Skip to main content

रुची, गंध, श्रवण, दृष्टी, स्पर्श असे पंचेंद्रियांना समर्पित उद्यानाचे लोकार्पण

नाशिक| महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसरात रुची, गंध, श्रवण, दृष्टी, स्पर्ष असे  पंचज्ञानेद्रियांना समर्पित ’विद्यापीठ संवेदना उद्यान’ तयार करण्यात आले आहे. या उद्यानाचा लोकार्पण सोहळा विद्यापीठाचे मा. कुलगुरु लेफ्टनंन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. 
Inauguration-of-a-park-dedicated-to-the-five-senses-of-taste-smell-hearing-sight-and-touch
याप्रसंगी मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलींद निकुंभ, प्रमुख अतिथी म्हणून चेन्नई येथील कर्मचारी राज्य विमा निगम महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, लेफ्टनंन्ट जनरल डॉ. राजीव कानिटकर (निवृत्त) ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद पिंपरीकर, डॉ. षुभंागी पिंपरीकर, अधिष्ठाता डॉ. सुषीलकुमार झा, वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही. कळसकर, उपकुलसचिव डॉ. सुनील फुगारे, डॉ. संजय नेरकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
याप्रसंगी विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनंन्ट जनरल माधुरी कानिटकर यांनी संागितले की, पर्यावरण संवर्धनसाठी मानवी षरिरातील पंचज्ञानेंद्रीयांवर आधारित संवेदना उद्यान तयार करण्यात आले आहे. मेडिकल टुरिझमच्या अनुषंगाने विद्यार्थी व अभ्यागतांना संवेदना उद्यानातील वृक्षांची माहिती व मांडणी महत्वपूर्ण आहे. तसेच संवेदना उद्यान पर्यावरण व स्वास्थ्यासाठी सर्वांना उपयुक्त आहे. विद्यापीठात ’ग्रीन कॅम्पस’ उपक्रमांतर्गत मोठया प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली आहे. विद्यापीठ आवारात विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलींद निकुंभ यांनी सांगितले की, विविध वृक्ष, फुलझाडे यांचे वर्गीकरण करुन करुन विद्यापीठात संवेदना उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. जीवनात आत्मा, मन व इंद्रीय यांचे महत्व अधिक आहे. या तत्वांचा वापर करुन उद्यानात वृक्षलागवड करण्यात आली आहे. संवेदना उद्यानांत लागवड करण्यात आलेली वृक्ष परिसरात वावरतांना ध्वनी, गंध आदी इद्रियांना प्रभावित करतील अशी संकल्पना त्यामागे असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा चेन्नई येथील कर्मचारी राज्य विमा निगम महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या ग्रीन कॅम्पस उपक्रमांतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संवेदना उद्यानाकरीता परिश्रम घेतले आहेत. उद्यानात लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची काळजीपूर्वक जोपासणा करण्यात आली आहे. या वृक्षांचे वर्गिकरण रुची, गंध, श्रवण, दृष्टी, स्पर्श या पंचज्ञानेंद्रांवर आधारित आहे. संवेदना उद्यानाच्या निर्मितीत काम करण्याची संधी मिळाली हे माझ्यासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.  
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, संवेदना उद्यानाची संकल्पना अतिशय उल्लेखनीय आहे. पर्यावरण संवर्धनासमवेत आरोग्य स्वास्थ्यासाठी हे उद्यान उपयोगी आहे. वृक्षांचे वर्गीकरण, लागवड व केलेली जोपसणा कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यापीठाचे उपकुलसचिव तथा हरीत कक्षाचे प्रमुख डॉ. सुनील फुगारे यांनी सांगितले की, विद्यापीठातील संवेदना उद्यानाच्या निर्मितीकरीता माजी कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी अधिक परिश्रम घेतले आहेत. माननीय कुलगुरु महोदया यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ग्रीन कॅम्पस संकल्पना राबविली याचे मूर्त रुप विद्यापीठातील संवेदना उद्यान असल्याचे त्यांनी सांगितले.   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार उपकुलसचिव डॉ. संजय नेरकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मा. कुलगुरु महोदया यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.



रुची उद्यानातील वृक्ष- वनस्पती

फालसा, धामणी, अटरुन, भोकर, शिवण, जंगली अजान, अॅपल बोर, चोरोळी, सिताफळ, पेरु, अंजीर , आंबा, नारळ, चिकु , गोरख चिंच, फणस, सुपारी, मरुड शेंग, रामफळ, निंबु, संत्र्ाा, डॅªगन फुड, चेरी, मोसंबी, जांभुळ, चिंच, डाळींब.  
श्रवण उद्यानातील वृक्ष व वनस्पती
गोल्डन बांम्बु, मारवेल बांम्बु, पम्पस गा्रस, सादडा

गंध उद्यानातील वृक्ष- वनस्पती

कुडा, चित्रक, मेहंदी, निरगुडी, हेन्कल, अडुळसा, प्लंबेगो, अबोली, कोरंटी, कुफीया, मुसांडा, कबवासी, जाटारोफा, अॅलीसम, एक्सझोरा, धायटी, पारिजातक, अंकोल, मुचकुंद, टीकोमा, रातराणी, मधुकामिनी, मोगरा, प्लुमेरिया आल्बा, हिबिक्सस, गावराण गुलाब, अनंता, जाई, जुई, रानजुई, कुंदा, सोनचाफा, प्लुमेरिया रुबरा, सितारंजन, लेमणग्रास, मारवा 

दृष्टी उद्यानातील वृक्ष- वनस्पती

रोईओ, टाकला, तरवड, कन्हेर, फाईक्स, जास्वंद, हमेलिया पॅटर्नस्, क्रॉटन, टगर, शंकासुर, मालफिगीया

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...