Skip to main content

उद्योग'रत्न' निखळलं : भावपूर्ण श्रद्धांजली

उद्योग'रत्न' निखळलं 

उद्योगपती रतनटाटा यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने, देशच नव्हे तर जगभर हळहळ व्यक्त झाली. रतनटाटा हे सामाजिक जाणिव असलेले उद्योगपती होते. उद्योग, व्यवसाय वाढवत असताना सामान्य माणूस त्यांच्या केंद्रस्थानी राहिला. उदाहरण द्यायचे झाले तर १ लाखात सामान्य माणसाला नॅनो कार देणे हे रतन टाटांना शक्य झाले. त्यांनी नेहमी सामजिकभान राखलं. एवढ्या मोठ्या समुहाचे चेअरमन असताना त्यांनी सामाजिक उत्तरदायित्व व साधी सरळ जीवन पद्धती अवलंबली. उदरनिर्वाह व जगण्यासाठी जेवढया आवश्यक बाबी आहेत. त्याच स्वीकारल्या, झगमगाट व आलिशान जीवन पद्धतीला त्यांनी फारसे महत्व दिले नाही. त्यामुळेच एखाद्या सामान्य व्यक्तीलापण रतन टाटा आपलेसे वाटतात यातच त्यांचे मोठेपण आहे. 

रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ साली मुंबईत पारसी कुटुंबात झाला. वडिल नवल टाटा व आई सोनू टाटा तसेच काका जमशेदजी टाटा यांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. त्यांचे ८ वी पर्यंतचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅपियन शाळेत तसेच उर्वरित शालेय शिक्षण शिमला व न्यूयॉर्क येथे झाले. कॉर्नेल महाविद्यालयातून वास्तूकला स्थानक पदवी मिळविली. टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना १८६८ झाली. १९६१ साली त्यांनी टाटा स्टीलमध्ये काम केलं. १९९१ मध्ये टाटा समुहाचे संस्थापक अध्यक्ष जेआरडी टाटा यांच्या सेवानिवृत्तीनंतर ते टाटा समुहाचे अध्यक्ष झाले. 

१९९१ ते २०१२ पर्यंत ते अध्यक्ष होते. त्यानंतर २०१६ ते २०१७ ला त्यांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून ही काम पाहिले. 
रतन टाटा यांच्या कार्यकाळात टाटा समूहाने टेटली, जग्वार लैंड रोवर, कोरस अशा कंपन्यांचे अधिग्रहण केले. ऑक्टोबर २०२१ मध्ये टाटा सन्सने २.४ अब्ज डॉलर्सला एअर इंडिया खरेदी केली. त्यांच्यात  कार्यकाळात टाटा समूहाला मोठे आर्थिक बळ मिळाले, जगभर विस्तार झाला. टाटा समूहाचे राजस्व ४० टक्क्याने वाढले व नफा ५० पट्टीने वाढल्याचे दिसून येतं.

 एकीकडे उद्योग, व्यवसाय वाढत असताना टाटा कुटुंबाने सामाजिक दायित्व तितक्याच प्रामाणिकपणे पार पाडले. त्यांच्या कुटुंबाचे ६६ टक्के शेअर (उत्पन्न) टाटा ट्रस्टकडे आहे. त्याचा उपयोग त्यांनी देशसेवा सामाजिक उत्थानासाठी केला. एवढेच नाही तर त्यांच्यात पर्यावरणाप्रती जागरूकता आणि प्राण्यांविषयी करुणा होती. नाशिकला त्यांनी विविध वनस्पतीचे बॉटनिकल गार्डनची निर्मिती केली. तर आपल्या निवासस्थानी भटक्या श्वानांना निवारा उपलब्ध करून दिला. असा अनमोल रत्न आपल्यातून निखळला सध्या असा रत्न शोधून सापडणार नाही.

भावपूर्ण श्रद्धांजली

दिगंबर मराठे, 
दिअँकर 

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...