Skip to main content

'सैफ' झोनमध्ये 60% भारतीय कंपन्या; महिला उदोजकांसाठी खास प्रोत्साहन पॅकेज: पी राजीव

नाशिक|शारजाह एक उदयोन्मुख व्यापार केंद्र असून,  उत्कृष्ट जमीन, सागरी आणि हवाई संपर्कांद्वारे अद्वितीय लॉजिस्टिक फायदे देते.  नाशिकमधील व्यापारी समुदायाने सैफ (SAIF) झोनमध्ये आपला व्यवसाय सुरु करून युएई सरकार देत असलेल्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सैफ झोनचे अधिकारी पी राजीव यांनी केलं
60percent-Indian-companies-in-SAIF-zone-Special-incentive-package-for-women-entrepreneurs-p-rajiv
भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यात नुकत्याच स्वाक्षरी झालेल्या 'व्यापक आर्थिक भागीदारी करारांतर्गत, भारतातून 'युएई'मध्ये निर्यात केल्या जाणाऱ्या बहुतांश वस्तूंवरील आयात शुल्क कमी केले किंवा कमी करण्याचे मान्य करण्यात आले आहे. या अनुषंगाने, द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (ASSOCHAM) आणि शारजाह सरकार  यांच्या संयुक्त विद्यमाने व  महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर (MACCIA) च्या पाठिंब्याने; अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (AIMA) आणि स्त्री उद्यमी फाउंडेशनने नाशिकमध्ये भारतीय उद्योगांसाठी युएई  मधील विविध व्यवसाय संधी आणि SAIF झोनमध्ये व्यवसाय सुरू करण्याच्या फायद्यांविषयी जागरुकता करण्यासाठी परिषदेचे आयोजन केले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. 

सैफ झोनमधील जवळपास 60 टक्के गुंतवणूकदार भारतातील असून, महिला उद्योजकांना आपला व्यवसाय इथे सुरु कर्णयसाठी युएई सरकार तर्फे खास प्रोत्साहन पॅकेज देण्यात येते. युएई मधील मुक्त व्यापार क्षेत्राची संकल्पना स्पष्ट करताना, सैफ झोनचे अनूप वॉरियर यांनी, सैफ झोनमध्ये व्यवसाय संस्था स्थापन करणे, भारतीय कंपन्यांसाठी अत्यंत आकर्षक असू शकते यावर प्रकाश टाकला. नाशिक आधारित उद्योग  युएई , विशेषतः शारजाह सैफ झोनचा आफ्रिका आणि युरोपसाठी पुनर्निर्यात आधार म्हणून फायदा घेऊ शकतात. 2.5 लाख भारतीय रुपयांपेक्षा कमी खर्चात, कोणतीही कंपनी सैफ झोनमध्ये कार्यालय उघडू शकते, ज्यामध्ये एक वर्षाचे भाडे, वीज, पाणी, सर्व परवानग्या आणि 3 निवासी व्हिसा यांचा समावेश आहे. 

यावेळी आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, एमएसएमईचे अध्यक्ष आशिष नहार, स्त्री उद्यमी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा स्वाती शहा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. बी२बी मध्ये नाशिकमधील सुमारे १२५ उद्योजकांनी चर्चा केली असून, यापैकी अनेक जणांनी सैफ झोन मध्ये व्यवसाय सुरु करण्यास अनुकूलता दाखवली आहे.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...