Skip to main content

एक तरी छंद जोपासावा: चेतन राजापूरकर

छंद

मानसिक तणाव दूर करण्यासाठी सध्याच्या स्पर्धात्मक व धावपळीच्या  जीवनशैलीत अनेकदा मानसिक तणाव निर्माण होत असतो आणि हा तणाव आपले मानसिक खच्चीकरण करीत आहेत. मनावरील तणाव हा घटक आपल्या जीवनशैली प्रतिकूल परिणाम करीत असतो तणावामुळे आपली आनंदी जीवन जगण्याची आपली क्षमता कमी होते व आपली एकाग्रता कमी होते.
Cultivate-at-least-one-hobby-Chetan-Rajapurkar
सध्याच्या या स्पर्धात्मक वातावरणात आपण मानसिक तंदुरुस्त असणे जास्त गरजेचे असते अश्यावेळी नैराश्यने व तनावाने ग्रासलेला आपल्या मेंदूला सकारात्मक प्रवाहात आणण्यासाठी सर्वात जास्त उपयोगी पडतो तो म्हणजे आपला छंद  मग तो कुठलाही असो अगदी काहींना आगपेट्यांचे कव्हर तर काहींना रिकाम्या बाटल्यांचे झाकण पोस्टल स्टॅम्प तर काहींना प्राचीन नाणे छंद म्हणजे आपल्या फावल्या वेळात काहीतरी विशिष्ट वस्तू व त्याचे विविध प्रकार जमवतो त्याचा अभ्यास करतो ते करीत असताना मनाला एक वेगळाच आनंद मिळत असतो. त्याला छंद म्हणतात . छंद जोपासणारा व्यक्ती कधीच मानसिक तणावाला बळी पडत नसतो तो त्याच्या छंदात इतका एकरूप झालेला असतो की त्याला तो जगातील सर्व दुःख विसरतो जगण्याचा खरा आनंद घेत असतो 

आजच्या तणावाच्या काळात देखील प्रत्येकाने आपला एक छंद जोपासावा मग तो कुठलाही असो अगदी काहींना गाणे ऐकण्याचा गाणे गुणगुणाचा , नवीन पुस्तके वाचण्याचाही आपला जास्तीत जास्त वेळ या छंद व प्रत्येक छंदाचे शास्त्र असते ते शास्त्र शिकण्यात घालवावा.त्याचा फायदा आपल्या दैनंदिन आयुष्यात देखील आपल्याला होतो त्यात आपला छंदच आपली ओळख बनला त्याहून जास्त भाग्य काय म्हणावे मी प्राचीन नाणे जमा करण्याचा छंद आहे मी ठामपणे सांगू शकतो की नाणे संग्रह करणारा व्यक्ती कायम आनंदी आणि तणावमुक्त असतो तो त्याच्या छंदात पूर्णपणे एकरूप झालेला असतो आपला छंदच आपल्याला घडवत असतो आपल्याला आनंदी जीवनाचा रस्ता दाखवत असतो 

नाणकशास्त्र व संधी 

प्रत्येक विषयाचा एक शास्त्र असते . तसेच प्राचीन नाणे त्याचा अभ्यास करण्यासाठी एक शास्त्र आहे त्यास नाणकशास्त्र असे म्हटले जाते अलीकडे या विषयाचे अभ्यासक्रम सुद्धा सुरू झालेले आहेत. नाणकशास्त्र क्षेत्राकडे विद्यार्थांचा कल कमी असल्याने या क्षेत्रात करियरच्या चांगल्या संधी उपलब्द आहेत. नाणकशास्त्र अभ्यास क्रम पूर्ण केल्यानंतर पुरातत्व विभाग, ऑक्शन हाऊस इत्यादी संधी मिळू शकते या दृष्टीने देखील विध्यार्थीना बघायला हवे. 

माझा नाणे संग्रह 

मला गेल्या तीस वर्षांपासून प्राचीन नाणे जमविण्याचा छंद आहे.हा छंद मला कसा जडला हे मलाही कळले नाही आमच्या घरात काही प्राचीन नाणे आहेत ते नाणे दिवाळीच्या दिवशी पूजे साठी काढले जायचे त्यामुळे लहान पणापासूनच दिवाळी आणि नाणे बघायला मिळणार याची उत्सुकता असायची त्यातूनच हा छंद जोडला गेला आणि आज हा छंदच माझी ओळख होऊन बसला याचा फार मोठा आनंद होतो . छंद असणारी व्यक्ती कधीही कुठल्याही व्यसनाकडे जाऊ शकत नाही कारण आपल्या छंदाचीच इतकी चांगली नशा असते की तू कुठेही वाईट व्यसनाकडे जाऊच शकत नाही त्यामुळे प्रत्येकाने आपल्या लहान मुलांना एक तरी छंद जोपासला शिकवले पाहिजे.  

छंद जोपासत असताना आपला सकारात्मक दृष्टिकोन विकास होतो व आपण सकारात्मक विचार करू लागतो. छंद असणारा व्यक्ती खरा जीवनाचा आनंद घेत जगत असतो त्यातून कोणत्याही रोगावर मात करण्याची शक्ती शरीरात तयार होत असते. आताच्या या महामारीच्या काळात प्रत्येकाने एक तरी छंद जोपासून सकारात्मक राहिल्यास नक्कीच आपल्याला कोरोनावर विजय मिळवता येऊ शकतो

                    चेतन राजापूरकर 
    प्राचीन नाणे संग्राहक व अभ्यासक
                       9850111503

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...