Skip to main content

महाविकास आघाडीचे घोषणापत्र म्हणजे घोटाळापत्र: नरेंद्र मोदी

नाशिक|दिअँकर वृत्तसेवा| एकीकडे महायुतीचे घोषणापत्र तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे घोटाळापत्र आहे. हे पक्के आहे की जेथे काँग्रेस व त्यांचे सहकारी पक्ष आहे तेथे घोटाळा होणारच असे सांगून ते अशा योजनांची घोषणा करतात की ज्यामध्ये जास्तीत जास्त घोटाळा होईल, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केली.


नाशिक येथील तपोवन मैदानात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी काँगेस आणि सहकारी पक्षांच्या महविकास आघाडीवर सडकून टीका केली त्याप्रसंगी ते बोलत होते. मोदी म्हणाले की, महाराष्ट्र विकसित झाला तर भारत विकसित होईल त्यासाठी आपला आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. महाराष्ट्रातील लोकांनी लक्षात घेतले पाहिजे की महाराष्ट्रात भाजप महायुती आहे म्हणून गती आणि प्रगती आहे देश विकास करत असून विकासाचे नवे रेकॉर्ड बनत आहे. देशात गरिबांची चिंता करणारे सरकार असून गरीब पुढे गेला तर देश पुढे जाईल, मात्र काँग्रसने गरिबी हटावचा नारा दिला तरी गरीब रोटी, कपडा आणि मकानपासून काँगेसच्या काळात वंचित राहिला. केंद्रातील भाजपा सरकारच्या १० वर्षाच्या कार्यकाळात २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. हे कसे झाले कारण की मोदीची नियत चांगली होती, मी सगळ्यांचा आणि तुमचा सेवक म्हणून काम केले, गरिबी विरोधात सर्वांसोबत लढाई लढली त्यामुळे हे शक्य झाले.


मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे

• ५० लाख महिलांना उज्ज्वला योजनेचा लाभ मिळाला

• जलजीवन मिशन योजनेच्या मध्यामातून सव्वा करोड लोकांना नल से जल सुविधा दिली.

• महाराष्ट्रातील ७ कोटी लोकांना मोफत राशनचा लाभ उपलब्ध करून दिला.

• पीएम आवास योजनेतून २६ लाख लोकांना पक्की घरे दिली. यासाठी सातत्याने महायुतीचेे काम सुरू आहे.

• शेतकऱ्यांसाठी पीएम सन्मान निधी व महायुती सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेतून प्रत्येकी ६ हजार प्रमाणे असे १२ हजार रुपये दिले. महायुती सरकार पुन्हा आल्यास हा निधी १५ हजार करण्यात येईल असे आश्वासन दिले.

• पेट्रोल मध्ये इथेनॉलचा वापर करुन त्यास प्रोत्साहन दिले, त्यातून ८० कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झाला.

• पेट्रोल खरेदीमुळे विदेशात जाणारे चलन शेतकरयांना मिळाले.

• नाशिकच्या कांदा उत्पादकांच्या भावना मला माहिती आहे. म्हणून कांदा निर्यातीबाबतचे धोरण बदलून शेतकरयांना दिलासा दिला. महाराष्ट्र पुढे गेला तरच देश देश पुढे जाईल.

•देशात आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र खूप पुढे आहे. आधुनिक टेकनोलॉजीत गुंतवणूक वाढत आहे.

• एखाद्या सरकारने काम थांबवले तर महाराष्ट्र कसा पुढे जाईल? रोजगार कसा मिळेल?  असा सवाल करुन अशा प्रकारे विकासाची कामे थांबली तर महाराष्ट्राची पिछेहाट होईल.

• महाआघाडीने अटल सेतूला विरोध केला, वाढवण बंदराला विरोध करुन मेट्रो योजनेला अडथळे आणले. समृद्धी महामार्गाचे काम ठप्प केले. महायुतीच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात अडथळे आणून महाराष्ट्राला विकासापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.


*काँग्रेस व त्यांचा सहकारी पक्ष कोर्ट आणि देशातील जनतेची भावना समजू शकले नाही. खिशात कोऱ्या पानांचे पुस्तक घेऊन फिरत आहे. ते लोकांची दिशाभूल करत आहे. महाआघाडी संविधानाची रक्षा आणि सन्मानाची गोष्टी करून त्याविरुद्ध काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला. ७५ वर्षापासून काश्मीरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान लागू होऊ दिले नाही, देशात दोन संविधान लागू होते. भाजप सरकारने काश्मीर मधील ३७० कलम हटवून एक देश एक संविधान लागू करुन डॉ. आंबेडकरांना श्रद्धांजली दिली.

• काश्मीरमध्ये  ३७० कलम हटविले  तुम्ही आनंदित आहात का असा सवाल नाशिकरांना केला असता तेव्हा उपस्थितांनी होकार दिला. तुम्हाला आनंद झाला पण काँग्रेसच्या पोटात दुखले. तुम्ही टिव्हीवर बघितले असेल जम्मू काश्मीर मध्ये ३७० कलम लागू करण्यासाठी काँग्रेस आणि सहकारी पक्षांनी गोंधळ घातला. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हटवून दलित, मागासवर्गीय समाजाला आरक्षणापासून वंचित ठेऊन दलित, मागास लोकांना मागे ठेवण्याचे षडयंत्र आहे. 

• भाजपाचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसकडे एकच पर्याय आहे, तो म्हणजे खोटे बोलण्याचा, त्यांचे हे दुकान तेलंगणा व हरियाणामध्ये चालले नाही तेथे खोट्या दुकानाचे शटर खाली करावे लागले.

• काँग्रेसकडे ज्या राज्यात सत्ता आहे, तेथे कर्मचाऱ्यांचा पगार करण्यासाठी पैसे नसून त्यासाठी जनतेवर कर लादले जाऊन वसुली सुरू असल्याचे टीका केली.

• काँग्रेसला आपल्या करतूतीमुळे लोकांनी नाकारले असून आता ऑल इंडिया काँग्रेस राहिली नसून ती परजीवी काँग्रेस बनली आहे. त्यांना सहकारी पक्षाच्या कुबड्या घेऊन उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. काँग्रेस पुन्हा आपल्या पायावर उभे राहू शकत नाही.

*काँग्रेस ने राजकारणात टिकून राहण्यासाठी एस/एसटी व ओबिसीमध्ये फूट पाडून राज्य केले. काँगेस काळात ओबीसी कधीच एवढा एकजूट नव्हता. ९० च्या दशकात ओबीसी एकजूट बनला, ताकद दाखवली अन् हक्कासाठी जागृत झाला. त्यामुळे काँग्रेस सरकार पडले. त्यामुळे काँग्रेस ओबीसीला कमजोर करण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू पासून आताच्या चौथ्या पिढीने ही तोच मार्ग अवलंबला आहे. 

*महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेची देशाच्या कानाकोपऱ्यात चर्चा आहे. महिला भगिनींना या योजनेचा लाभ होत आहे. काँग्रेसला मात्र या योजनेचा त्रास होत आहे, ही योजना बंद करण्याचा घाट घालत असून त्यासाठी कोर्टात ही गेले. असे असले तरी भाजपा महायुती महिला सन्मान आणि प्रगतीसाठी महिलांच्या सशक्तीकरणासाठी समर्पित आहे.

*३ कोटी बहिणींना लखपती दीदी योजनेचा फायदा मिळाला

*केंद्राच्या १०० दिवसाच्या कार्यकाळात गरिबांना पंतप्रधान आवास योजनेचा फायदा मिळून देत जे घर महिलांच्या नावावर आहे अशा ३ कोटी घरांना मंजुरी दिली.

*मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. ओळख दिली, महान भाषेला सन्मान प्राप्त करुन दिला. 

*काँग्रेसने आमचे प्रेरणास्थान वीर सावरकर यांचा अपमान केला. आघाडीतील एक पक्ष सावरकरांवर बोलत असतो. पण मी सर्व महाविकास आघाडीला आव्हान देतो की त्यांच्यात हिम्मत असेल तर १५ मिनिट सावरकरांची प्रशंसा करुन दाखवावी.

नाशिकबाबत महत्वाचे मुद्दे

• आधुनिक पायाभूत सुविधांमुळे नाशिकचा चेहरा मोहरा बदलला. २०२६ च्या कुंभमेळ्यासाठी त्याचा फायदा होईल.
• आय टी पार्कमुळे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.
• नाशिक डिफेन्स क्षेत्रात आत्मनिर्भर होऊन मुख्य केंद्र बनले.
• लढाऊ विमान व सुरक्षा उपकरणे बनत आहेत.
• नाशिकरांना गर्व असेल की हे शहर सशक्त भारतासाठी महत्वाची भूमिका निभावत आहे. दुसरीकडे  काँगेस आघाडी भारताला कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे. 

*एचएएल बाबत खोट्या अफवा पसरवल्या, फॅक्टरी बाहेर निदर्शने केली. कर्मचाऱ्यांना भडकवले आता एचएएल नफा कमवत आहे. डिफेन्समध्ये भारत आत्मनिर्भर बनला आहे.




Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...