Skip to main content

भाजपकडून सीमा हिरे, राहुल ढिकले, दिलीप बोरसे, डॉ. राहुल आहेर यांना पुन्हा संधी

नाशिक| दिअँकर वृत्तसेवा|भारतीय  जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली ९९ उमेदवारांची यादी रविवारी जाहीर केली आहे. यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावित यांची ही नावे यादीत आहेत. नाशिक जिल्ह्यातील विदयमान ४ आमदारांवर विश्वास दाखवून त्यांना पुन्हा संधी दिली आहे. 

लोकसभा निकाल जून २०२४ मध्ये जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली होती. महाराष्ट्र आणि  झारखंड राज्याची निवडणुक जाहीर झाली. महाराष्ट्रात  २० नोव्हेंबरला एकाच दिवशी मतदान होत असून, २३ नोव्हेंबरला निकाल आहे. विधानसभेची आचारसंहिता लागल्यानंतर सर्वांचेच लक्ष उमेदवारीकडे लागले होते. त्यात भारतीय जनता पक्षाने बाजी मारत आपल्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 

या यादीत नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, नाशिक पूर्व राहुल ढिकले, बागलाणमध्ये दिलीप बोरसे, चांदवडला डॉ. राहुल आहेर यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे चांदवडमध्ये डॉ. राहुल आहेर यांनी दोन तीन दिवसां पूर्वीच माघार घेतली होती. येथे बंधु नाफेडचे  संचालक केदा आहेर यांना उमेदवारीसाठी पक्षाकडे शिफारस देखील  केली होती. पण, या ठिकाणी पक्षाने पुन्हा एकदा डॉ. राहुल आहेर यांनाच संधी दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी केदा आहेर काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहेत. 

भाजपने दाखवला हिरे यांच्यावर विश्वास 

दोन दिवसांपूर्वीच नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात पक्षातील विरोधकांनी एकत्र येत त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. भाजपा वसंत स्मृती कार्यालयात शहर अध्यक्ष प्रशांत जाधव यांच्याकडे सीमा हिरे यांच्या विरोधात तक्रार केली होती. कोणीही चालेल पण सीमा हिरे नको अशी उघड भूमिका घेतली होती. तरीही पक्ष श्रेष्ठींनी हिरे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. 

पूर्वमध्ये गीते, सानप यांच्या भूमिकेकडे लक्ष 

नाशिक पूर्व मतदार संघातून भाजपकडून माजी आ. बाळासाहेब सानप, माजी स्थायी सभापती गणेश गीते इच्छुक होते. परंतु गीते यांनी उमेदवारी मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी तुतारीसाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु राष्ट्रवादीकडून जगदीश गोडसे, अतुल मते यांच्याकडून देखील जोरदार लॉबिंग सुरू आहे. आता शरद पवार हे कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

----------------------------------------------

विकासकामांची पावती

महायुतीने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरविणार आहे. मागील कार्यकाळात जनतेशी प्रामाणिकपणे जपलेले नाते, तसेच आपण केलेल्या विकासकामांची खरी पावती आहे. तिसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवत आहोत. यामध्ये सर्व मतदार बंधू-भगिनींचे प्रेम, आशीर्वाद तसेच स्थानिक व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा संपूर्ण पाठिंबा मिळत आहे.  सर्वांच्या आशीर्वादामुळे, यंदाची निवडणूक आपण विजयानेच संपन्न करू, याचा  पूर्ण विश्वास आहे.

सीमा हिरे, 
भाजपा उमेदवार, नाशिक पश्चिम 


----------------------------------------------
पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार

वरिष्ठ नेत्यांनी दाखविले ल्या विश्वासाला पात्र ठरेल. गेल्या ५ वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामामुळे जनता जनार्दन पुन्हा एकदा आपल्याला प्रतिनिधीत्व करण्याची नक्की संधी देखील, असा विश्वास आहे.  पक्ष अंतर्गत कोणाचाही विरोध नसून, वरिष्ठ नेते याबाबत लक्ष घालून संघटनात्मक बांधणी करतील. 

राहुल ढिकले, 
भाजपा उमेदवार, नाशिक पश्चिम 

----------------------------------------------
निष्ठेचे फळ मिळाले

भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की या पक्षात निष्टेने काम करत राहावं लागतं. भाजपा कडे कधीही काही मागावं लागत नाही. भाजपाकडे जो तिकीट मागतो त्याला कधीच मिळत नाही. भाजपा हा कार्यकर्त्याचं काम पाहून उमेदवारी देणारा पक्ष आहे.भाजपाने आमच्या बोरसे कुटुंबियांवर २००४ पासून जो विश्वास ठेवला त्याबद्दल आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभारी आहोत. २०२४ च्या बागलाण विधानसभा निवडणुकीत मतदार भाजपाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील याचा मला ठाम विश्वास आहे. 

दिलीप मंगळू बोरसे 
भाजपा उमेदवार, बागलाण

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...