Skip to main content

रेशन सर्व्हर समस्या: शासनाकडून रेशन दुकानांना भेटी देण्याचे तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना निर्देश

नाशिक| सर्व्हरच्या अडचणीमुळे ईपॉस मशिनद्वारे धान्य वितरणात बाधा उत्पन्न होत असल्याने शिधापत्रिका धारकांना ताटकळत उभे राहावे लागत होते, अखेर शासनाने सर्व्हरमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींची दाखल घेत अधिकाऱ्यांना स्वस्त दुकांनाना भेटी देऊन त्याबाबत अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान याबाबत उपसचिव यांनी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना 29 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत स्वस्त धान्य दुकानांना भेटी देऊन तसा अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहे. 
Ration-server-issue-Govt-directs-Tehsildar-SubDivisional-Officers-to-visit-ration-shops
तसेच रेशन संघटनेने (nic) 'एनआयशी' सोबत चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली असता त्यांच्याकडून 3 जी नेटवर्क वरून 5 जी नेटवर्कवर कनेक्टव्हिटी देण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे असे, महाराष्ट्र फेडरेशनचे राज्यध्यक्ष गणपत डोळस पाटील व सचिव बाबुराव म्हमाने यांनी सांगितले असून आम्ही एनआयसीशी संपर्कात असल्याचे सांगितले. तसेच राज्यातील रेशन धान्य दुकानदारांच्या अडचणींबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे डोळस व म्हमाने यांनी स्पष्ट केले.


धान्य वितरणास 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी
ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 2022 ची धान्य वितरणाची मुदत ही 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत वाढवून मिळावी याबाबत प्रशासनाने दखल घ्यावी. जेणे करून शिधापत्रिका धारकांची गैरसोय होणार नाही अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

निवृत्ती कापसे
नाशिक जिल्हाध्यक्ष, 
रेशन दुकानदार फेडरेशन

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...