Skip to main content

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दि. २१ ऑक्टोबरला विविध क्षेत्रातील मान्यवरांचा नाशिकरत्न पुरस्काराने सन्मान

नाशिक| जिल्हयाच्या निर्मितीस यंदा १५१ वर्ष पुर्ण होत आहे. यानिमित्ताने यंदाचे वर्ष हे जिल्हयाचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. नाशिकच्या या अभुतपूर्व वाटचालीचा गौरवशाली इतिहास पुन्हा एकदा उलगडवून सांगतानाच तो सर्वांसमोर यावा याकरीता नाशिक न्यूजच्यावतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या यानिमित्ताने (दि. २१) रोजी आयोजीत या सोहळयात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, युवराज संभाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यानिमित्ताने नाशिकच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणार्‍या मान्यवरांना नाशिक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 
In-the-presence-of-Chief-Minister-On-October-21-dignitaries-from-various-fields-were-honored-with-the-Nashikartna-Award
नाशिक जिल्हा निर्मितीची १५१ वर्ष आणि जनसामांन्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणार्‍या नाशिक न्यूज या वृत्त वाहिनीचा ११ वर्धापनदिन असा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. जिल्हयाने इतिहास, भूगोल, शास्त्र, भाषा, कृषी, उद्योग,व्यापार या सर्वच  विषयांत वास्तविकतेत आपला स्वतःचा उच्चतम दर्जा निर्माण करून एक वेगळे उदाहरण जिल्ह्याच्या रुपाने जगासमोर उभे आहे. प्रभू रामचंद्रांपासून ते ब्रिटिश शासनापर्यंतचा इतिहास, साहित्याचे मेरूमणी असलेले कुसुमाग्रज, वसंत कानेटकर यांसारख्या प्रभुती, संगीताची परिभाषा निश्चित करणारे पंडित विष्णू दिगंबर पलुसकर, बॉलिवूडचा पाया घालणारे दादासाहेब फाळके, देश रक्षणासाठी अहर्निश सेवेत असलेले आर्टिलरी सेंटर आणि नोटांचा कारखाना, छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पाऊलखुणा अशा अनेक वैशिष्ठ्यांचा यानिमित्ताने उल्लेख करता येईल.  जिल्ह्याने प्रगतीचे अनेक टप्पे अनुभवले आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते जगासमोर आणताना नाशिकचे ब्रँडिंगही होणे गरजेचे आहे. हवामान, संस्कृती, कला, क्रीडा, संगीत, साहित्य अशा विविध क्षेत्रात जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. नाशिक न्यूजच्या वतीने आयोजित  या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही ओळख अधिक प्रभावीपणे देशपातळीवर पोहोचविण्यासाठी एक व्यासपीठ  निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नाशिक १५१ हा केवळ उत्सव नसून नाशिकच्या पुढील वाटचालीची पायाभरणी ‘नाशिक न्यूज’च्या माध्यमातून या कार्यक्रमाव्दारे करण्यात येणार आहे. 

शनिवार (दि. २१)  रोजी दुपारी १२ वाजता कालिदास कला मंदिर येथे आयोजीत या सोहळयानिमित्त  राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, जिल्हयाचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आ.सुहास कांदे, आ. देवयानी फरांदे, आ. अ‍ॅड. राहूल ढिकले, आ. सिमा हिरे, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष रविंद्र सपकाळ, मनसे नेते सलिम शेख आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नाशिकच्या या ऐतिहासिक वाटचालीचे साक्षीदार व्हा असे आवाहन नाशिक न्यूजचे मुख्य संपादक लक्ष्मण घाटोळ, संचालक श्रीकांत सोनवणे, दिपाली घाटोळ पाटील यांनी केले आहे. 

*यांचा होणार सन्मान*

केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (राजकीय), मविप्र सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे (विधीज्ञ), नाशिक फ्लॉवर पार्क आणि शुभम वॉटर पार्कचे संचालक शशिकांत जाधव (पर्यावरण) , अँटी करप्शन विभागाचे अधिक्षक सुनिल कडासने (पोलिस प्रशासन), रूंग्टा गुपचे अध्यक्ष ललित रूंग्टा (बांधकाम), आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकिय संचालक लीना बनसोड (प्रशासकीय), मयुर अलंकारचे संचालक राजेंद्र शहाणे (व्यापार), वैद्यकिय अधिक्षक डॉ. आवेश पलोड (वैद्यकिय), ईशा पब्लिसिटीचे सीईओ प्रविण मराठे (उद्योग), साने गुरूजी शिक्षण संस्था शैक्षणिक, प्रयोगशील शेतकरी शिवाजी ढोले (शेती).

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...