Skip to main content

मराठा साम्राज्याचे चलन: एक दिवसीय परिसंवाद

नाशिक|छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यावर अंगात संचारणारी ऊर्जा वेगळीच असते. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन ३५० वर्षांपूर्वी घडविलेला इतिहास आजही प्रेरणादायी आहे. स्वराज्य निर्माण होत असताना, आणखी एक गोष्ट रूप घेऊ लागली होती आणि ती म्हणजे स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे चलन. महाराजांनी स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे चलन सुरू करणे ही काही साधारण घटना नव्हती. या घटनेचा आणि छत्रपतींच्या शिवराईसह मराठा साम्राज्यातील चलनांवर छत्रपती शिवाजी महाजरांच्या ३५० व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाच्या दर्शनिका विभाग आणि के. टी. एच. एम. महाविद्यालया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठा साम्राज्याचे चलन’ या विषयावर राज्यस्तरीय एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे.
Currency-of-the-Maratha-Empire-A-One-Day-Seminar


ही कार्यशाळा रविवारी, १७ मार्च रोजी गंगापूररोडवरीलके. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या व्हीएलसी सभागृहात होत आहे. ही कार्यशाळा सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे. या कार्यशाळेत चार वक्ते मराठा साम्राज्यातील चलन या विषयावर व्याख्यान देणार आहेत. १)श्री प्रशांत ठोसर, २) श्री पुरुषोत्तम भार्गवे, ३) श्री आशुतोष पाटील, ४)श्री रमेश पडवळ

‘मराठा साम्राज्याचे चलन’ या विषयावर राज्यस्तरीय एक दिवसीय परिसंवादाचे उद्‌घाटन श्री नितिन मुंडावरे  सर उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते होणार असून, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दर्शनीका विभागाचे सचिव डॉ दिलीप बलसेकर व KTHM कॉलेजचे प्राचार्य आर. डी . दरेकर  उपस्थित राहणार आहेत. राज्य परिसंवाद मध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी ९८५०१११५०३ (चेतन राजापूरकर ) या नंबरवर करायची आहे 


इतिहास अभ्यासकांसाठी महत्वपूर्ण

छत्रपति शिवाजी महाराजांच्या  शिवराज्याभिषेकला ३५० पूर्ण झाले या निमित्ताने मराठा साम्राज्याचे चलन याविषयी परिसंवाद महाराष्ट्र शासन व KTHM महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. हा कार्यक्रम इतिहास अभ्यासकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे सर्व   अभ्यासकांनी जरूर सहभागी व्हावे

चेतन राजापूरकर 
प्राचीन नाणे संग्राहक व अभ्यासक

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...