Skip to main content

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जाती अंताची चळवळ बळकट करण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज : रवी मानव

देशवंडी (सिन्नर)| प्रतिनिधी| सामाजिक तथा आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते प्रवीण कर्डक (देशवंडी) यांनी त्यांच्या मातोश्री कलाकथित विमल रतन कर्डक यांच्या शोक सभेच्या निमित्ताने कुठलही धार्मिक कर्मकांड, अंध श्रद्धा, दुखवटा यास फाटा देत आपण आपला सामाजिक बांधिकली व जबाबदारीचा वसा आणखी कसा पुढे नेऊ शकतो याचा विचार करून परिवर्तनवादी विचारवंत अमरावती येथील प्रसिद्ध व्याख्याते रवी मानव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करून खऱ्या अर्थाने समाज प्रबोधन अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद निर्मूलन  या विषयी मार्गदर्शन केले.
Community-efforts-needed-to-strengthen-Dr-Babasaheb-Ambedkars-caste-end-movement-Ravi-Manav
द्वेष उच्च नीच, हेवे दावे याला मूठमाती देऊन सुशिक्षित सुज्ञ जबाबदार, कर्तव्यदक्ष समाज कसा निर्माण करता येईल यासाठी काय केले पाहिजे या विषयी रवी मानव यांनी संत गाडगेबाबा छ. शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, शाहू महाराज डॉ आंबेडकर यांचे दाखले देत प्रकाश टाकला. शिक्षणच्या अभावामुळे व अज्ञानामुळे लोकांच कसे शोषण केलं जातं ते अंधश्रद्धेला बळी पडतात, कर्मकांडाच्या भूत प्रेताच्या मागे लागून आणखीन भरकटतात. त्यासाठी आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे म्हणून सर्वांनी सुशिक्षित होऊन कर्मकांड अंधश्रद्धा याला कुठलाही थारा न देता आपला स्वतःचा आपल्या गावाचा आपल्या समाजाचा व आपल्या संपूर्ण देशाचा कसा विकास होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असा संदेश देत समाज प्रबोधन केले. व त्याबरोबर शिक्षण व्यवस्थेतील, राजकीय व्यवस्थेततील गैरप्रकारांवर प्रकाश टाकला.
 
जागतिकिकरणाचे जीवघेणे कायदे व व्यक्ती, समाज व राष्ट्रवरील विपरीत परिणाम, खाजगीकरणात आरक्षणाची नसलेली तरतूद नव्या पिढीला नीट समजून न सांगता जाती-जातीमध्ये राजकिय षडयंत्र करून त्यांची माथी भडकवली जात आहेत. माती व मतीची मशागत केल्या शिवाय बुद्ध-कबीर, तुकोबा, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगता येणार नाही असे मत यावेळी बोलतांना लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे संस्थापक, कार्याध्यक्ष प्रा. शरद शेजवळ यांनी व्यक्त केले.

शोकसभा (उद्बोधन) च्या अध्यक्षस्थानी जेष्ट आंबेडकरी कार्यकर्ते पोपटराव जाधव हे होते. धम्म संस्कार विधी बाळासाहेब आव्हाड यांनी केला. नाशिक महानगर पालिकेच्या माजी नगरसेविका प्रा.कविताताई  कर्डक, उदयभाऊ सांगळे, अमर ताविडे, महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे डॉ.वाळके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शरद शेजवळ यांनी केले, सूत्रसंचालन किशोर सोनवणे यांनी केले. आभार प्रवीण कर्डक यांनी मानले.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...