Skip to main content

महाराष्ट्रात नविन प्रकल्प आणावा अन्यथा राज्य सरकारला स्वस्थ बसू देणार नाही: मेहबूब शेख

नाशिक| वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात तीव्र आंदोलन करून उपायुक्त रमेश काळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधातील विविध घोषणानी परिसर दणाणला होता

आंदोलनात यावेळी युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, निवृत्ती अरिंगळे, चेतन कासव, गणेश गायधनी, जगदीश पवार, योगेश निसाळ, विक्रम कोठुळे, पूजा आहेर, कुंदा सहाणे आदि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आपल्या भाषणात म्हणाले की, वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा सुमारे दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असणारा प्रकल्प गुजरातला हलविण्यात आला. यामुळे महाराष्ट्रातील सुमारे १.५४ लाख हक्काचे रोजगार हिरावले गेले. महाविकासआघाडी सरकारच्या काळात अनेक प्रोजेक्ट राज्यात येणार होते. वेदांता कंपनीने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेशमध्ये पाहणी केली होती. त्यानंतर सर्व अटींचा विचार करून महाराष्ट्र अंतिम केले. वेदांताच्या वरिष्ठ टीमने सुद्धा तळेगाव दाभाडे हीच योग्य जागा सांगितली होती. मात्र, ही गुंतवणूक राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये गेल्याने २ लाख लोकांचा रोजगार गेला आहे. यामुळे जनतेमध्ये नाराजी झाल्याने जनता निवडणुकीत यांचा हिशोब चुकता करणार आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रात नविन प्रकल्प आणावा अन्यथा राज्य सरकारला स्वस्थ बसू देणार नाही अशा इशारा यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिला.

याप्रसंगी दिनेश धात्रक, मंगेश लांडगे, भूषण शिंदे, विजय गांगुर्डे, प्रविण बोराडे, संजय पगारे, स्वप्निल कासार, प्रकाश थामेत, अजय बागुल, संजय सोदे, अक्षय खालकर, प्रशांत अरिंगळे, समाधान कोठुळे, जयेश अहिरे, प्रीतेश भदाणे, सचिन ठाकरे, आकाश वराडे, संदीप खैरे, किरण कतोरे, सुनील आहेर, बाळा निगळ, सोनू वायकर, महेश शेळके,सचिन मोगल,सचिन पवार?संदिप गोतरणे?दत्ता वाघचौरे,बापु जगताप,शांताराम झोले,सम्राट काकडे,विशाल डोके, रुपाली पठाडे, नियमात शेख, अक्षय कहांडळ, डॉ संदीप चव्हाण, रूषिकेश पिंगळे,आकाश पिंगळे,प्रकाश थामेत, विजय गांगुर्डे, निखिल भागवत, मुकेश शेवाळे, राहुल कमानकर, अक्षय पाटील, गौतम पगारे, हर्षल चव्हाण, चंद्रकांत साडे, गोरख ढोकणे, किरण पानकर, सुनिल घुगे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...