले की, समाजातील विषमता दूर करण्यासाठी महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या समाजाच्या स्थापनेला दिडशे वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबविण्यात यावे. समता परिषद संघटना अधिक मजबूत करण्यासाठी गाव पातळीवर समता परिषदेच्या शाखा निर्माण करण्यात येऊन कार्यकारिणी तयार करण्यात यावी असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, समाजात असलेला जातीय भेदाभेद, विषमता दूर करण्यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचा स्थापना केली. बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले.  सत्यशोधक समाजाची स्थापन करून त्यांनी प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले. या सत्यशोधक समाजाला आज दिडशे वर्ष पूर्ण होत आहे. या समाजाचे विचार आजच्या काळातही अतिशय महत्वाचे असून ते समाजात रुजविण्यासाठी समता सैनिकांनी काम करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला दि.२४ सप्टेंबर २०२२ रोजी १५० वर्ष पूर्ण होत आहे. या शतकोत्सवी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थित सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास समता सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे व बाळासाहेब कर्डक यांनी केले.

यावेळी जगदीश सोनवणे, पंढरीनाथ बागुल, राजेंद्र भगत, निवृत्ती पवार, विलास दराडे, भारत पवार, मच्छिंद्र पवार, शिवाजी सोनवणे, अजय गायकवाड, चंद्रकांत विधाते, विशाल चव्हाण, संतोष पवार, आकाश विश्वकर्मा, हाजी मोईयोद्दीन शेख, आक्श म्हस्के, हरीश महाजन, दुर्गेश चीत्तोडे, पांडुरंग काकड, किरण भवसेने, सुनील देवरे, विलास वाघ, गणेश खोडे, रवींद्र शिंदे, सागर बेदरकर, सुनील घुगे, संतोष भुजबळ, मुकेश झनके, अॅड.केशव खैरे, नंदकुमार मंडलिक, अनिरुद्ध जाधव,  रामराव माळी, ज्ञानेश्वर बुल्हे, रामदास गायकवाड, यशवंत दळवी, सिद्धार्थ भामरे, रवींद्र तारडे, सुभाष जाखेरे, मोहन गवळी, प्रसाद पवार, अमोल भुजबळ,  भाऊसाहेब पवार, मेघा दराडे, सरला गायकवाड, आफरीन सैय्यद, माया घोडेराव, रुबिना सैय्यद,  माधुरी एखंडे, संगीता पाटील, लता नागरे, संगीता राऊत, अजय बागुल, विशाल म्हस्के, समाधान जाधव, दिलीप माळी, सचिन जगझाप, नितीन आहेर, विजय खोकले, भूषण लाघवे, भाऊसाहेब दिवे, बाबुराव दिवे, कचरू दिवे, नवनाथ दिवे, प्रकाश जाधव, निरंजन शिरसाठ, सागर पाटील, डॉ. रामकृष्ण महाजन, बबन शिंदे, उत्तम नागरे, ज्ञानेश्वर आंधळे, शरद नागरे, अरुण थोरात, निलेश शिंदे, पांडुरंग काकड, मच्छिंद्र माळी, पोपट जेजुरकर, भारत जाधव, दिपक गांगुर्डे यांच्यासह समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...