Skip to main content

शेतमालाला चांगली किंमत दिल्यास शेतकऱ्यास सन्मानाने जगात येईल: शरद पवार

नाशिक| शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. शेतकऱ्यांना घेतलेले कर्ज फेडता येत नाही. त्याच्या मालाला चांगली किंमत मिळत नाही, त्यामुळे कर्ज फेडण्याची त्याची शक्ती क्षीण झाली आहे. तो कर्जबाजारी होत आहे अशी समस्या महाराष्ट्रात निर्माण झाली असून त्याची यापासून सुटका करायची असेल तर त्याच्या शेतमालाला चांगली किंमत दिल्यास काळया आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यास सन्मानाने जगता येईल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आज येथे केले.


महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर होते. शहरातील उमेदवारांच्या नाशिक येथील आयोजित सभेत ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार, गोकुळ पिंगळे, पुरुषोत्तम कडलग, नाशिक पूर्वचे उमेदवार गणेश गिते, मध्यचे वसंत गिते. देवळाली मतदार संघाचे योगेश घोलप उपस्थित होते.


पवार पुढे म्हणाले की, भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांना रोखण्यासाठी आम्ही इंडिया आघाडी बनवली. देशाची सर्व शस्त्रे त्यांच्या हाती गेल्यास सर्व देशभर अस्थिर परिस्थिती निर्माण होईल. पंतप्रधान ४०० जागा मागत फिरत होते. संविधानानुसार ३०० जागा असल्यातरी सरकार स्थापन होते. आम्हाला शंका आली. चारशे जागा या संविधानात बदल करण्यासाठी मागितल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्ही चारशे जागा मिळू न देण्याचा निर्धार केला. जनतेने बहुमतापासून दूर ठेवले.


लहान मुली, स्त्रिया, शेतकरी, कष्टकरी कामगारांचे प्रश्न आहेत. स्त्रिया व मुलींवर अत्याचार वाढले असून त्याला आवर घालण्याची गरज असून लाडकी बहीण योजनेपेक्षा महिलांना संरक्षण देण्याची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले. स्त्रिया आणि मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्वांना सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मुले शिकत आहेत पण मुलांच्या हाताला काम मिळत देशातील सर्व मुलांना काम करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे असे सांगून त्याला जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत ४००० हजार रुपये तरतूद केली पाहिजे असा विचार आहे.  नाशिकमधील जुन्या आठवणीना उजाळा दिला.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...