Skip to main content

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले. 

डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. 

सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले असून, एरिस सॉफ्टवेअर सोल्युशन  यांच्या सौजन्याने त्याचे प्रायोजित करण्यात आले आहे. दररोज हजारो भाविकांची वर्दळ असणारे तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर हे उच्च प्राधान्याचे ठिकाण म्हणून निवडण्यात आले आहे. अचानक हृदयविकाराच्या झटक्याच्या प्रसंगी तात्काळ एईडी उपलब्ध असणे अनेकांचे प्राण वाचवू शकते.

विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन व नामांकित हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विक्रांत विजन म्हणाले, आगामी कुंभमेळ्याच्या काळात AED उपलब्ध नसल्यामुळे एकही मृत्यू होऊ नये, हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच डॉ. सृष्टी विजन यांनी अचानक हृदयविकाराच्या झटक्यात त्वरित प्रतिसादाचे महत्त्व विषद  करुन उपचाराविषयी व उपकरणाविषयी माहिती दिली.

अचानक हृदयविकार कुठेही होऊ शकतो, अगदी देवळांसारख्या पवित्र ठिकाणीही. पहिल्या काही मिनिटांत दिलेले डिफिब्रिलेशन प्राण वाचवू शकते. त्यामुळे गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी AED बसविणे अत्यंत आवश्यक आहे. असे सांगण्यात आले.

शहरात शंभर उपकरण बसविण्याचे उद्दिष्ट

विजन हॉस्पिटलच्या सामाजिक उपक्रमांतर्गत स्थापन झालेल्या विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनची स्थापना डॉ. विनोद विजन आणि डॉ. विक्रांत विजन यांनी केली आहे. फाउंडेशनचे उद्दिष्ट नाशिक शहरात १०० AED बसविण्याचे असून, आतापर्यंत शाळा, महाविद्यालये, कार्यस्थळे, निवासी संकुले व विविध सार्वजनिक संस्थांमध्ये हजारो नागरिकांना मोफत CPR प्रशिक्षण देण्यात आले आहे.

याशिवाय, डॉ. विनोद विजन यांनी कुंभमेळा प्राधिकरणाअंतर्गत कार्यरत कुंभाथॉन इनोव्हेशन फाउंडेशन यांच्या सहकार्याने एक अभिनव प्रकल्प सुरू केला असून, त्याअंतर्गत ड्रोनद्वारे AED व आपत्कालीन वैद्यकीय मदत पुरविण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनने शैक्षणिक संस्था, निवासी सोसायट्या, सामाजिक संस्था तसेच दानशूर व्यक्तींना AED प्रायोजित करण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले आहे. आप्तस्वकीयांच्या स्मरणार्थ किंवा पसंतीच्या सार्वजनिक ठिकाणी AED बसवून या जीवनरक्षक मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“AED सहज उपलब्ध असलेले देशातील पहिले शहर नाशिक बनवणे, हेच आमचे स्वप्न आहे,” असे फाउंडेशनने नमूद केले आहे. अध्यक्ष प्राची घुले,सचिव राहुल पाटील,विश्वस्त पुरूषोत्तम कडलग ,कैलास घुले,सत्यप्रिय शुक्ला ,मनोज थेटे स्वप्नील शेलार,प्रदीप तुंगार ,रुपाली भुतडा आदींचे सहकार्य लाभले.


कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन सारख्या शैक्षणिक संस्था, निवासी सोसायट्या, सामाजिक संस्था तसेच दानशूर व्यक्तींना AED प्रायोजित करण्याचे आवाहन करतो.

:-पुरुषोत्तम कडलग, विश्वस्त


Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...