Skip to main content

समता परिषदेतर्फे मुंबईत दि. 26 सप्टेंबर रोजी खा.शरद पवार यांच्या हस्ते सत्यशोधक चळवळीतील समाजसेवकांचा सन्मान

नाशिक| क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला दि.२४ सप्टेंबर २०२२ रोजी दिडशे वर्ष पूर्ण होत आहे. या शतकोत्सवी सुवर्ण महोत्सवा निमित्त या दिवशी नाशिक शहर व जिल्ह्यात सत्यशोधक समाजाला अभिप्रेत उपक्रम राबविण्यात यावे. तसेच वर्षभर विविध उपक्रम राबवीत हे वर्ष साजरे करण्यात यावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे यांनी केले आहे. 
On-the-occasion-of-the-centenary-golden-jubilee-year-of-the-Satya-Shodhak-Samaj

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दि.२६ सप्टेंबर रोजी मुंबईत खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या समाज सेवकांचा सन्मान करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक भुजबळ फार्म येथील कार्यालयात पार पाडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर, जिल्हाध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर दराडे, डॉ.योगेश गोसावी, उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष संतोष डोमे, शहराध्यक्ष कविताताई कर्डक, मालेगाव शहराध्यक्ष नरेंद्र सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष पूजा आहेर, महिला शहराध्यक्ष आशाताई भंदूरे, मोहन शेलार, संतोष खैरनार, विनोद शेलार, योगेश कमोद, नाना पवार, शिवा काळे, गोकुळ बत्तासे, शंकर मोकळ, राजेंद्र जगझाप, रघुनाथ आहेर, साहेबराव शेवाळे, योगेश निसाळ, श्रीराम मंडळ, भालचंद्र भुजबळ, हर्षल खैरनार, अनिल नळे  यांच्यासह जिल्ह्यातील समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे म्हणाले की, समाजातील विषमता दूर करण्यासाठी महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या समाजाच्या स्थापनेला दिडशे वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबविण्यात यावे. समता परिषद संघटना अधिक मजबूत करण्यासाठी गाव पातळीवर समता परिषदेच्या शाखा निर्माण करण्यात येऊन कार्यकारिणी तयार करण्यात यावी असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, समाजात असलेला जातीय भेदाभेद, विषमता दूर करण्यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचा स्थापना केली. बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले.  सत्यशोधक समाजाची स्थापन करून त्यांनी प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले. या सत्यशोधक समाजाला आज दिडशे वर्ष पूर्ण होत आहे. या समाजाचे विचार आजच्या काळातही अतिशय महत्वाचे असून ते समाजात रुजविण्यासाठी समता सैनिकांनी काम करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला दि.२४ सप्टेंबर २०२२ रोजी १५० वर्ष पूर्ण होत आहे. या शतकोत्सवी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थित सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास समता सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे व बाळासाहेब कर्डक यांनी केले.

यावेळी जगदीश सोनवणे, पंढरीनाथ बागुल, राजेंद्र भगत, निवृत्ती पवार, विलास दराडे, भारत पवार, मच्छिंद्र पवार, शिवाजी सोनवणे, अजय गायकवाड, चंद्रकांत विधाते, विशाल चव्हाण, संतोष पवार, आकाश विश्वकर्मा, हाजी मोईयोद्दीन शेख, आक्श म्हस्के, हरीश महाजन, दुर्गेश चीत्तोडे, पांडुरंग काकड, किरण भवसेने, सुनील देवरे, विलास वाघ, गणेश खोडे, रवींद्र शिंदे, सागर बेदरकर, सुनील घुगे, संतोष भुजबळ, मुकेश झनके, अॅड.केशव खैरे, नंदकुमार मंडलिक, अनिरुद्ध जाधव,  रामराव माळी, ज्ञानेश्वर बुल्हे, रामदास गायकवाड, यशवंत दळवी, सिद्धार्थ भामरे, रवींद्र तारडे, सुभाष जाखेरे, मोहन गवळी, प्रसाद पवार, अमोल भुजबळ,  भाऊसाहेब पवार, मेघा दराडे, सरला गायकवाड, आफरीन सैय्यद, माया घोडेराव, रुबिना सैय्यद,  माधुरी एखंडे, संगीता पाटील, लता नागरे, संगीता राऊत, अजय बागुल, विशाल म्हस्के, समाधान जाधव, दिलीप माळी, सचिन जगझाप, नितीन आहेर, विजय खोकले, भूषण लाघवे, भाऊसाहेब दिवे, बाबुराव दिवे, कचरू दिवे, नवनाथ दिवे, प्रकाश जाधव, निरंजन शिरसाठ, सागर पाटील, डॉ. रामकृष्ण महाजन, बबन शिंदे, उत्तम नागरे, ज्ञानेश्वर आंधळे, शरद नागरे, अरुण थोरात, निलेश शिंदे, पांडुरंग काकड, मच्छिंद्र माळी, पोपट जेजुरकर, भारत जाधव, दिपक गांगुर्डे यांच्यासह समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...