Skip to main content

आरोग्य विज्ञान विद्यापीठात बालक शोषणाविरोधात जनजागृती पदयात्रेचा समारोप

नाशिक| जागतिक बालक शोषण विरोध दिनानिमित्त जनजागृती करण्यासाठी औरंगाबाद ते आरोग्य विद्यापीठ दरम्यान  महात्मा गांधी मिशन इन्स्टिटयुट ऑफ फिजीओथेरपी महाविद्यालयाच्या सत्तर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या रॅलीचा समारोप आरोग्य महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात करण्यात आला. दि. 17 नोव्हेंबर  पासून औरंगाबाद येथून या रॅलीचा प्रारंभ करण्यात आला होता. या  रॅलीचा प्रमुख उद्देश हा बाललैंगिक शोषणाच्या विरोधात जनजागृती व प्रबोधन करण्याचा होता. या 210 किलोमीटरच्या रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी पथनाटयाव्दारे संदेश देण्याचे कार्य केले.  
Awareness-walk-against-child-abuse-concluded-in-University-of-Health-Sciences
याप्रसंगी विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प. यांनी दृकश्राव्य संदेशाव्दारे सांगितले की, सक्षम आणि संवेदनाशील पिढी घडविण्यासाठी बाल अवस्थेत मुलांना सुयोग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या प्रवेशव्दारापासून ते विद्यापीठ परिसरापर्यंत विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या रॅलीत सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मोरे, उपकुलसचिव डॉ. सुनिल फुगारे, डॉ. संजय नेरकर, डॉ. स्वप्नील तोरणे,  इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा श्रीमती धारा मालुंजकर, महात्मा गांधी मिशनचे सचिव श्रीमती प्रेरणा दळवी, प्राचार्य डॉ. शरद बाबू आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. या उपक्रमासाठी श्री. बाळासाहेब पेंढारकर, श्री. राजेश इस्ते, श्री. आबाजी शिंदे यांनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...