Skip to main content

सोमवारपासून संतश्रेष्ठ सोपानदेव प्रदक्षिणा दिंडीचे आयोजन

इचि करीता पंचक्रोशी।
चुके जन्म मरण चौऱ्यौंशी।
चारी मुक्ती होती दासी।
येवोनी चरणाशी लागती।।

नाशिक| पुण्यपावन श्रीक्षेत्र सासवड संतश्रेष्ठ सोपानदेव महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही तीर्थभूमी, या सासवड तीर्थक्षेत्राची पंचक्रोशी प्रदक्षिणा प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी दि. १४ ऑक्टोबर रोजी सोमवार अश्विन शुद्ध एकादशीच्या पर्वकाळावर सकाळी श्री संत सोपानदेवांच्या समाधीस अभिषेक करून पंचक्रोशी प्रदक्षिणा दिंडीला प्रारंभ होणार असून  गुरुवार दि. २४ ऑक्टोबर रोजी आश्विन वद्य अष्टमीला सकाळी श्री संत सोपानदेव मंदिर सासवड येथे ९ ते ११ काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे.

या पंचक्रोशी प्रदक्षिणामध्ये पूण्यपावन स्वयंभू शिवलिंग लवथळेश्वर, श्री क्षेत्र जेजुरी, श्री आद्य रामायणाचार्य वाल्मीक ॠषी संजीवन समाधी, श्री स्वयंभू शिवलिंग बनेश्वर देवस्थान, श्री भगवती जगदंबा कोंढणपूर योगिनी माता, कौंडण्यपूर्ण निक्षेप, योगिनी माता प्रत्यक्ष असे श्री संत नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये ज्यांचे वर्णन आहे पाश्चात ।।पूर्वी ब्रह्म याचे स्थान। येथे तप केले गहन। महादेव येऊन आपण। याशी प्रसन्न झाले ।।असे ब्रह्मयाने स्थापन केलेले चतुर्मुख देवस्थान शिवशंभू महादेव तदनंतर॥ ब्रह्मा इंद्र तेहतिस कोडी ।नवही नाथ सवंगडी ।।असे ज्या नवनाथांचे वर्णन आहे. त्या नवनाथातील श्री चैतन्य कानिफनाथ मंदिर बोपगाव कानिफनाथ गड तदनंतर भक्ताच्या पावन भेटीसाठी आलेले बना मधील श्री स्वयंभू विठोबा मंदिर डाळिंब बन दौंड, तसेच भुलेश्वरा लागी पूजा केली सांग ।भक्त पांडुरंग तीन रात्री॥ असे स्वयंभू शिवलिंग भगवान भुलेश्वर, सिद्ध देवस्थान भगवान सिद्धेश्वर नायगाव.

पांडव वनवासामध्ये असताना पांडवांनी आपल्या वडिलांचे पिंडदान जेथे केले, असे प्राचीन शिवालय विशेष आकर्षण असलेले भगवान पांडेश्वराचे पावन दर्शन, त्याच्यानंतर अर्जुनाच्या पदस्पर्शाने पावन झालेले गाव जवळा अर्जून, त्याच्यानंतर पुण्यपावन कऱ्हाच्या काठावरील भगवान नागेश्वर, पुण्यपावन बेलापासून निर्माण झालेले बेलसरचे बेलेश्वर, पुण्य पावन भगवती यमाई जगदंबा अशा या पुण्य पावन सर्व देवस्थानांची ही पंचक्रोशी प्रदक्षिणा आहे. सर्व वारकऱ्याना दोन वेळचे भोजन दोन वेळ अल्पोपहार आदी सर्व व्यवस्था निशुल्कपणे केली जाते, तरी आपण या देव दुर्लभ पंचक्रोशी प्रदक्षिणेस सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. या पंचक्रोशी प्रदक्षिणेची फलश्रुती मिळवावी म्हणून ही पंचक्रोशी प्रदक्षिणा केलीच पाहिजे, असे श्री संत सेना महाराज बाराशेच्या शतकामध्ये सांगून गेले आणि म्हणून त्याप्रमाणे त्यांना डोळ्यापूढे ठेवून ही पंचक्रोशी प्रदक्षिणा आरंभीली जाते, आपण सर्व मंडळींनी या पंचक्रोशी प्रदक्षिणेस आगत्याने यावे  रविवार दि. १३ रोजी सायंकाळी श्रीक्षेत्र सासवड सोपानदेव मंदिर येथे मुक्कामी यावे आपणास श्री संत सोपानदेव पंचक्रोशी प्रदक्षिणा सासवड यामध्ये सोमवारी सहभागी होता येईल, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...